ETV Bharat / state

छोट्या गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक

author img

By

Published : Jan 9, 2020, 3:24 PM IST

भगीरथ बजाज या भामट्याने औरंगाबादमधे आलिशान ऑफिस थाटून 'छोटी बचत'च्या माध्यमातून गोविंद कुरीज नावाने भिशी चालवण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. या भिशीत सुरुवातीला त्याने चांगला परतावा दिला. नंतर लोकांचा विश्वास संपादन करून या भामट्याने जवळपास १० ते २० कोटींचा गंडा घालून पळ काढला.

छोट्या गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक
छोट्या गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक

औरंगाबाद - भिशीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक केल्याची घटना औरंगाबादेत उघडकीस आली. गोविंद कुरीज या कंपनीने छोट्या व्यावसायिकांची शासनमान्य भिशी असल्याचा बनाव करत ही फसवणूक केली आहे. यामध्ये ४०० हून अधिक छोट्या व्यापाऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

छोट्या गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक

भगीरथ बजाज या भामट्याने औरंगाबदमधे आलिशान ऑफिस थाटून 'छोटी बचत'च्या माध्यमातून भिशी चालवण्याचा गोरखधंदा सुरू केला. गोविंद कुरीज नावाने सुरू केलेल्या या भिशीत सुरुवातीला चांगला परतावा त्याने दिला. लोकांचा विश्वास संपादन करून या भामट्याने जवळपास १० ते २० कोटींचा गंडा घालून पळ काढला.

औरंगाबादच्या गरखेडा येथे भगीरथ बजाज या भामट्याने भिशी चालवण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. सरकारमान्य भिशी असल्याची बतावणी बजाज याने केली. या भिशीत त्याने छोट्या व्यावसायिकांना लक्ष करत वेगवेगळी आमिष दाखवून त्यांना गुंतवणूक कारायला लावली. सुरुवातीला भिशीच्या माध्यमातून व्यावसायिकांना फायदा झाला. अनेक व्यावसायिकांनी रोजची कमाई बचत म्हणून गोविंदा कुरीजमध्ये जमा करायला सुरुवात केली. पैसे जमा करण्यासाठी भगीरथ बजाज यांचा कर्मचारी रोज कलेक्शनसाठी जाऊ लागला. पैसे जमा करताना सर्व ठेवीदारांना पासबुक देखील देण्यात आले होते.

सरकारमान्य भिशी असल्याचे सांगितल्यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांनी ज्यामध्ये विशेषतः पाणीपुरी विकणारे, भेळपुरीची गाडी लावणारे, फळ विक्री करणारे, छोटी किराणा दुकाने चालवणारे, सलून चालक अशा अनेक छोट्या व्यावसायिकांनी गेल्या ४-५ वर्षांपासून आपल्या कष्टाची कमाई गोविंदा कुरीजकडे जमा केली. मात्र, ३० डिसेंबरला अचानक भगीरथ बजाज याने कार्यालय बंद करत पळ काढल्याचे समोर आले. त्याने त्याचे मोबाईल बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचे ठेवीदारांना कळले. याप्रकरणी फसवणूक झालेल्या व्यावसायिकांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

हेही वाचा - पैठण-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नीसह एकाचा जागीच मृत्यू

पोलीस आयुक्तांनी प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवले असून पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. २ दिवसात जवळपास ५० लाखांच्या फसवणुकीच्या तक्रारींची नोंद करण्यात आली असून हा आकडा १० कोटींच्या वर जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
हेही वाचा - मुंबई वगळता एमआयएमच्या राज्यातील सर्व कार्यकारणी बरखास्त

औरंगाबाद - भिशीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक केल्याची घटना औरंगाबादेत उघडकीस आली. गोविंद कुरीज या कंपनीने छोट्या व्यावसायिकांची शासनमान्य भिशी असल्याचा बनाव करत ही फसवणूक केली आहे. यामध्ये ४०० हून अधिक छोट्या व्यापाऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

छोट्या गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक

भगीरथ बजाज या भामट्याने औरंगाबदमधे आलिशान ऑफिस थाटून 'छोटी बचत'च्या माध्यमातून भिशी चालवण्याचा गोरखधंदा सुरू केला. गोविंद कुरीज नावाने सुरू केलेल्या या भिशीत सुरुवातीला चांगला परतावा त्याने दिला. लोकांचा विश्वास संपादन करून या भामट्याने जवळपास १० ते २० कोटींचा गंडा घालून पळ काढला.

औरंगाबादच्या गरखेडा येथे भगीरथ बजाज या भामट्याने भिशी चालवण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. सरकारमान्य भिशी असल्याची बतावणी बजाज याने केली. या भिशीत त्याने छोट्या व्यावसायिकांना लक्ष करत वेगवेगळी आमिष दाखवून त्यांना गुंतवणूक कारायला लावली. सुरुवातीला भिशीच्या माध्यमातून व्यावसायिकांना फायदा झाला. अनेक व्यावसायिकांनी रोजची कमाई बचत म्हणून गोविंदा कुरीजमध्ये जमा करायला सुरुवात केली. पैसे जमा करण्यासाठी भगीरथ बजाज यांचा कर्मचारी रोज कलेक्शनसाठी जाऊ लागला. पैसे जमा करताना सर्व ठेवीदारांना पासबुक देखील देण्यात आले होते.

सरकारमान्य भिशी असल्याचे सांगितल्यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांनी ज्यामध्ये विशेषतः पाणीपुरी विकणारे, भेळपुरीची गाडी लावणारे, फळ विक्री करणारे, छोटी किराणा दुकाने चालवणारे, सलून चालक अशा अनेक छोट्या व्यावसायिकांनी गेल्या ४-५ वर्षांपासून आपल्या कष्टाची कमाई गोविंदा कुरीजकडे जमा केली. मात्र, ३० डिसेंबरला अचानक भगीरथ बजाज याने कार्यालय बंद करत पळ काढल्याचे समोर आले. त्याने त्याचे मोबाईल बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचे ठेवीदारांना कळले. याप्रकरणी फसवणूक झालेल्या व्यावसायिकांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

हेही वाचा - पैठण-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नीसह एकाचा जागीच मृत्यू

पोलीस आयुक्तांनी प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवले असून पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. २ दिवसात जवळपास ५० लाखांच्या फसवणुकीच्या तक्रारींची नोंद करण्यात आली असून हा आकडा १० कोटींच्या वर जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
हेही वाचा - मुंबई वगळता एमआयएमच्या राज्यातील सर्व कार्यकारणी बरखास्त

Intro:भिशीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक केल्याची घटना औरंगाबादेत उघडकीस आली. गोविंद कुरीज या कंपनीने छोट्या व्यावसायिकांची शासन मान्य भिशी असल्याचा बनाव करत ही फसवणूक केली आहे. 400 हुन अधिक छोट्या व्यापाऱ्यांची फसवणूक झाल्याची प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.


Body:भगीरथ बजाज या भामट्याने औरंगाबद मधे आलिशान ऑफिस थाटून छोटी बचत च्या माध्यमातून भिशी चालवण्याचा गोरख धंदा सुरू केला होता. गोविंद कुरीज नावाने सुरू केलेल्या या भिशीत सुरुवातीला चांगला परतावा त्याने दिला. लोकांचा विश्वास संपादन करून या भामट्याने जवळपास 10 ते 20 कोटींचा गंडा घालून पळ काढला.


Conclusion:औरंगाबादच्या गरखेडा येथे भगीरथ बजाज या भामट्याने भिशी चालवण्याचा गोरख धंदा सुरू केला. सरकार मान्य भिशी असल्याची बतावणी बजाज यांनी केली. या भिशीत त्याने छोट्या व्यावसायिकांना लक्ष करत वेगवेगळी आमिष दाखवून त्यांना गुंतवणूक कारायला लावली. सुरुवातीला भिशीच्या माध्यमातून व्यावसायिकांना फायदा झाला. अनेक व्यावसायिकांनी रोजची कमाई बचत म्हणून गोविंदा कुरुज मध्ये जमा करायला सुरुवात केली. पैसे जमा करण्यासाठी भगीरथ बजाज यांचा कर्मचारी रोज कलेक्शन साठी जाऊ लागला होता. पैसे जमा करताना सर्व ठेवीदारांना पासबुक देखील देण्यात आले. हराशीची सरकार मान्य भिशी असल्याने अनेक छोट्या व्यावसायिकांनी ज्यामध्ये विशेषतः पाणीपुरी विकणारे, भेळपुरीची गाडी लावणारे, फळ विक्री करणारे, छोटी किराणा दुकान चालवणारे, सलून चालक अश्या अनेक छोट्या व्यावसायिकांनी ज्यांचं हातावर पोट असणाऱ्यानी गेली चार पाच वर्षांपासून आपली कष्टाची कमाई गोविंदा कुरुज कडे जमा केली. मात्र 30 डिसेंबरला अचानक भगीरथ बजाज यांनी कार्यालय बंद करत पळ काढल्याच समोर आलं. त्याने त्याचे मोबाईल बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचं ठेवीदारांना कळाल. फसवणूक झालेल्या व्यावसायिकांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस आयुक्तांनी प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवले असून पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दोन दिवसात जवळपास पन्नास लाखांच्या फसवणुकीच्या तक्रारींची नोंद करण्यात आली असून हा आकडा दहा कोटींच्या वर जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.