ETV Bharat / state

पाणी समस्येबाबत नगरपरिषदेची विशेष बैठक; घरगुंती पंप लावणाऱ्यांवर करणार कारवाई

उन्हाळा सुरू होताच ही पाणी पातळी अजूनच खाली गेल्याने लोकांच्या, विहिरी, बोरवेल आटल्यामुळे लोकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे.

author img

By

Published : May 8, 2019, 10:57 AM IST

घरगुंती पंप लावणाऱ्यांवर करणार कारवाई

भंडारा - शहरालगत वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे, मात्र तरीही लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, पाण्यासाठी लोकांना मोर्चे काढावे लागत आहेत. त्यासाठी नगरपरिषदेने तातडीने विशेष बैठक बोलविली. या बैठकीत पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी ७ टँकरद्वारे शहरात पाणी पुरवठा केला जाणार आहे. घरगुती छोटे पंप लावून पाणी भरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.

घरगुंती पंप लावणाऱ्यांवर करणार कारवाई

भंडारा शहराच्या लगतच वैनगंगा नदी आहे. येथे गोसे प्रकल्पाचे बॅक वॉटर असल्याने नदी दुथडी वाहत आहे. मात्र या पाण्यात नागपूरच्या नाग नदीतील गटराचे पाणी येत असल्याने हे पाणी दूषित झाले आहे. गटराच्या पाण्यामुळे पाण्याचे झरे बंद पडले आहेत, त्यामुळे नदी जवळ असूनही पाण्याची पातळी खाली आहे. उन्हाळा सुरू होताच ही पाणी पातळी अजूनच खाली गेल्याने लोकांच्या, विहिरी, बोरवेल आटल्यामुळे लोकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. १२३ वर्षे जुनी आणि १५ वर्षे पहिलेच कालबाह्य असलेल्या नळ योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. यामुळे कुठे गढूळ पाणी मिळते तर काही भागात पाणी पोहचत नाही. नगर परिषदेकडून योग्य पाणीपुरवठा होत नसल्याने लोकांनी नगरपरिषदे विरोधात मोर्चे काढले, घागर फोडल्या. लोकांचा संताप लक्षात येताच नगर पालिकेने तातडीची बैठक बोलाविली आणि काही उपाय योजना आखण्यात आल्या.

गेल्या वर्षीही पाण्याची समस्या उद्धभवली होती. मात्र, तेव्हा कसल्याही प्रकारचा ठराव न घेता नगरसेवकांनी स्वतःच्या टँकरने पाणीपुरवठा केला होता. यावर्षी ६ महिन्यांपूर्वीच सभेत पाणीपुरवठ्याबाबत ठराव घेत टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्याधिकाऱयांच्या वेळकाडू धोरणामुळे एप्रिल महिना संपल्यावरही टँकर उपल्बध होऊ शकले नाही, असा आरोप सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी केला. पाणी समस्येचे निवारण करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत विरोधकांनी अध्यक्ष आणि मुख्याधिकारी आणि पाणी पुरवठा विभागातील लोकांना धारेवर धरले.

शहारत खात रोडवरील परिसरात पाण्याची भीषण परिस्थिीत निर्माण झाली आहे. या परिसरातील ७० ते ८० टक्के घराचे बोर आटले आहेत. बैठकीत ठरल्याप्रमाणे नगर परिषदचे दोन टँकर आणि खाजगी ५ टँकर, अशा ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. दिवसाला १ टँकर ४ फेऱ्या मारणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष स्वतः भाजपचे उमेदवार असल्याने ते आणि सर्व नगरसेवक हे निवडणुकीत व्यस्त असल्याने पाणी प्रश्नाकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आणि त्याचा त्रास मात्र लोकांना सहन करावा लागला.

भंडारा - शहरालगत वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे, मात्र तरीही लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, पाण्यासाठी लोकांना मोर्चे काढावे लागत आहेत. त्यासाठी नगरपरिषदेने तातडीने विशेष बैठक बोलविली. या बैठकीत पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी ७ टँकरद्वारे शहरात पाणी पुरवठा केला जाणार आहे. घरगुती छोटे पंप लावून पाणी भरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.

घरगुंती पंप लावणाऱ्यांवर करणार कारवाई

भंडारा शहराच्या लगतच वैनगंगा नदी आहे. येथे गोसे प्रकल्पाचे बॅक वॉटर असल्याने नदी दुथडी वाहत आहे. मात्र या पाण्यात नागपूरच्या नाग नदीतील गटराचे पाणी येत असल्याने हे पाणी दूषित झाले आहे. गटराच्या पाण्यामुळे पाण्याचे झरे बंद पडले आहेत, त्यामुळे नदी जवळ असूनही पाण्याची पातळी खाली आहे. उन्हाळा सुरू होताच ही पाणी पातळी अजूनच खाली गेल्याने लोकांच्या, विहिरी, बोरवेल आटल्यामुळे लोकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. १२३ वर्षे जुनी आणि १५ वर्षे पहिलेच कालबाह्य असलेल्या नळ योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. यामुळे कुठे गढूळ पाणी मिळते तर काही भागात पाणी पोहचत नाही. नगर परिषदेकडून योग्य पाणीपुरवठा होत नसल्याने लोकांनी नगरपरिषदे विरोधात मोर्चे काढले, घागर फोडल्या. लोकांचा संताप लक्षात येताच नगर पालिकेने तातडीची बैठक बोलाविली आणि काही उपाय योजना आखण्यात आल्या.

गेल्या वर्षीही पाण्याची समस्या उद्धभवली होती. मात्र, तेव्हा कसल्याही प्रकारचा ठराव न घेता नगरसेवकांनी स्वतःच्या टँकरने पाणीपुरवठा केला होता. यावर्षी ६ महिन्यांपूर्वीच सभेत पाणीपुरवठ्याबाबत ठराव घेत टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्याधिकाऱयांच्या वेळकाडू धोरणामुळे एप्रिल महिना संपल्यावरही टँकर उपल्बध होऊ शकले नाही, असा आरोप सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी केला. पाणी समस्येचे निवारण करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत विरोधकांनी अध्यक्ष आणि मुख्याधिकारी आणि पाणी पुरवठा विभागातील लोकांना धारेवर धरले.

शहारत खात रोडवरील परिसरात पाण्याची भीषण परिस्थिीत निर्माण झाली आहे. या परिसरातील ७० ते ८० टक्के घराचे बोर आटले आहेत. बैठकीत ठरल्याप्रमाणे नगर परिषदचे दोन टँकर आणि खाजगी ५ टँकर, अशा ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. दिवसाला १ टँकर ४ फेऱ्या मारणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष स्वतः भाजपचे उमेदवार असल्याने ते आणि सर्व नगरसेवक हे निवडणुकीत व्यस्त असल्याने पाणी प्रश्नाकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आणि त्याचा त्रास मात्र लोकांना सहन करावा लागला.

Intro:ANC : भंडारा शहरालगत वैनगंगा नदी दुथडी भरून आहे मात्र तरीही लोकांना पाणी मिळत नाही, पाण्यासाठी लोकांनी मोर्चे काढल्यानंतर तातडीने विशेष सभा घेऊन या समस्येवर मात करण्यासाठी 7 टँकर द्वारे शहरात पाणी पुरविल्या जाणार आहे, तसेच टिल्लू पंप लावून पाणी भरणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही होणार आहे.



Body:वैनगंगा नदी आहे, या नदीत गोसे प्रकल्पाचे बॅक वॉटर असल्याने नदी दुथडी वाहत आहे, मात्र या पाण्यात नागपूर च्या नाग नदीचा गडरचा पाणी येत असल्याने हा पाणी दूषित झाला आहे, आणि गडर च्या पाण्यामुळे पाण्याचे झरे बंद पडले आहेत त्यामुळे नदी जवळ असूनही पाण्याची पातळी खाली आहे. उन्हाळा सुरू होताच ही पाणी पातळी अजूनच खाली गेल्याने लोकांच्या, विहिरी, बोरवेल आटल्या त्यामुळे लोकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे, 123 वर्ष जुनी आणि 15 वर्ष पहिलेच काजलबाह्य असलेल्या नळ योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत आहे या मुळे कुठे गढूळ पाणी मिळते तर काही भागात पाणी पोहचत नाही. नगर परिषद तर्फे लोकांना न नळाद्वारे पाणी मिळत होते न टँकर द्वारे त्यामुळे लोकांचा संताप उडाला, लोकांनी मोर्चे काढले, घागर फोडल्या. लोकांचा संताप लक्षात येताच नगर पालिकेने तातडीची बैठक बोलाविली आणि काही उपाय योजना आखण्यात आल्या.

मागच्या वर्षीही पाण्याची समस्या उद्धभवली होती नगर सेवकांनी स्वतःचे टँकर ने पाणी पुरविला मात्र ठराव न घेता पाणी पुरविला असे सांगत बिल दिला गेला नाही त्यामुळे या वर्षी सहा महिन्यागीदार सभेत ठराव पाणी पुरवठ्या संबधी ठराव घेत टँकर देण्याचे निर्णय घेण्यात आले मात्र मुख्याधिकारी यांच्या वेळकाढू धोरणामुळे आणि हेकेखोर प्रवृत्तीमुळे एप्रिल महिना संपल्यावरही टँकर उपल्बध होऊ शकले नाही असा आरोप सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी लावला, पाणी समस्येचे निवारण करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत विरोधकांनी अध्यक्ष आणि मुख्याधिकारी आणि पाणी पुरवठा विभागातील लोकांना चांगकेच धारेवर धरले, शेवटी त्वरित टँकर देण्याचे आणि टिल्लू पंप धारकांवर कार्यवाही करण्याचे ठरले.

पाणी समस्या संपूर्ण शहरात आहे मात्र त्याची खरी झड ही खात रोड वरील परिसरात पडत आहे कारण या परिसरातील 70 ते 80 टक्के घराचे बोरावले आटल्या आहेत, तर विहिरी संपूर्णपणे आटल्या आहेत. बैठकीत ठरल्या प्रमाणे नगर परिषद चे दोन टँकर आणि खाजगी 5 टँकर अश्या 7 टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे, दिवसाला 1 टँकर 4 फेऱ्या मारणार आहे म्हणजे टँकर च्या 28 फेऱ्या दररोज मारून त्या द्वारे आवश्यक त्या परिसरात पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, पाणी गरजू लोकांना मिळावा आणि पाण्यासाठी लोकांमध्ये होणारा संघर्ष टाळावा या साठी खुद्द नगर सेवक सकाळ पासून सायंकाळपर्यंत टँकर सबोत राहून लोकांना पाणी देत आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष स्वतः भाजपचे उमेदवार असल्याने ते आणि सर्व नगर सेवक हे निवडणुकीत व्यस्त असल्याने पाणी प्रश्नाकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि त्यांचा त्रास मात्र लोकांना सहन करावा लागला.
बाईट : सुनील मेंढे, नगराध्यक्ष
संजय कुंभलकर, नगर सेवक
कल्पना लोंढे, नागरिक




Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.