ETV Bharat / state

जोरदार पावसाचा प्रवाशांना फटका; रात्रीपासून प्रवासी रेल्वे स्थानकात

रात्रीपासून ठाण्याच्या पुढील भागात जाणारे प्रवासी रेल्वे स्थानकांमध्ये खोळंबले आहेत. त्यांना बाहेर रस्ते वाहतुकीसाठी बस किंवा रिक्षासुद्धा भेटत नाही.

author img

By

Published : Jul 2, 2019, 10:27 AM IST

रात्रीपासून प्रवासी रेल्वे स्थानकात

मुंबई - शहरात काल सोमवारी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे मध्य रेल्वेची कुर्ला ते ठाणे हा मार्ग पूर्णपणे बंद आहे. यामुळे घाटकोपर रेल्वे स्थानकामध्ये रात्री ११ पासून प्रवासी स्थानकामध्ये अडकले आहे.

प्रवाशांची प्रतिक्रिया

रात्रीपासून ठाण्याच्या पुढील भागात जाणारे प्रवासी रेल्वे स्थानकांमध्ये खोळंबले आहेत. त्यांना बाहेर रस्ते वाहतुकीसाठी बस किंवा रिक्षासुद्धा भेटत नाही. जागोजागी सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी चाकरमान्यांना याचा फटका बसला आहे. स्थानकावर केवळ सखल भागांमध्ये काही रेल्वे रुळांवर पाणी आल्यामुळे वाहतूक बाधित झाली आहे, एवढीच घोषणा सध्या प्रवाशांना ऐकायला मिळत आहे. सकाळी थोडावेळ थांबल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मुंबईमध्ये आज संततधार पावसाचा पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवशी मुंबईची दैना उडाली आहे. हवामान खात्याने आणि महानगरपालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा आदेश देण्यात आलेल्या आहे. महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मुंबई - शहरात काल सोमवारी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे मध्य रेल्वेची कुर्ला ते ठाणे हा मार्ग पूर्णपणे बंद आहे. यामुळे घाटकोपर रेल्वे स्थानकामध्ये रात्री ११ पासून प्रवासी स्थानकामध्ये अडकले आहे.

प्रवाशांची प्रतिक्रिया

रात्रीपासून ठाण्याच्या पुढील भागात जाणारे प्रवासी रेल्वे स्थानकांमध्ये खोळंबले आहेत. त्यांना बाहेर रस्ते वाहतुकीसाठी बस किंवा रिक्षासुद्धा भेटत नाही. जागोजागी सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी चाकरमान्यांना याचा फटका बसला आहे. स्थानकावर केवळ सखल भागांमध्ये काही रेल्वे रुळांवर पाणी आल्यामुळे वाहतूक बाधित झाली आहे, एवढीच घोषणा सध्या प्रवाशांना ऐकायला मिळत आहे. सकाळी थोडावेळ थांबल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मुंबईमध्ये आज संततधार पावसाचा पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवशी मुंबईची दैना उडाली आहे. हवामान खात्याने आणि महानगरपालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा आदेश देण्यात आलेल्या आहे. महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Intro:रात्री 11 पासून प्रवाशी घाटकोपर स्थानकात

मुंबईमध्ये कालच्या रात्रीपासून मुसळधार पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे यामुळे मध्य रेल्वेची कुर्ला ते ठाणा ही मार्गिका पूर्णपणे बंद आहेBody:रात्री 11 पासून प्रवाशी घाटकोपर स्थानकात

मुंबईमध्ये कालच्या रात्रीपासून मुसळधार पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे यामुळे मध्य रेल्वेची कुर्ला ते ठाणा ही मार्गिका पूर्णपणे बंद आहे.

घाटकोपर रेल्वे स्थानकामध्ये रात्रीच्या अकरा वाजल्यापासून प्रवासी ट्रेनमध्येच खोळंबले आहेत मुंबईमध्ये आज संततधार पावसाचा पाचवा दिवस आहे पाचव्या दिवशी मुंबईची पूर्णता दैना उडाली आहे.हवामान खात्याने आणि महानगरपालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा आदेश देण्यात आलेल्या आहे.महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा पण रात्री ठाण्याच्या पुढचे व त्याच्या पुढचे प्रवासी आहेत ते प्रवासी जागोजागी रेल्वेमध्ये खोळंबले आहेत त्यांना बाहेरून रस्ते वाहतुकीवर ना रिक्षा भेटते आहे. जागोजागी सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे मुंबईची तुंबई झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी चाकरमानी यांना फटका बसलेला आहे. रेल्वे स्थानकावर इंडिकेटरवर ना ट्रेनची आवाजाही दिसत आहे ना कोणत्या उद्घोषणा केल्या जात आहेत केवळ सखल भागांमध्ये काही रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्यामुळे वाहतूक बाधित झाली इतकीच सध्या प्रवाशांना ऐकायला मिळत आहे सकाळी थोडी विश्रांती घेतलेल्या पाऊस पुन्हा एकदा जोर पकडलेला पाहायला मिळत आहे त्यामुळे प्रवाशांच्या मनामध्ये अजून भीती भरलेली आहे . उपनगरांमध्ये मालाड येथे रात्री संरक्षण भिंत कोसळून 15 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.