ETV Bharat / state

हिंगोली : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या - हिंगोली

केसापूर गावामध्ये एका कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली.

आश्रू आनंदा शिंदे
author img

By

Published : Sep 9, 2019, 6:21 PM IST

हिंगोली- जिल्ह्यामध्ये काही केल्या आत्महत्येचे सत्र कमी होताना दिसत नाही. केसापूर गावामध्ये एका कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली आहे. आश्रू आनंदा शिंदे (32) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा - सोलापुरात जातीय सलोख्याची अनोखी परंपरा, माढेकरांनी एकत्र साजरा केला गणेशोत्सवसह मोहरम

शिंदे यांना एकूण 6 एकर शेती आहे. मात्र, सततच्या नापिकीमुळे डोक्यावर असलेले बँकेचे 80 हजार आणि खासगी 2 लाख रुपयांचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेमध्ये ते गेल्या काही दिवसांपासून होते. तर 4 दिवसांपासून ते एकांतातच राहात असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

हेही वाचा - कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ; शहरातील सखल भागात पुन्हा शिरले पाणी

खासगी कर्जवाले वारंवार रकमेची मागणी करत. त्यामुळे शिंदे तणावाखाली खाली येत होते. त्यांनी रविवारी घरी कोणीच नसल्याचे पाहून स्वतःच्या घरामध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. घरची मंडळी जेव्हा घरी परतली तेव्हा आतून घर लावलेले आढळून आले. त्यांनी अनेकदा आवाज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी दार तोडले. तर शिंदे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.

घटनेची माहिती नरसी पोलिसांना कळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

हिंगोली- जिल्ह्यामध्ये काही केल्या आत्महत्येचे सत्र कमी होताना दिसत नाही. केसापूर गावामध्ये एका कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली आहे. आश्रू आनंदा शिंदे (32) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा - सोलापुरात जातीय सलोख्याची अनोखी परंपरा, माढेकरांनी एकत्र साजरा केला गणेशोत्सवसह मोहरम

शिंदे यांना एकूण 6 एकर शेती आहे. मात्र, सततच्या नापिकीमुळे डोक्यावर असलेले बँकेचे 80 हजार आणि खासगी 2 लाख रुपयांचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेमध्ये ते गेल्या काही दिवसांपासून होते. तर 4 दिवसांपासून ते एकांतातच राहात असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

हेही वाचा - कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ; शहरातील सखल भागात पुन्हा शिरले पाणी

खासगी कर्जवाले वारंवार रकमेची मागणी करत. त्यामुळे शिंदे तणावाखाली खाली येत होते. त्यांनी रविवारी घरी कोणीच नसल्याचे पाहून स्वतःच्या घरामध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. घरची मंडळी जेव्हा घरी परतली तेव्हा आतून घर लावलेले आढळून आले. त्यांनी अनेकदा आवाज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी दार तोडले. तर शिंदे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.

घटनेची माहिती नरसी पोलिसांना कळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

Intro:

हिंगोली- जिल्ह्यामध्ये काही केल्या आत्महत्येचे सत्र कमी होईना पुन्हा एका कर्जबाजारी शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली.


Body:आश्रू आनंदा शिंदे (32) अस मयत शेतकऱ्याचे नाव आहे. शिंदे यांना एकूण सहा एकर शेती आहे मात्र सततच्या नापिकीमुळे डोक्यावर असलेले बँकेचे 80 हजार आणि खाजगी 2 लाख रुपयांचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेमध्ये ते गेल्या काही दिवसांपासून राहात असत. दोन ते चार दिवसापासून तर ते एकांतातच राहात असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. खाजगी कर्जवाले वारंवार रकमेची मागणी करत असत त्यामुळे शिंदे हे जास्त तणावाखाली खाली येत होते. त्यांनी रविवारी घरी कोणीच नसल्याचे पाहून स्वतःच्या घरामध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. घरची मंडळी जेव्हा घरी परतली तेव्हा आतून घर लावलेले आढळून आले त्यांनी अनेकदा आवाज देऊन घर उघडण्याचा प्रयत्न केला मात्र काहीही प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी दार तोडले तर शिंदे यांचा मृतदेह त्या अवस्थेमध्ये आढळून आला. घटनेची माहिती नरसी पोलिसांना कळताच पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला अन मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविला. Conclusion:आश्रू शिंदे यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी पत्नी, आई असा परिवार आहे घरातील कर्ती व्यक्ती निघून गेल्याने घरासह गावावर शोककळा पसरली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.