ETV Bharat / state

चंद्रपुरात 24 तासांत 743 कोरोनामुक्त, 1425 रुग्णांची नोंद

author img

By

Published : Apr 21, 2021, 12:49 AM IST

चंद्रपूरमध्ये गेल्या 24 तासात 743 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 1425 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. तर 16 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

चंद्रपुरात 24 तासांत 743 कोरोनामुक्त
चंद्रपुरात 24 तासांत 743 कोरोनामुक्त

चंद्रपूर - जिल्ह्यात मागील 24 तासात 743 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 1425 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. तर 16 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 44 हजार 869 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 32 हजार 024 झाली आहे. सध्या 12 हजार 207 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 37 हजार 064 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 2 लाख 85 हजार 107 नमुने निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 638 बाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 638 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 588, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 22, यवतमाळ 21, भंडारा 3, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. बाधीत आलेल्या 1425 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 445, चंद्रपूर तालुका 67, बल्लारपूर 104, भद्रावती 102, ब्रम्हपुरी 133, नागभिड 42, सिंदेवाही 43, मूल 65, सावली 23, पोंभूर्णा 3, गोंडपिपरी 21, राजूरा 59, चिमूर 41, वरोरा 207, कोरपना 40, जिवती 16 व इतर ठिकाणच्या 14 रुग्णांचा समावेश आहे. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

हेही वाचा - राज्यात 62 हजार 97 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 519 रुग्णांचा मृत्यू

चंद्रपूर - जिल्ह्यात मागील 24 तासात 743 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 1425 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. तर 16 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 44 हजार 869 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 32 हजार 024 झाली आहे. सध्या 12 हजार 207 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 37 हजार 064 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 2 लाख 85 हजार 107 नमुने निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 638 बाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 638 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 588, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 22, यवतमाळ 21, भंडारा 3, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. बाधीत आलेल्या 1425 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 445, चंद्रपूर तालुका 67, बल्लारपूर 104, भद्रावती 102, ब्रम्हपुरी 133, नागभिड 42, सिंदेवाही 43, मूल 65, सावली 23, पोंभूर्णा 3, गोंडपिपरी 21, राजूरा 59, चिमूर 41, वरोरा 207, कोरपना 40, जिवती 16 व इतर ठिकाणच्या 14 रुग्णांचा समावेश आहे. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

हेही वाचा - राज्यात 62 हजार 97 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 519 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.