ETV Bharat / state

2022 पर्यंत देशातील गरिबांना पक्की घरे देणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शनिवारी दुसरी सभा औरंगाबाद येथे पार पडली असून महिला सम्मेलनात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांच्यासह मंत्र्यांची उपस्थिती होती.

author img

By

Published : Sep 7, 2019, 4:32 PM IST

Updated : Sep 7, 2019, 6:42 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी

औरंगाबाद - देशातील सरकार गरिबांसाठी काम करत आहेत. गरिबांसाठी याआधीही योजना होत्या. मात्र त्या नीट राबवल्या गेल्या नाहीत. परंतु, आमचे सरकार देशातील सर्व गरिबांना 2022 पर्यंत पक्के घरे देणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. औरंगाबाद येथील महिला सम्मेलनात ते बोलत होते. याशिवाय महिलांसाठी उज्वला योजनेअंतर्गत 8 कोटी गॅसेस वाटप करण्यात आले आहेत. मुद्रा योजनेचा महाराष्ट्रातील महिलांना लाभ झालेला आहे. त्यामुळे हे सरकार महिलांना सशक्त बनवण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उज्वला गॅस योजनेअंतर्गत पाच महिलांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील महत्त्वाच्या इमारतींचे त्यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी भाषणाला सुरुवात केली. 'माझ्या सर्व माता भगिनींना माझा नमस्कार, महालक्ष्मी विसर्जन असताना सुद्धा तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद'. असे म्हणत मोदींनी भाषणाला सुरुवात केली. पंतप्रधान मोदी यांनी महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये 44 लाख गॅस कनेक्शन आहेत. हे उद्दिष्ठ आपण कमी कालावधीत पूर्ण केले आहेत. शौचालय आणि पाणी या दोन समस्या महिलांच्या आहेत. त्या मिटल्या तर महिला सक्षम होतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात राबवण्यात येणारा वॉडरग्रीड प्रकल्प हा मराठवाड्यासाठी जीवनदायी ठरणार असल्याचेही ते म्हणाले. या प्रकल्पामुळे गावांना पाणी मिळेल. त्यामुळे येणाऱ्या पाच वर्षात साडेतीन लाख करोड रुपये पाण्याच्या अभियानासाठी खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

औरंगाबाद - देशातील सरकार गरिबांसाठी काम करत आहेत. गरिबांसाठी याआधीही योजना होत्या. मात्र त्या नीट राबवल्या गेल्या नाहीत. परंतु, आमचे सरकार देशातील सर्व गरिबांना 2022 पर्यंत पक्के घरे देणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. औरंगाबाद येथील महिला सम्मेलनात ते बोलत होते. याशिवाय महिलांसाठी उज्वला योजनेअंतर्गत 8 कोटी गॅसेस वाटप करण्यात आले आहेत. मुद्रा योजनेचा महाराष्ट्रातील महिलांना लाभ झालेला आहे. त्यामुळे हे सरकार महिलांना सशक्त बनवण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उज्वला गॅस योजनेअंतर्गत पाच महिलांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील महत्त्वाच्या इमारतींचे त्यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी भाषणाला सुरुवात केली. 'माझ्या सर्व माता भगिनींना माझा नमस्कार, महालक्ष्मी विसर्जन असताना सुद्धा तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद'. असे म्हणत मोदींनी भाषणाला सुरुवात केली. पंतप्रधान मोदी यांनी महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये 44 लाख गॅस कनेक्शन आहेत. हे उद्दिष्ठ आपण कमी कालावधीत पूर्ण केले आहेत. शौचालय आणि पाणी या दोन समस्या महिलांच्या आहेत. त्या मिटल्या तर महिला सक्षम होतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात राबवण्यात येणारा वॉडरग्रीड प्रकल्प हा मराठवाड्यासाठी जीवनदायी ठरणार असल्याचेही ते म्हणाले. या प्रकल्पामुळे गावांना पाणी मिळेल. त्यामुळे येणाऱ्या पाच वर्षात साडेतीन लाख करोड रुपये पाण्याच्या अभियानासाठी खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:Body:

[9/7, 3:39 PM] Amit Futane Aurangabad: उज्वला गॅस योजने अंतर्गत पाच महिलांना गॅस कनेक्शनचे वाटप नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

नर्गिस बेगम कश्मीर हुन आल्या, झारखंड रेखा देवी, आयशा शेख रफी यांना गॅस कनेक्शन देऊन सरकारने आठ करोडच उद्दिष्ठ गाठलं.

[9/7, 3:40 PM] Amit Futane Aurangabad: मोदी भाषणासाठी उभे राहिले,

[9/7, 3:43 PM] Amit Futane Aurangabad: माझ्या सर्व माता भगिनींना माझा नमस्कार, महालक्ष्मी विसर्जन असताना आलात त्याबद्दल धन्यवाद म्हणत मोदींनी केली भाषणाला सुरुवात

[9/7, 3:46 PM] Amit Futane Aurangabad: महत्वाच्या इमारतीचे उदघाटन केले, अनेक व्यवस्थांची सुरुवात होईल, स्मार्ट शहर होत आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी काम करायला सुरुवात केली आहे. लाखो युवकांना रोजगार उपलब्ध होईल, मोठ्या सिद्धीचा साक्षीदार झाली आहे, आठ करोड गॅस कनेक्शन मोफत दिले. लक्ष आम्ही आधीच प्राप्त केले, 44 लाख कनेक्शन महाराष्ट्रात आहेत - मोदी

[9/7, 3:47 PM] Amit Futane Aurangabad: धुरात जीवन उद्धवस्त करणाऱ्या बहिणींना मुक्त करण्यासाठी पाहिले पाच कोटींचे उद्धिष्ट होते

[9/7, 3:48 PM] Amit Futane Aurangabad: मला आनंद आहे सरकार येऊन 100 दिवस होण्याआधी आमचं उद्दिष्ठ पूर्ण झालं.

[9/7, 3:49 PM] Amit Futane Aurangabad: गावात अनेक गॅस एजन्सीची नियुक्ती केली

[9/7, 3:49 PM] Amit Futane Aurangabad: देशात एकही अस कुटुंब राहणार नाही ज्याच्या घरी एलपीजी कनेक्शन नसेल

[9/7, 3:50 PM] Amit Futane Aurangabad: पाच किलो गॅस अनेक्शनला प्रोत्साहन देतोय, पाईप ने अनेक घरात गॅस पोहचवण्याच काम सुरू आहे

[9/7, 3:50 PM] Amit Futane Aurangabad: पाण्यामुळे अनेक महिलांना त्रास होतोय याची जाणीव असल्याने जल जीवन योजना सुरू केली आहे

[9/7, 3:51 PM] Amit Futane Aurangabad: येणाऱ्या पाच वर्षात साडेतीन लाख करोड रुपये पाण्याच्या अभियानात खर्च केले जाणार आहेत

[9/7, 3:52 PM] Amit Futane Aurangabad: समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी 70 च्या कालखंडात सांगितलं होतं महिलांच्या दोन समस्या आहेत, त्या म्हणजे शौचालय आणि पाणी, या दोन समस्या मिटल्या तर महिला सक्षम होतील. ते गेले, त्यानंतर अनेक आले आणि गेले मात्र काही झालं नाही मात्र आम्ही ते करतोय


Conclusion:
Last Updated : Sep 7, 2019, 6:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.