ETV Bharat / state

Sanjay Shirsat : आम्ही पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत - संजय शिरसाट

author img

By

Published : Jan 7, 2023, 5:53 PM IST

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (Sanjay Shirsat criticize Sanjay Raut). आम्ही पाहिलेले उद्धव ठाकरे आणि आत्ताचे उद्धव ठाकरे यांच्यात फरक असल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे. (Sanjay Shirsat on Sanjay Raut).

Sanjay Shirsat
संजय शिरसाट
संजय शिरसाट

औरंगाबाद : आम्ही पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत. हे कुठेतरी संजय राऊत यांच्या दबावाखाली आहेत, अशी टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केली आहे. (Sanjay Shirsat criticize Sanjay Raut). संजय राऊत कधीही जुळवून घेणार नाही आणि ते शिवसेना वाढू देणार नाही, त्यांचं महत्त्व कमी होईल म्हणून ते तसं होऊ देणार नाहीत, सुषमा अंधारे यांचे काही भाषणे चर्चेला आले, मात्र आता त्यांना सुद्धा गप्प करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पक्षातील जुने नेते कुठे गेले ते काही बोलत नाहीत. जे काही बोलतात ते फक्त आणि फक्त संजय राऊत बोलतात, अशी टीका शिरसाट यांनी केली आहे. (Sanjay Shirsat on Sanjay Raut).

आम्ही पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत : सध्या शिवसेना पक्षातर्फे जे काही बोलतात ते फक्त आणि फक्त संजय राऊत बोलतात. त्यांच्या वक्तव्याची दखल उद्धव ठाकरे का घेत नाहीत? का कारवाई करत नाहीत? असा प्रश्न नेहमी पडतो. आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलं आहे. त्यावेळेस पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत, हे कुठेतरी संजय राऊत यांच्या दबाव खाली आहेत, असं वाटतं अशी टीका शिरसाट यांनी केली. नीलम गोरे यांना तळागाळात काम करण्याची माहिती आहे. त्यामुळे आपल्या पक्षातून जर बाहेर कोणी जात आहे तर त्याचं गांभीर्य त्यांना लक्षात येत आहे. संजय राऊत सारखं आले, राहिले, गेले तरी काही हरकत नाही. अशा वृत्तीच्या त्या नाही. पक्ष सोडून गेलेल्यांना हीनवणे हे राऊत यांचं काम आहे. मात्र ते का गेले याबाबत नीलम ताई यांना जाण आहे. त्यामुळे त्यांचं मत उद्धव ठाकरे किती लक्षात घेतात हे पहावं लागणार आहे, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

अंबादास दानवे राऊत यांचे भक्त : अंबादास दानवे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना जोड्याने मारलं पाहिजे असं वक्तव्य केलं. त्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. अंबादास दानवे हे शिवसेनेचे नसून संजय राऊत यांचे भक्त आहे. त्यामुळे देवजसा बोलतो तसेच हे बोलतात. विरोधी पक्षनेतेपद मोठे आहे, त्याची एक वेगळी गरीमा आहे. त्यांच्या वक्तव्यांना वेगळं महत्त्व असतं, एवढा दरारा असतो की त्यांच्या वक्तव्यांची दखल ही घेतली जाते. मात्र अंबादास दानवे गल्लीतल्या नेत्यांप्रमाणे वक्तव्य करतात, त्यामुळे त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. तर रामदास भाई कदम यांनी घातपात होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यावर बोलताना नेत्यांनी शक्यतो रात्रीचे प्रवास करू नये, म्हणजे अंधारात कोणी घातपात करणार नाही. दिवसा केला तर तो किमान पकडला तरी जाईल असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.

संजय राऊत यांच्या बाबत आधीच टीका केली होती : शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 50 आमदार गुवाहाटी येथे गेले, त्यावेळी सर्वात आधी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. मंदिराबाहेर बडवे बसलेले असतात, त्यांच्यामुळे देवापर्यंत जाता येत नाही असं मी त्यावेळी म्हणलं होतं. इतकच नाही तर यांच्यामुळे पक्ष संपेल अशी टीका मी आधीच केली होती. ती शंका आता कुठेतरी प्रत्यक्षात खरी होताना दिसत आहे असा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला.

संजय शिरसाट

औरंगाबाद : आम्ही पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत. हे कुठेतरी संजय राऊत यांच्या दबावाखाली आहेत, अशी टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केली आहे. (Sanjay Shirsat criticize Sanjay Raut). संजय राऊत कधीही जुळवून घेणार नाही आणि ते शिवसेना वाढू देणार नाही, त्यांचं महत्त्व कमी होईल म्हणून ते तसं होऊ देणार नाहीत, सुषमा अंधारे यांचे काही भाषणे चर्चेला आले, मात्र आता त्यांना सुद्धा गप्प करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पक्षातील जुने नेते कुठे गेले ते काही बोलत नाहीत. जे काही बोलतात ते फक्त आणि फक्त संजय राऊत बोलतात, अशी टीका शिरसाट यांनी केली आहे. (Sanjay Shirsat on Sanjay Raut).

आम्ही पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत : सध्या शिवसेना पक्षातर्फे जे काही बोलतात ते फक्त आणि फक्त संजय राऊत बोलतात. त्यांच्या वक्तव्याची दखल उद्धव ठाकरे का घेत नाहीत? का कारवाई करत नाहीत? असा प्रश्न नेहमी पडतो. आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलं आहे. त्यावेळेस पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत, हे कुठेतरी संजय राऊत यांच्या दबाव खाली आहेत, असं वाटतं अशी टीका शिरसाट यांनी केली. नीलम गोरे यांना तळागाळात काम करण्याची माहिती आहे. त्यामुळे आपल्या पक्षातून जर बाहेर कोणी जात आहे तर त्याचं गांभीर्य त्यांना लक्षात येत आहे. संजय राऊत सारखं आले, राहिले, गेले तरी काही हरकत नाही. अशा वृत्तीच्या त्या नाही. पक्ष सोडून गेलेल्यांना हीनवणे हे राऊत यांचं काम आहे. मात्र ते का गेले याबाबत नीलम ताई यांना जाण आहे. त्यामुळे त्यांचं मत उद्धव ठाकरे किती लक्षात घेतात हे पहावं लागणार आहे, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

अंबादास दानवे राऊत यांचे भक्त : अंबादास दानवे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना जोड्याने मारलं पाहिजे असं वक्तव्य केलं. त्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. अंबादास दानवे हे शिवसेनेचे नसून संजय राऊत यांचे भक्त आहे. त्यामुळे देवजसा बोलतो तसेच हे बोलतात. विरोधी पक्षनेतेपद मोठे आहे, त्याची एक वेगळी गरीमा आहे. त्यांच्या वक्तव्यांना वेगळं महत्त्व असतं, एवढा दरारा असतो की त्यांच्या वक्तव्यांची दखल ही घेतली जाते. मात्र अंबादास दानवे गल्लीतल्या नेत्यांप्रमाणे वक्तव्य करतात, त्यामुळे त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. तर रामदास भाई कदम यांनी घातपात होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यावर बोलताना नेत्यांनी शक्यतो रात्रीचे प्रवास करू नये, म्हणजे अंधारात कोणी घातपात करणार नाही. दिवसा केला तर तो किमान पकडला तरी जाईल असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.

संजय राऊत यांच्या बाबत आधीच टीका केली होती : शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 50 आमदार गुवाहाटी येथे गेले, त्यावेळी सर्वात आधी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. मंदिराबाहेर बडवे बसलेले असतात, त्यांच्यामुळे देवापर्यंत जाता येत नाही असं मी त्यावेळी म्हणलं होतं. इतकच नाही तर यांच्यामुळे पक्ष संपेल अशी टीका मी आधीच केली होती. ती शंका आता कुठेतरी प्रत्यक्षात खरी होताना दिसत आहे असा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.