ETV Bharat / state

हिंगोलीत 'त्या' हृदयद्रावक घटनेची पुनरावृत्ती, रस्त्याअभावी गरोदर महिलेला बाजेवरून पोहोचवले रुग्णवाहिकेत

मागील वेळीच झालेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. तेव्हा कुठे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी करवाडी या गावाकडे धाव घेतली, मात्र तेदेखील रस्त्याअभावी गावापर्यंत पोहोचू शकले नाही

author img

By

Published : Aug 3, 2019, 12:32 PM IST

Updated : Aug 3, 2019, 1:01 PM IST

हिंगोलीत त्या हृदयद्रावक घटनेची पुनरावृत्ती

हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील ग्रामस्थांची रस्त्याअभावी होणारी हेळसांड अद्याप थांबलेली नाही. गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांना चिखल तुडवत प्रवास करावा लागतो. २ ते ३ दिवसांपूर्वीच एका गरोदर मातेला बाजेवरून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली होती. आता पुन्हा एकदा त्याच रस्त्याने शुक्रवारी रात्रीच्या वेळी गरोदर महिलेला बाजेवरून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवावे लागले आहे.

न्यायालयाच्या सुचनांकडे दुर्लक्ष-

मागील वेळीच झालेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. तेव्हा कुठे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी करवाडी या गावाकडे धाव घेतली, मात्र तेदेखील रस्त्याअभावी गावापर्यंत पोहोचू शकले नाही. त्यांनी हारवाडी येथून बनवण्यात आलेल्या पर्यायी रस्त्याची पाहणी केली आणि रस्ता वापरण्यायोग्य असल्याचे सांगत ते निघून गेले. मात्र ग्रामस्थांना चिखलात रस्ता पार करावा लागत आहे. ही भयंकर अवस्था पाहून खुद्द न्यायालयाने या रस्त्याची दखल घेतली आहे. जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत करवाडी या गावामध्ये आरोग्य पथक तैनात ठेवण्याच्या सूचनाही हिंगोली प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. मात्र प्रशासनाने त्या सूचनांचे पालन तर केलेच नाही उलट रस्ता नसतानादेखील रस्ता असल्याचे प्रशासन भासवत आहे.

रस्त्याअभावी गरोदर महिलेला बाजेवरून पोहोचवले रुग्णवाहिकेत

यावरून हे स्पष्ट होते, की प्रशासन खरोखरच करवाडी येथील ग्रामस्थांच्या दशेकडे दुर्लक्ष करत आहे. जिल्ह्यात आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा हा पाऊस सुरू झाल्याने रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे. कळवाडी ते नांदापूर या रस्त्यावर एवढा भयंकर चिखल आहे की हा रस्ता पार करताना अंगावर शहारे उभे राहतात.

हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील ग्रामस्थांची रस्त्याअभावी होणारी हेळसांड अद्याप थांबलेली नाही. गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांना चिखल तुडवत प्रवास करावा लागतो. २ ते ३ दिवसांपूर्वीच एका गरोदर मातेला बाजेवरून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली होती. आता पुन्हा एकदा त्याच रस्त्याने शुक्रवारी रात्रीच्या वेळी गरोदर महिलेला बाजेवरून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवावे लागले आहे.

न्यायालयाच्या सुचनांकडे दुर्लक्ष-

मागील वेळीच झालेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. तेव्हा कुठे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी करवाडी या गावाकडे धाव घेतली, मात्र तेदेखील रस्त्याअभावी गावापर्यंत पोहोचू शकले नाही. त्यांनी हारवाडी येथून बनवण्यात आलेल्या पर्यायी रस्त्याची पाहणी केली आणि रस्ता वापरण्यायोग्य असल्याचे सांगत ते निघून गेले. मात्र ग्रामस्थांना चिखलात रस्ता पार करावा लागत आहे. ही भयंकर अवस्था पाहून खुद्द न्यायालयाने या रस्त्याची दखल घेतली आहे. जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत करवाडी या गावामध्ये आरोग्य पथक तैनात ठेवण्याच्या सूचनाही हिंगोली प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. मात्र प्रशासनाने त्या सूचनांचे पालन तर केलेच नाही उलट रस्ता नसतानादेखील रस्ता असल्याचे प्रशासन भासवत आहे.

रस्त्याअभावी गरोदर महिलेला बाजेवरून पोहोचवले रुग्णवाहिकेत

यावरून हे स्पष्ट होते, की प्रशासन खरोखरच करवाडी येथील ग्रामस्थांच्या दशेकडे दुर्लक्ष करत आहे. जिल्ह्यात आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा हा पाऊस सुरू झाल्याने रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे. कळवाडी ते नांदापूर या रस्त्यावर एवढा भयंकर चिखल आहे की हा रस्ता पार करताना अंगावर शहारे उभे राहतात.

Intro:
हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील ग्रामस्थांच्या रस्त्याअभावी होणारी हेळसांड अद्याप कमी झालेली नाही 2 ते तीन दिवसापूर्वी एका गरोदर मातेला बाजेवर रुग्णवाहिकेची पर्यंत पोहोचण्याची वेळ या ग्रामस्थांवर आली होती. त्याच रस्त्याने पुन्हा शुक्रवारी रात्रीच्या वेळी गरोदर मातेला रुग्णवाहिकेत पर्यंत पोहोचावे लागले. तर दुसरीकडे प्रशासन म्हणते की, या गावाला जो पर्यायी रस्ता दिलाय, त्या रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. मात्र ग्रामस्थ त्या रस्त्याचा वापर करीत नसल्याचे खुद्द जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले आहे. तरी ही डांबरीकरण रस्ता डिसेंबर पर्यंत करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी म्हणत आहेत.



Body:करवाडी येथील ग्रामस्थांची रस्त्याअभावी एवढी हेळसांड होते की त्यांना रात्री-अपरात्री चिखल तुडवित हा रस्ता पार करावा लागतो एवढी भयंकर अवस्था या ग्रामस्थांवर येऊन ठेवली सुवर्णा ढाकणे या महिलेला बाजेवर रुग्णवाहिकेचे पर्यंत पोहोचवावे लागले होते त्याच दिवशी देखील एका गरोदर मातेला हाच चिखल रस्ता स्वतः तुडवत रुग्णवाहिका जवळ करावी लागली तर आज मध्यरात्रीच्या सुमारास लक्ष्मी संतोष नाईक या महिलेला बाजेवर अंधारात रस्ता तुडवत रुग्णवाहिकेचे पर्यंत पोहोचवण्याची वेळ येथील ग्रामस्थ वर येऊन ठेवली प्रशासन अजून रस्ता बनविण्यासाठी किती प्रतीक्षा करायला लागणार आहे. सुवर्णा ढाकणे या महिलेला बाजेवर नेता नाचे भयंकर दृश्य पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता तेव्हा कुठे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी करवाडी या गावाकडे धाव घेतली मात्र ते देखील रस्त्याअभावी त्या गावा पर्यंत पोहोचू शकले नाही त्यांनी हारवाडी येथून बनवण्यात आलेल्या पर्यायी रस्त्याची पाहणी केली. रस्ता वापरणे योग्य असल्याचे सांगत सुटले आहेत. आणि दुसरीकडे मात्र ग्रामस्थांना चिखलात रस्ता पार करावा लागत आहे. ही भयंकर अवस्था पाहून खुद न्यायालयाने या रस्त्याची दखल घेतली आहे जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत करवाडी या गावांमध्ये आरोग्य पथक तैनात ठेवण्याच्या सूचनाही हिंगोली प्रशासनाला दिल्यात मात्र प्रशासनाने त्या सूचनांचे पालन तर केलेच नाही परंतु रस्ता नसतानादेखील रस्ता असल्याचे हे प्रशासन भासवत आहे. तर 108 रुग्णवाहिकांचे डॉक्टर करवाडी गावापर्यंत जाऊ शकत नाहीत मात्र हरवाडी किंवा नांदापूर या ठिकाणी जाण्यासाठी तीन ते चार तासाचा अवधी लागेल असे स्पष्टपणे सांगत आहेत. यावरून हे स्पष्ट होते की प्रशासन खरोखरच करवाडी येथील ग्रामस्थांच्या दशेकडे दुर्लक्ष करतंय. जिल्ह्यात आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा हा पाऊस सुरू झाल्याने रस्त्याची पूर्णता वाट लागलीय प्रशासनाकडे आज रोजी सरासरीच्या 36.47 टक्के एवढी पाऊस झाल्याची नोंद आहे. कळवाडी ते नांदापूर या रस्त्यावर एवढा भयंकर चिखल आहे की दिवसा हा रस्ता पार करताना अंगावर शहारे उभे राहतात तर रात्री काय परिस्थिती असेल...Conclusion:
Last Updated : Aug 3, 2019, 1:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.