ETV Bharat / state

उत्तर प्रदेशातील महिला अत्याचाराच्या विरोधात बीडमध्ये घंटानाद आंदोलन

उत्तर प्रदेश राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात शनिवारी बीड राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी महिलांनी घंटानाद आंदोलन करून, उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला. शहरातील मुख्य टपाल कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले.

author img

By

Published : Jan 10, 2021, 4:18 PM IST

महिला अत्याचाराच्या विरोधात बीडमध्ये घंटानाद आंदोलन
महिला अत्याचाराच्या विरोधात बीडमध्ये घंटानाद आंदोलन

बीड- उत्तर प्रदेश राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात शनिवारी बीड राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी महिलांनी घंटानाद आंदोलन करून, उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला. शहरातील मुख्य टपाल कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले.

एका 50 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली होती. या घटनेच्या विरोधात बीडमध्ये राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. उत्तर प्रदेश सरकार महिलंवरील अत्याचाराबाबत गंभीर नसल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच यावेळी आंदोलक महिलांकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र देखील लिहिण्यात आले आहे. हे पत्र योगी आदित्यनाथ यांना पाठवण्यासाठी टपाल मास्तरांना देण्यात आले.

महिला अत्याचाराच्या विरोधात बीडमध्ये घंटानाद आंदोलन

महिला असुरक्षित असल्याचा आरोप

उत्तर प्रदेशातील महिलांवर अत्याचार दिवसेंदिवस वाढत असून, त्याबाबत योगी सरकार गंभीर नाही. फक्त शहरांची नावे बदलण्यातच उत्तर प्रदेशातील सरकार गुंग आहे. त्यांना महिला सुरक्षेचे काहीही घेणेदेणे नाही. लहान मुली, युवती, यांच्यासह वृद्ध महिलांवर देखील अत्याचार होत आहेत. मात्र सरकार गप्प असल्याचा आरोप या आंदोलक महिलांनी केला आहे.

बीड- उत्तर प्रदेश राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात शनिवारी बीड राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी महिलांनी घंटानाद आंदोलन करून, उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला. शहरातील मुख्य टपाल कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले.

एका 50 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली होती. या घटनेच्या विरोधात बीडमध्ये राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. उत्तर प्रदेश सरकार महिलंवरील अत्याचाराबाबत गंभीर नसल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच यावेळी आंदोलक महिलांकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र देखील लिहिण्यात आले आहे. हे पत्र योगी आदित्यनाथ यांना पाठवण्यासाठी टपाल मास्तरांना देण्यात आले.

महिला अत्याचाराच्या विरोधात बीडमध्ये घंटानाद आंदोलन

महिला असुरक्षित असल्याचा आरोप

उत्तर प्रदेशातील महिलांवर अत्याचार दिवसेंदिवस वाढत असून, त्याबाबत योगी सरकार गंभीर नाही. फक्त शहरांची नावे बदलण्यातच उत्तर प्रदेशातील सरकार गुंग आहे. त्यांना महिला सुरक्षेचे काहीही घेणेदेणे नाही. लहान मुली, युवती, यांच्यासह वृद्ध महिलांवर देखील अत्याचार होत आहेत. मात्र सरकार गप्प असल्याचा आरोप या आंदोलक महिलांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.