ETV Bharat / state

'नवचेतना' संस्थेच्या वतीने 5000 कुटुंबीयांना मोफत किराणा - बीडमध्ये किराणा साहित्य वाटप

जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. अशा स्थितीत हातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थितीत बीड जिल्ह्यातील सामाजिक बांधिलकी जपत 'नवचेतना' सामाजिक संस्थेच्या वतीने पाच हजार कुटुंबीयांना मोफत किराणा दिला आहे.

beed
'नवचेतना' संस्थेच्या वतीने 5000 कुटुंबीयांना मोफत किराणा
author img

By

Published : Apr 2, 2020, 5:48 PM IST


बीड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत हाताला काम नसलेल्या व भूमिहीन असलेल्या गोरगरीब नागरिकांना मोफत किराणा साहित्य देण्याचा उपक्रम बीडमध्ये राबविला आहे. येथील नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, सी आय आय फाउंडेशन दिल्ली, गुंज संस्था, इंडिया बॉल फाउंडेशन, इन्फोसेस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील 5 हजार कुटुंबीयांना मोफत किराणा साहित्य वाटप करण्यात आले आहे. कोरोना विषाणूमुळे कराव्या लागणाऱ्या प्रतिबंधक उपाययोजनांमुळे संपूर्ण देशभर लॉकडाऊन आहे. अशा बिकट परिस्थितीत गोरगरिबांचे हाल होऊ नयेत, यासाठी 'नवचेतना' सामाजिक संस्था समोर आल्याचे संस्थेच्या प्रमुख मनीषा घुले यांनी सांगितले.

'नवचेतना' संस्थेच्या वतीने 5000 कुटुंबीयांना मोफत किराणा
बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. कारखाने बंद झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मजूर गावाकडे परतत आहेत. अशा परिस्थितीत खायचं काय? हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. अशा बिकट परिस्थितीत बीड येथील नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र व इतर संस्था मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 5000 कुटुंबीयांना एक महिन्याचा किराणा देण्यात येत आहे. बुधवारी बीड शहरातील गोरगरीब व मजूर असलेल्या नागरिकांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले.

लहान मुलांसाठी गूंज संस्था व इंडिया बॉल संस्थेच्यावतीने पोस्टीक आहार देखील वाटप करण्यात येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश गिरी यांनी यावेळी सांगितले.


बीड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत हाताला काम नसलेल्या व भूमिहीन असलेल्या गोरगरीब नागरिकांना मोफत किराणा साहित्य देण्याचा उपक्रम बीडमध्ये राबविला आहे. येथील नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, सी आय आय फाउंडेशन दिल्ली, गुंज संस्था, इंडिया बॉल फाउंडेशन, इन्फोसेस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील 5 हजार कुटुंबीयांना मोफत किराणा साहित्य वाटप करण्यात आले आहे. कोरोना विषाणूमुळे कराव्या लागणाऱ्या प्रतिबंधक उपाययोजनांमुळे संपूर्ण देशभर लॉकडाऊन आहे. अशा बिकट परिस्थितीत गोरगरिबांचे हाल होऊ नयेत, यासाठी 'नवचेतना' सामाजिक संस्था समोर आल्याचे संस्थेच्या प्रमुख मनीषा घुले यांनी सांगितले.

'नवचेतना' संस्थेच्या वतीने 5000 कुटुंबीयांना मोफत किराणा
बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. कारखाने बंद झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मजूर गावाकडे परतत आहेत. अशा परिस्थितीत खायचं काय? हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. अशा बिकट परिस्थितीत बीड येथील नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र व इतर संस्था मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 5000 कुटुंबीयांना एक महिन्याचा किराणा देण्यात येत आहे. बुधवारी बीड शहरातील गोरगरीब व मजूर असलेल्या नागरिकांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले.

लहान मुलांसाठी गूंज संस्था व इंडिया बॉल संस्थेच्यावतीने पोस्टीक आहार देखील वाटप करण्यात येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश गिरी यांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.