ETV Bharat / state

देशाच्या जडणघडणीत हिंदुसोबत मुस्लीमांचेही योगदान - अबू आजमी

author img

By

Published : Jan 17, 2020, 11:56 AM IST

देशात लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे (सीएए) देशात अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या कायदयाच्या विरोधात समाजवादी पक्षाच्यावतीने संपूर्ण देशात संविधान व देश वाचवण्यासाठी असहयोग आंदोलन राबविण्यात येत आहे. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे दोघे मिळून या देशाला कुठे नेवून ठेवणार अशी चिंता वाटत असल्याचे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबु असीम आजमी यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना केले.

Abu azmi comment on CAA
अबू आजमी

बुलडाणा - देशात लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे (सीएए) देशात अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या कायदयाच्या विरोधात समाजवादी पक्षाच्यावतीने संपूर्ण देशात संविधान व देश वाचवण्यासाठी असहयोग आंदोलन राबविण्यात येत आहे. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे दोघे मिळून या देशाला कुठे नेवून ठेवणार अशी चिंता वाटत असल्याचे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबु असीम आजमी यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना केले. तसेच हिंदुसोबत मुस्लीमांचेही देशाच्या जडणघडणीत योगदान असल्याचे आजमी म्हणाले.

देशाच्या जडणघडणीत हिंदुसोबत मुस्लीमांचेही योगदान - अबू आजमी

देश सध्या अगदी नाजूक अवस्थेतून जात आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) देशात लागू करून भाजप प्रणित केंद्र शासनाने हिंदु-मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण केला आहे. सर्व धर्म समभाव असलेल्या या देशात हिंदुच्या सोबत मुस्लिमांनीसुद्धा भरीव योगदान दिल्याची इतिहासात नोंद आहे. मात्र, केंद्र शासनाने इतर जाती धर्मांना या कायदयाचा लाभ देवून मुस्लिमांना त्यापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र केले आहे. केंद्र शासनाच्या या धोरणाचा विरोध करण्यासाठीच संपूर्ण देशात संविधान बचाव देश बचाव यासाठी असहयोग आंदोलन राबविण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान यांनी नोटबंदीचा घेतलेला निर्णय हा अत्यंत चुकीचा होता. या निर्णयामुळे देशातील मोठमोठया बँका रिकाम्या झाल्याचे अबू आजमी म्हणाले.

अनेक मोठया लोकांनी बँकाचे मोठे कर्ज उचलून देशातून पळ काढला आहे. या बाबीचा सर्वसामान्य लोकांना फटका बसत आहे. यावर चिंता करण्याऐवजी केंद्र शासन हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करून देशात जातीयवाद करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्याबाबत पुस्तक काढण्यात आल्याबद्दल आजमी यांनी नाराजी व्यक्त केली. छत्रपती शिवराय यांची तुलना कोणासोबतच करता येत नाही. तसेच तशी तुलना करणे म्हणजे शिवरायांना कमी लेखने होय असे आजमी म्हणाले. छत्रपतींच्या राजवटीत आर्मी चिफ म्हणून मुस्लिम व्यक्तीवर जबाबदारी होती असेही आजमी म्हणाले.

बुलडाणा - देशात लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे (सीएए) देशात अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या कायदयाच्या विरोधात समाजवादी पक्षाच्यावतीने संपूर्ण देशात संविधान व देश वाचवण्यासाठी असहयोग आंदोलन राबविण्यात येत आहे. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे दोघे मिळून या देशाला कुठे नेवून ठेवणार अशी चिंता वाटत असल्याचे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबु असीम आजमी यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना केले. तसेच हिंदुसोबत मुस्लीमांचेही देशाच्या जडणघडणीत योगदान असल्याचे आजमी म्हणाले.

देशाच्या जडणघडणीत हिंदुसोबत मुस्लीमांचेही योगदान - अबू आजमी

देश सध्या अगदी नाजूक अवस्थेतून जात आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) देशात लागू करून भाजप प्रणित केंद्र शासनाने हिंदु-मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण केला आहे. सर्व धर्म समभाव असलेल्या या देशात हिंदुच्या सोबत मुस्लिमांनीसुद्धा भरीव योगदान दिल्याची इतिहासात नोंद आहे. मात्र, केंद्र शासनाने इतर जाती धर्मांना या कायदयाचा लाभ देवून मुस्लिमांना त्यापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र केले आहे. केंद्र शासनाच्या या धोरणाचा विरोध करण्यासाठीच संपूर्ण देशात संविधान बचाव देश बचाव यासाठी असहयोग आंदोलन राबविण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान यांनी नोटबंदीचा घेतलेला निर्णय हा अत्यंत चुकीचा होता. या निर्णयामुळे देशातील मोठमोठया बँका रिकाम्या झाल्याचे अबू आजमी म्हणाले.

अनेक मोठया लोकांनी बँकाचे मोठे कर्ज उचलून देशातून पळ काढला आहे. या बाबीचा सर्वसामान्य लोकांना फटका बसत आहे. यावर चिंता करण्याऐवजी केंद्र शासन हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करून देशात जातीयवाद करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्याबाबत पुस्तक काढण्यात आल्याबद्दल आजमी यांनी नाराजी व्यक्त केली. छत्रपती शिवराय यांची तुलना कोणासोबतच करता येत नाही. तसेच तशी तुलना करणे म्हणजे शिवरायांना कमी लेखने होय असे आजमी म्हणाले. छत्रपतींच्या राजवटीत आर्मी चिफ म्हणून मुस्लिम व्यक्तीवर जबाबदारी होती असेही आजमी म्हणाले.

Intro:Body:mh_bul_Non-cooperation movement in the country_10047

Story : संविधान वाचविण्यासाठी देशात असहयोग आंदोलन - अबु आझमी.
भाजपा व राष्ट्रीय सेवंक संघ हे दोघे मिळून या देशाला कुठे नेवून ठेवणार अशी चिंता व्यक्त

बुलडाणा : देशात लागू करण्यात आलेल्या सीएए हा नागरिकत्व सुधारणा कायदा यामुळे देशात अशांततेचे वातावरण असून या कायदयाच्या विरोधात समाजवादी पक्षाच्यावतीने संपूर्ण देशात संविधान व देश वाचविण्यासाठी असहयोग आंदोलन राबविण्यात येत असून भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय सेवंक संघ हे दोघे मिळून या देशाला कुठे नेवून ठेवणार अशी चिंता व्यक्त असल्याचे समाजवादी पक्षाचे आमदार अबु असीम आजमी यांनी गुरुवारी पत्रकार ई टीव्ही भारत शी बोलतांना दिली. एन आर. सी संदर्भात सभेसाठी ते शेगावात असता ते बोलत होते.
अबु आजमी पुढे म्हणाले की, देश सध्या अगदी नाजुक अवस्थेतुन जात आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) देशात लागू करून भाजपा प्रणित केंद्र शासनाने हिंदु-मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण केल्याचे कार्य केले आहे. सर्व धर्म समभाव असलेल्या या देशात हिंदुच्या सोबत मुस्लिमांनी सुद्धा भरीव योगदान दिल्याचे इतिहासात नोंद आहे. मात्र, केंद्र शासनाने इतर जाती धर्मांना या कायदयाचा लाभ देवून मुस्लिमांना त्यापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र केले आहे. केंद्र शासनाच्या या धोरणाचा विरोध करण्यासाठीच संपूर्ण देशात संविधान बचाव देश बचाव यासाठी असहयोग आंदोलन राबविण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान यांनी नोट बंदीचा घेतलेला निर्णय हा अत्यंत चुकीचा होता. या निर्णयामुुळे देशातील मोठमोठया बँका रिकाम्या झाल्या आहेत. अनेक मोठया लोकांनी बँकाचे मोठे कर्ज उचलून देशातून पळून गेले आहे. या बाबीचा सर्व सामान्य लोकांना फटका बसत आहे. यावर चिंता करण्याऐवजी केंद्र शासन हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करून देशात जाती वाद करीत आहे. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्याबाबत पुस्तक काढण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. छत्रपती शिवराय यांची तुलना कोणासोबतच करता येत नाही. तसेच तशी तुलना करणे म्हणजे शिवरायांना कमी लेखने होय असे सांगितले. छत्रपतींच्या राजवटीत आर्मी चिफ म्हणून मुस्लिम व्यक्तीवर जबाबदारी होती. असेही त्यांनी नमूद केले आहे. भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय सेवंक संघ हे दोघे मिळून या देशाला कुठे नेवून ठेवणार अशी चिंता व्यक्त केली. बुलढाणा जिल्ह्यात नांदुरा जळगाव जामोद आणि शेगावात गुरुवारी होणाऱ्या जाहीर सर्वांसाठी ते आले होतेConclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.