ETV Bharat / state

...तर नरभक्षक वाघाला ठार करा; वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे शेतकऱ्यांची मागणी - चंद्रपूर राजुरा वाघ

दहा जणांचा बळी घेणारा वाघ अद्यापही वनविभाग जेरबंद करू शकलेला नाही. वाघ सतत वनविभागाला हुलकावणी देत आहे. पकडणे शक्य नसल्यास या वाघाला ठार मारा, अशी मागणी शेतकऱ्यांंनी केली आहे. तसेच यासंर्दभात शेतकरी संघटनेने राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना ई-मेल केला आहे.

Kill the man-eating tiger, farmers demand in Rajura
नरभक्षक वाघाला ठार करा, राजुरा येथील शेतकऱ्यांची मागणी
author img

By

Published : Oct 9, 2020, 11:42 AM IST

चंद्रपूर (राजुरा) - दहा जणांचा बळी घेणारा वाघ अद्यापही वनविभाग जेरबंद करू शकलेला नाही. वाघ सतत वनविभागाला हुलकावणी देत आहे. पकडणे शक्य नसल्यास या वाघाला ठार मारा, अशी मागणी शेतकऱ्यांंनी केली आहे. तसेच यासंर्दभात शेतकरी संघटनेने राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना ई-मेल केला आहे. दुसरीकडे, वाघाला तत्काळ जेरबंद न केल्यास सोमवारी रास्तारोको करू, असा इशारा शेतकरी, शेतमजूर समन्वय समितीने दिला आहे.

राजुरा, विरुर तसेच लगतच्या लाठी भागात वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत दहा शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. या वाघाला पकडण्यात वनविभागाला अपयश आले आहे. नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी तसेच त्यांना जीविताची हमी देण्यासाठी या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करणे गरजेचे आहे. म्हणूनच त्या वाघाला ठार मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली आहे. राळेगाव - पांढरकवडा आणि ब्रह्मपुरी या भागात यापूर्वी परवानगी देऊन वाघाला ठार मारण्यात आले होते.

वाघाच्या हल्ल्यात मृत खांबाडा येथील मारोती पेंदोर यांच्या मुलाला वनविभागात नोकरीत सामावून घ्यावे, अशीही मागणी शेतकरी संघटनेनेचे जेष्ठ नेते अॕ.वामनराव चटप , प्रभाकर ढवस, आबाजी ढवस, भास्कर शिडाम,डॉ. गंगाधर बोढे यांच्यासह विरुर, विहिरगाव, खांबाडा, मूर्ती, नलफडी,सिंधी, धानोरा, कवीटपेठ, बंजारागुडा, चिंचोली बु., अंतरगाव,अनुर,अमृतगुडा, सुबई, थोमापुर, पिंपळगाव, नवेगाव,नवी बेरडी, चिचबोडी, सोनुर्ली, सिर्सी, टेम्बुरवाही, चूनाळा, मुंडीगेट, डोंगरगाव या गावातील नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा... 'त्या' नरभक्षक वाघाला दोन दिवसात ठार करा, अन्यथा... माजी आमदार निमकर यांचा इशारा

चंद्रपूर (राजुरा) - दहा जणांचा बळी घेणारा वाघ अद्यापही वनविभाग जेरबंद करू शकलेला नाही. वाघ सतत वनविभागाला हुलकावणी देत आहे. पकडणे शक्य नसल्यास या वाघाला ठार मारा, अशी मागणी शेतकऱ्यांंनी केली आहे. तसेच यासंर्दभात शेतकरी संघटनेने राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना ई-मेल केला आहे. दुसरीकडे, वाघाला तत्काळ जेरबंद न केल्यास सोमवारी रास्तारोको करू, असा इशारा शेतकरी, शेतमजूर समन्वय समितीने दिला आहे.

राजुरा, विरुर तसेच लगतच्या लाठी भागात वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत दहा शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. या वाघाला पकडण्यात वनविभागाला अपयश आले आहे. नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी तसेच त्यांना जीविताची हमी देण्यासाठी या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करणे गरजेचे आहे. म्हणूनच त्या वाघाला ठार मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली आहे. राळेगाव - पांढरकवडा आणि ब्रह्मपुरी या भागात यापूर्वी परवानगी देऊन वाघाला ठार मारण्यात आले होते.

वाघाच्या हल्ल्यात मृत खांबाडा येथील मारोती पेंदोर यांच्या मुलाला वनविभागात नोकरीत सामावून घ्यावे, अशीही मागणी शेतकरी संघटनेनेचे जेष्ठ नेते अॕ.वामनराव चटप , प्रभाकर ढवस, आबाजी ढवस, भास्कर शिडाम,डॉ. गंगाधर बोढे यांच्यासह विरुर, विहिरगाव, खांबाडा, मूर्ती, नलफडी,सिंधी, धानोरा, कवीटपेठ, बंजारागुडा, चिंचोली बु., अंतरगाव,अनुर,अमृतगुडा, सुबई, थोमापुर, पिंपळगाव, नवेगाव,नवी बेरडी, चिचबोडी, सोनुर्ली, सिर्सी, टेम्बुरवाही, चूनाळा, मुंडीगेट, डोंगरगाव या गावातील नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा... 'त्या' नरभक्षक वाघाला दोन दिवसात ठार करा, अन्यथा... माजी आमदार निमकर यांचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.