ETV Bharat / state

बीड ठरतोय महाराष्ट्रातील छोटा बिहार; राजकीय वैमनस्यातून वाढतायत खून अन् मारामाऱ्या

author img

By

Published : Mar 28, 2019, 6:16 PM IST

Updated : Mar 28, 2019, 10:08 PM IST

बीडची वाटचाल बिहारकडे होत असून जिह्यात राजकीय वैमनस्यातून खून अन् मारामाऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

पोलीस

बीड - सध्या जिल्ह्यात राजकीय वैमनस्यातून खून अन् मारामाऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बिहार म्हणून बीडची ओळख होऊ लागली आहे.

मागील २ दिवसापूर्वी राजकीय वैमनस्यातून परळी येथे खून झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. याशिवाय बुधवारी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसाढवळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंद आहे. त्यामुळे जिह्यात लोकसभा निवडणूक निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पडतील का? असा प्रश्न आता बीडकर यांच्या मनात निर्माण झाला आहे.

काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे

राजकारण म्हटले, की आरोप-प्रत्यारोप होतच असतात. पूर्वी निवडणुकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडणारे नेते निवडणुका संपल्यानंतर एकमेकांबाबत दुरावा ठेवत नव्हते. मात्र, अलीकडच्या काळात बीडमध्ये हे होताना दिसत नाही. येथील राजकारणाला गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. ३ दिवसापूर्वी जिल्ह्यातील परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाचा निर्घुण खून करण्यात आला. याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेतून हा खून भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा जाहीर आरोप केला. यामुळे राजकारणात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण राहिले नसल्याचा प्रत्यय बीडच्या जनतेला येत आहे.

नगरसेवकाच्या खुनाची घटना ताजी असतानाच गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. भाजपच्या लोकसभेचा उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्ज आणि अर्जासोबत दिलेली माहिती अपूर्ण आहे. तसेच त्यांनी बहुतांश माहिती लपवली असल्याचा आक्षेप मुंडे यांनी घेतला होता. त्यांच्या या आक्षेपामुळेच त्यांच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात हल्ला झाला. या हल्ल्यावेळी पोलीस जवळ असताना देखील पोलिसांनी तो हल्ला रोखला नाही. या सर्व घटनांमुळे बीडची वाटचाल बिहारकडे होत असल्याचा प्रत्यय बीडकरांना येऊ लागला आहे.

बीड - सध्या जिल्ह्यात राजकीय वैमनस्यातून खून अन् मारामाऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बिहार म्हणून बीडची ओळख होऊ लागली आहे.

मागील २ दिवसापूर्वी राजकीय वैमनस्यातून परळी येथे खून झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. याशिवाय बुधवारी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसाढवळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंद आहे. त्यामुळे जिह्यात लोकसभा निवडणूक निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पडतील का? असा प्रश्न आता बीडकर यांच्या मनात निर्माण झाला आहे.

काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे

राजकारण म्हटले, की आरोप-प्रत्यारोप होतच असतात. पूर्वी निवडणुकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडणारे नेते निवडणुका संपल्यानंतर एकमेकांबाबत दुरावा ठेवत नव्हते. मात्र, अलीकडच्या काळात बीडमध्ये हे होताना दिसत नाही. येथील राजकारणाला गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. ३ दिवसापूर्वी जिल्ह्यातील परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाचा निर्घुण खून करण्यात आला. याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेतून हा खून भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा जाहीर आरोप केला. यामुळे राजकारणात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण राहिले नसल्याचा प्रत्यय बीडच्या जनतेला येत आहे.

नगरसेवकाच्या खुनाची घटना ताजी असतानाच गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. भाजपच्या लोकसभेचा उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्ज आणि अर्जासोबत दिलेली माहिती अपूर्ण आहे. तसेच त्यांनी बहुतांश माहिती लपवली असल्याचा आक्षेप मुंडे यांनी घेतला होता. त्यांच्या या आक्षेपामुळेच त्यांच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात हल्ला झाला. या हल्ल्यावेळी पोलीस जवळ असताना देखील पोलिसांनी तो हल्ला रोखला नाही. या सर्व घटनांमुळे बीडची वाटचाल बिहारकडे होत असल्याचा प्रत्यय बीडकरांना येऊ लागला आहे.

Intro:

बीड ची वाटचाल बिहारकडे; राजकीय वैमनस्यातून होतायत खून अन मारामाऱ्या

बीड- सध्या लोकसभा निवडणुकीचा माहोल सुरू आहे. निर्भय व मुक्त वातावरणात पार पडतील अशी सर्वसामान्य माणसांची अपेक्षा असतानाच मागील दोन दिवसात बीड जिल्ह्यात राजकीय वैमनस्यातून परळी येथे खून झाला. या घटनेमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. याशिवाय बुधवारी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसाढवळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंद आहे. लोकसभा निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पडतील का असा प्रश्न आता बीडकर यांच्या मनात निर्माण होत आहे. कारण बीडची वाटचाल बिहार कडे होत असल्याचा प्रत्यय 'कॉमन मॅनला' येत आहे. विशेष म्हणजे बीड पोलिसांनी निवडणुकीच्या काळात गोंधळ घालणाऱ्यांना व गुन्हे दाखल असलेल्यांना तडीपार करणे अपेक्षित होते. काही बोटावर मोजता येतील एवढ्याच प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र ज्यांना तडीपार करायचे होते त्यांना केलेले नसल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे.


Body:राजकारण म्हटले की, आरोप-प्रत्यारोप होणारच. यापूर्वी निवडणुका आल्या की, एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडणारे नेते निवडणुका संपल्यानंतर एक दुसऱ्याबाबत दुरावा ठेवत नव्हते. मात्र अलीकडच्या काळात बीडच्या राजकारणाला गुन्हेगारीचे ग्रहण अधिक गतीने लागले आहे. तीन दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवकाचा निर्घुण खून करण्यात आला याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेतून हा खून भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा जाहीर आरोप केला. राजकारणात काम करणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये खेळीमेळीचे वातावरण राहिले नसल्याचा प्रत्यय बीडच्या जनतेला येत आहे.


Conclusion:बीड जिल्ह्यातील परळी येथील नगरसेवकाच्या खुनाची घटना घडून दोन दिवस होतात न होतात तोच बीड जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेसचे कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. भाजपच्या लोकसभेचा उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्ज व अर्जासोबत दिलेल्या माहिती अपूर्ण आहे. बहुतांश माहिती प्रीतम मुंडे यांनी लपवली असल्याचा अक्षेप दादासाहेब मुंडे यांनी घेतला होता. त्यांच्या या अक्षेपा मुळेच त्यांच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात हल्ला झाला. विशेष म्हणजे हल्ल्यादरम्यान पोलिस जवळ असताना देखील पोलिसांनी तो हल्ला रोखला नाही. या सर्व घटनांमुळे बीडची वाटचाल बिहारकडे होत असल्याचा प्रत्यय बीडकरांना येऊ लागला आहे.
Last Updated : Mar 28, 2019, 10:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.