औरंगाबाद - कोरोनामुळे सर्वत्र वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम औषध पुरवठ्यावर होत आहे. जिल्ह्यात बाहेरून येणारी औषधे ८ दिवसांनी पोहचत असल्याची माहिती मिळाली आहे.
औरंगाबाद येथे भिवंडी, नागपूर, पुणे येथून औषधी पुरवली जातात. कोरोनामुळे वाहतूक सेवा बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या औषधीसाठी वाहन उपलब्ध होणे, त्या वाहनात पूर्णमाल भरणे या प्रक्रियेला उशीर होत असल्याने पुरवठा करण्यास उशीर होत आहे. मेडिकल असोसिएशनतर्फे औषधे वेळेवर मिळण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे औषध विक्रेते निखिल मित्तल यांनी सांगितले.
![mh_aur_1_medical_effect_script_7206289](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-aur-1-medical-effect-script-7206289_13042020124028_1304f_00831_664.jpg)