औरंगाबाद - कोरोनामुळे देशासह राज्यात लॉक डाऊन आहे. यामुळे कन्नड तालुक्याती ग्रामीण भागातील आदिवासी लोकांचे हाल होत आहेत. कन्नड तालुक्यातील सोनवाडी आदिवासी भागामध्ये हे लोक रोजनदारीने आपले पोट भरत असतात. हे गाव कन्नड तालुक्यातील शेवटचे गाव आहे. तिथे १५ ते २० आदिवासी कुटुंब वास्तव्याला आहेत. या गावात राशनची कोणतीही व्यावस्था नाही. या कुटुंबांकडे काहीच उरलेले नाही. त्यांची ही आवस्था पाहून कन्नड ग्रामीण पोलीस ठाणे व नागद पोलीस मित्र त्यांच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी तात्काळ त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यावस्था केली. यामुळे या कुटुंबाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
कन्नड़ ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नेवसे, यांचा मार्गदर्शना नुसार या आदिवासी सोनवाडी गावातील लोकांना जेवण देण्याचा उपक्रम राबवला आहे. अशा या ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी व पोलीस मित्रांना सलाम. मात्र, या कुटुंबाना मदतीची गरज आहे. दानशुरानी याना मदत करावी. या चागल्या कामासाठी पोलीस कर्मचारी जैन, भामरे, जे. पी सोनवणे, होमगार्ड धुपे पोलीस मित्र प्रमोद कुमावत, समाधान पाटील, रामदास पाटील, भोला महाजन, पोलीस पाटील वसंत पवार, शुभांगी सुर्यवंशी यांनी मदत केली.