ETV Bharat / state

Devendra Fadnavis on Marathwada : आमच्या भाषणात नाही तर मनात मराठवाडा - देवेंद्र फडणवीस

आमच्या मनात मराठवाडा आहे. मात्र, काही लोकांच्या भाषणातच मराठवाडा आहे, विकास नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Criticize Shivsena over Marathwada ) यांनी शिवसेनेवर केली. ते लासूर येथे जाहीर कार्यक्रमात बोलत होते. ( Devendra Fadnavis in Lasur )

author img

By

Published : Feb 21, 2022, 5:14 PM IST

Lop Devendra Fadnavis on Marathwada in lasur program
आमच्या भाषणात नाही तर मनात मराठवाडा - देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद - आमच्या मनात मराठवाडा आहे. मात्र, काही लोकांच्या भाषणातच मराठवाडा आहे, विकास नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Criticize Shivsena over Marathwada ) यांनी शिवसेनेवर केली. ते लासूर येथे जाहीर कार्यक्रमात बोलत होते. ( Devendra Fadnavis in Lasur )

लासूर येथील कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस

शिवसेनेवर टीका -

अनेकांनी मराठवाड्याला खूप दिले असे सांगतात. मात्र, फक्त त्यांच्या भाषणात मराठवाडा आहे. फक्त नाव वापरतात. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळचा या सरकारने खून नाही आहे, कवच कुंडल काढून घेतली. आम्ही दुष्काळ मुक्त मराठवाड्याचे स्वप्न पाहिले होते. शेतकरी हताश होता. आम्ही मराठवाडा वॉटर ग्रीड पाणी योजना आणली. मात्र, या सरकारने त्या योजनेचाही खून केला. मराठवाड्यासोबतच हा व्यवहार याची नोंद घ्यावी लागेल.

समुद्रात वाहून जाणारे पाणी आपण मराठवाड्यात आणणार होतो. मात्र, ही सरकार यासाठी ही काही करत नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या बरोबरीने हा भाग झाला असता. औरंगाबाद शहराने शिवसेनेला ओळख दिली. या शहरासाठी 1680 कोटींची पाणी योजना आम्ही दिली होती. मात्र, सरकार बदलले आणि यांनी निर्णय बदलला. साधे पाणी हे लोक शहराला देत नाहीत, अशी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली.

हेही वाचा - Chandrakant Patil Statement On Sanjay Raut : 'संजय राऊत यांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आहे'

राज्यातील सरकार दलाल -

मराठवाड्याच्या शेतकऱ्यावर गेल्या 2 वर्षांत अनेक अडचणी आल्या. मात्र, या सरकारने एक पैशांची मदत केली नाही. आता सरकार कुठं आहे, कळत नाही. मुंबईच्या मोठ्या इमारतीत असलेल्यांची दलाली करण्यात सरकार हरवलं आहे. यांना मराठवाड्यातील शेतकरी दिसत नाही. ही लोक शेतकऱ्यांची वीज कापताय आणि मोठ्यांना सोडतात. आपल्या सरकारने एक शेतकऱ्याला वीज कापली नाही. मात्र, यांचं मंत्री म्हणतात वीज वापरली बिल भरावे लागेल आणि सगळ्या मंत्र्यांना मात्र फुकट वीज मिळते, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

लासुर येथे देवेंद्र फडणवीस आणि भागवत कराड यांनी 120 कोटींच्या विकास कामांचा उदघाटन केले. तसेच महिला बचत गट मेळावा, दिव्यांगना मदत कामगारांना मदत या मेळाव्यात देण्यात आली. यावेळी बोलताना फडणवीस यांनी मोदी सरकारने गोर गरिबांसाठी काय केले हे सांगत राज्य सरकारवर निशाणा साधला.

औरंगाबाद - आमच्या मनात मराठवाडा आहे. मात्र, काही लोकांच्या भाषणातच मराठवाडा आहे, विकास नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Criticize Shivsena over Marathwada ) यांनी शिवसेनेवर केली. ते लासूर येथे जाहीर कार्यक्रमात बोलत होते. ( Devendra Fadnavis in Lasur )

लासूर येथील कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस

शिवसेनेवर टीका -

अनेकांनी मराठवाड्याला खूप दिले असे सांगतात. मात्र, फक्त त्यांच्या भाषणात मराठवाडा आहे. फक्त नाव वापरतात. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळचा या सरकारने खून नाही आहे, कवच कुंडल काढून घेतली. आम्ही दुष्काळ मुक्त मराठवाड्याचे स्वप्न पाहिले होते. शेतकरी हताश होता. आम्ही मराठवाडा वॉटर ग्रीड पाणी योजना आणली. मात्र, या सरकारने त्या योजनेचाही खून केला. मराठवाड्यासोबतच हा व्यवहार याची नोंद घ्यावी लागेल.

समुद्रात वाहून जाणारे पाणी आपण मराठवाड्यात आणणार होतो. मात्र, ही सरकार यासाठी ही काही करत नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या बरोबरीने हा भाग झाला असता. औरंगाबाद शहराने शिवसेनेला ओळख दिली. या शहरासाठी 1680 कोटींची पाणी योजना आम्ही दिली होती. मात्र, सरकार बदलले आणि यांनी निर्णय बदलला. साधे पाणी हे लोक शहराला देत नाहीत, अशी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली.

हेही वाचा - Chandrakant Patil Statement On Sanjay Raut : 'संजय राऊत यांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आहे'

राज्यातील सरकार दलाल -

मराठवाड्याच्या शेतकऱ्यावर गेल्या 2 वर्षांत अनेक अडचणी आल्या. मात्र, या सरकारने एक पैशांची मदत केली नाही. आता सरकार कुठं आहे, कळत नाही. मुंबईच्या मोठ्या इमारतीत असलेल्यांची दलाली करण्यात सरकार हरवलं आहे. यांना मराठवाड्यातील शेतकरी दिसत नाही. ही लोक शेतकऱ्यांची वीज कापताय आणि मोठ्यांना सोडतात. आपल्या सरकारने एक शेतकऱ्याला वीज कापली नाही. मात्र, यांचं मंत्री म्हणतात वीज वापरली बिल भरावे लागेल आणि सगळ्या मंत्र्यांना मात्र फुकट वीज मिळते, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

लासुर येथे देवेंद्र फडणवीस आणि भागवत कराड यांनी 120 कोटींच्या विकास कामांचा उदघाटन केले. तसेच महिला बचत गट मेळावा, दिव्यांगना मदत कामगारांना मदत या मेळाव्यात देण्यात आली. यावेळी बोलताना फडणवीस यांनी मोदी सरकारने गोर गरिबांसाठी काय केले हे सांगत राज्य सरकारवर निशाणा साधला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.