ETV Bharat / state

Nath Maharaj Palkhi: नाथ महाराजांची मानाची तिसरी पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ

author img

By

Published : Jun 10, 2023, 11:01 PM IST

पैठण येथून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान केले. दरवर्षी प्रमाणे सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेस ही पालखी एकनाथ मंदिरातून पंढरपूर कडे रवाना झाली. तब्बल 19 मुक्काम करत नाथांची पालखी पंढरपुरात आषाढी एकादशीला दाखल होईल. एकनाथ महाराजांच्या पालखीला राज्यातील तिसरी मानाची पालखी म्हणून ओळखले जाते. हजारो वारकरी मोठ्या भक्तिभावाने वारीत सहभागी होतात, अनेक अडचणी असल्या तरी पंढरपूर पर्यंतचा पायी होणार प्रवास पर्वणी समजाला जातो.

Nath Maharaj Palkhi
पालखी
नाथ महाराजांच्या पालखीविषयी माहिती घेताना

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): जिल्ह्याला नाथांची भूमी म्हणून ओळखले जाते. एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पैठण येथून गेल्या 424 वर्षांपासून पंढरपूरच्या दिशेने पालखी काढण्यात येते. आषाढी एकादशीच्या एकोणवीस दिवस आधी नाथांच्या पादुका असलेली पालखी रथातून मार्गस्थ होतात. रोज रात्री पालखी मुक्काम असलेल्या ठिकाणी सर्व प्रथम आरती केली जाते. त्यानंतर पांडुरंगाचे नामस्मरण, भजन कीर्तन करत सोहळा साजरा केला जातो. पैठण ते पंढरपूर एकोनाविस दिवसांचा प्रवास भक्तिमय वातावरणात, देवांचे नामस्मरण करत पूर्ण केला जातो. या काळात वारकऱ्यांमध्ये वेगळा उत्साह दिसून येतो, बहुतांश वारकरी वृध्द असले तरी त्यांना थकवा जाणवत नाही अशी महती वारकरी सांगतात.


चार रिंगण होणार: राज्यातील तिसरी मानाची पालखी म्हणून मान असणाऱ्या एकनाथ महाराजांची पालखी शनिवारी सायंकाळी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. एकोणाविस दिवस प्रवास करत असताना भक्तांना भावणारा सोहळा म्हणजे रिंगण.. नाथ महाराजांचे प्रस्थान झाल्यावर प्रवासात चार रिंगण सोहळे होतात, वारकऱ्यांना भवणाऱ्या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभाग घेतात. या सोहळ्यात तीन गोल तर एक उभे रिंगण सोहळा पार पडतो. तर पैठण येथून प्रवास सुरू होत असताना जवळपास 45 दिंडी रथासोबत यंदा जात आहेत अशी माहिती नाथ महाराजांचे वंशज योगेश गोसावी यांनी दिली.


हातकर वाडी येथे सन्मान: संत एकनाथ महाराजांच्या पालखीला प्रवासात हातकरवाडी येथील गावकरी वेगळ्या पद्धतीचा सन्मान दरवर्षी देतात. गावातील लोक पालखी येण्याच्या आधी चार दिवस उपवास करतात, त्यानंतर नाथ महाराजांच्या वंशज यांना एका बैलगाडीत बसवलं जातं आणि ती गाडी पूर्ण घाट मार्गातून गावकरी स्वतः ओढून नेतात. ही परंपरा बंद करावी अशी इच्छा नाथवंशज गोसावी कुटुंब यांनी केले मात्र श्रद्धा असल्याने ही प्रथा चालू ठेवतात. मात्र गावात वेगळाच उत्साह दिसून येतो अशी माहिती नाथ वंशज योगेश गोसावी यांनी दिली.


मान आहे मात्र सन्मान नाही: राज्यात देहू आळंदी नंतर महत्वाची असलेली संत एकनाथ महाराजांची पालखी असली तरी सन्मान मात्र अद्याप कधीही मिळाला नाही. 19 दिवसाच्या प्रवासात अनेक सोयी सुविधांपासून आजही वारकरी दूर राहतात. जाताना योग्य ठिकाणी थांबे त्यासाठी मोकळी जागा नसते. पाण्याची व्यवस्था योग्य प्रमाणात नसते. त्याचबरोबर ॲम्बुलन्स असली तरी त्यात वैद्यकीय अधिकारी नसतात. त्यामुळे या सगळ्या सुविधा देखील गेल्या पाहिजे अशी मागणी योगेश बुवा गोसावी यांनी केली.

नाथ महाराजांच्या पालखीविषयी माहिती घेताना

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): जिल्ह्याला नाथांची भूमी म्हणून ओळखले जाते. एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पैठण येथून गेल्या 424 वर्षांपासून पंढरपूरच्या दिशेने पालखी काढण्यात येते. आषाढी एकादशीच्या एकोणवीस दिवस आधी नाथांच्या पादुका असलेली पालखी रथातून मार्गस्थ होतात. रोज रात्री पालखी मुक्काम असलेल्या ठिकाणी सर्व प्रथम आरती केली जाते. त्यानंतर पांडुरंगाचे नामस्मरण, भजन कीर्तन करत सोहळा साजरा केला जातो. पैठण ते पंढरपूर एकोनाविस दिवसांचा प्रवास भक्तिमय वातावरणात, देवांचे नामस्मरण करत पूर्ण केला जातो. या काळात वारकऱ्यांमध्ये वेगळा उत्साह दिसून येतो, बहुतांश वारकरी वृध्द असले तरी त्यांना थकवा जाणवत नाही अशी महती वारकरी सांगतात.


चार रिंगण होणार: राज्यातील तिसरी मानाची पालखी म्हणून मान असणाऱ्या एकनाथ महाराजांची पालखी शनिवारी सायंकाळी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. एकोणाविस दिवस प्रवास करत असताना भक्तांना भावणारा सोहळा म्हणजे रिंगण.. नाथ महाराजांचे प्रस्थान झाल्यावर प्रवासात चार रिंगण सोहळे होतात, वारकऱ्यांना भवणाऱ्या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभाग घेतात. या सोहळ्यात तीन गोल तर एक उभे रिंगण सोहळा पार पडतो. तर पैठण येथून प्रवास सुरू होत असताना जवळपास 45 दिंडी रथासोबत यंदा जात आहेत अशी माहिती नाथ महाराजांचे वंशज योगेश गोसावी यांनी दिली.


हातकर वाडी येथे सन्मान: संत एकनाथ महाराजांच्या पालखीला प्रवासात हातकरवाडी येथील गावकरी वेगळ्या पद्धतीचा सन्मान दरवर्षी देतात. गावातील लोक पालखी येण्याच्या आधी चार दिवस उपवास करतात, त्यानंतर नाथ महाराजांच्या वंशज यांना एका बैलगाडीत बसवलं जातं आणि ती गाडी पूर्ण घाट मार्गातून गावकरी स्वतः ओढून नेतात. ही परंपरा बंद करावी अशी इच्छा नाथवंशज गोसावी कुटुंब यांनी केले मात्र श्रद्धा असल्याने ही प्रथा चालू ठेवतात. मात्र गावात वेगळाच उत्साह दिसून येतो अशी माहिती नाथ वंशज योगेश गोसावी यांनी दिली.


मान आहे मात्र सन्मान नाही: राज्यात देहू आळंदी नंतर महत्वाची असलेली संत एकनाथ महाराजांची पालखी असली तरी सन्मान मात्र अद्याप कधीही मिळाला नाही. 19 दिवसाच्या प्रवासात अनेक सोयी सुविधांपासून आजही वारकरी दूर राहतात. जाताना योग्य ठिकाणी थांबे त्यासाठी मोकळी जागा नसते. पाण्याची व्यवस्था योग्य प्रमाणात नसते. त्याचबरोबर ॲम्बुलन्स असली तरी त्यात वैद्यकीय अधिकारी नसतात. त्यामुळे या सगळ्या सुविधा देखील गेल्या पाहिजे अशी मागणी योगेश बुवा गोसावी यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.