ETV Bharat / state

२० वर्षापासून औरंगाबादचा विकास थांबला होता - खासदार इम्तियाज जलील - lok sabha

औरंगाबाद शहराचा विकास २० वर्षापासून औरंगाबादचा विकास थांबला होता. आता तो सुरू होईल, अशी प्रतिक्रिया औरंगाबाद शहराचे एमआयएमचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

खासदार इम्तियाज जलील
author img

By

Published : May 24, 2019, 7:46 AM IST

औरंगाबाद - मागील २० वर्षापासून औरंगाबादचा विकास थांबला होता, आता तो सुरू होईल, अशी प्रतिक्रिया औरंगाबाद शहराचे एमआयएमचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आला. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात इम्तियाज जलील यांचा विजय झाला.

एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत धक्का दिला. मिळालेला विजय हा औरंगाबादच्या सर्वच मतदारांचा असल्याचे इम्तियाज जलील यांनी विजय झाल्यावर सांगितले. तर खैरे यांनी माझे बॅडलक, असे म्हणत काढता पाय घेतला.

खासदार इम्तियाज जलील

खासदार चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाला अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव कारणीभूत ठरले. हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल 2,76,000 मतं घेतल्याने खैरे यांचा पराभव झाला. तर, इम्तियाज जलील यांनी मोठे मताधिक्य घेतल्याने काँग्रेसचे डिपॉजीट जप्त झाले. मिळालेला विजय हा सर्व औरंगाबादच्या लोकांचा असून आता शहराचा विकास करण्यासाठी काम करणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.

औरंगाबाद - मागील २० वर्षापासून औरंगाबादचा विकास थांबला होता, आता तो सुरू होईल, अशी प्रतिक्रिया औरंगाबाद शहराचे एमआयएमचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आला. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात इम्तियाज जलील यांचा विजय झाला.

एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत धक्का दिला. मिळालेला विजय हा औरंगाबादच्या सर्वच मतदारांचा असल्याचे इम्तियाज जलील यांनी विजय झाल्यावर सांगितले. तर खैरे यांनी माझे बॅडलक, असे म्हणत काढता पाय घेतला.

खासदार इम्तियाज जलील

खासदार चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाला अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव कारणीभूत ठरले. हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल 2,76,000 मतं घेतल्याने खैरे यांचा पराभव झाला. तर, इम्तियाज जलील यांनी मोठे मताधिक्य घेतल्याने काँग्रेसचे डिपॉजीट जप्त झाले. मिळालेला विजय हा सर्व औरंगाबादच्या लोकांचा असून आता शहराचा विकास करण्यासाठी काम करणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.

Intro:औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आला. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा विजय झाला. Body:एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत धक्का दिला. मिळालेला विजय हा औरंगाबादच्या सर्वच मतदारांचा असल्याचं इम्तियाज जलील यांनी विजय झाल्यावर सांगितलं. तर खैरे यांनी माझं बॅडलकं अस म्हणत काढता पाय घेतला.Conclusion:खासदार चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाला अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव कारणीभूत ठरली. हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल 276000 मत घेतल्यांने खैरे यांचा पराभव झाला तर इम्तियाज जलील यांनी मोठं मताधिक्य घेतल्याने काँग्रेसचे डिपॉसीट जप्त झाले. मिळालेला विजय हा सर्व औरंगाबादच्या लोकांचा असून आता शहराचा विकास करण्यासाठी काम करणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितलं तर माझं बॅडलंक म्हणत खैरे यांनी काढता पाय घेतला.
Byte - चंद्रकांत खैरे - शिवसेना उमेदवार
Byte - इम्तियाज जलील - नवनिर्वाचित खासदार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.