ETV Bharat / state

Gram panchayat Election जिल्ह्यात 14 सरपंच बिनविरोध, ग्राम पंचायतीसाठी रविवारी होणार मतदान

author img

By

Published : Dec 17, 2022, 7:04 PM IST

ग्राम पंचायत निवडणुकीची रणधुमाळी औरंगाबाद जिल्ह्यात ( Aurangabad District Gram Panchayat ) सुरू आहे. शनिवारी प्रचार थंडावला असून रविवारी ग्राम पंचायतीसाठी मतदान ( Gram Panchayat Election ) पार पडणार आहे. जिल्ह्यातील 14 ग्राम पंचायतीचे सरपंच( Gram Panchayat Sarpanch ) बिनविरोध निवडून आले आले आहेत. 308 सदस्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. रविवारी होणाऱ्या मतदानाला प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Gram panchayat Election
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - राज्यात सात हजार पेक्षा अधिक मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीसाठी ( Gram Panchayat Election ) 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील देखील एकूण 216 ठिकाणी निवडणूक ( Gram Panchayat Electगon In Aurangabad District ) पार पडणार आहे. मात्र मतदान होण्यापूर्वी 14 सरपंचांची बिनविरोध निवड झाली असून, 308 सदस्यांचीही लॉटरी लागली आहे. तर उरलेल्या जागांसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीचे साहित्य मतदान केंद्रावर पोहोचले असून प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

निवडणुकीची रणधुमाळी शिगेला जिल्ह्यात मुदत संपलेल्या 216 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत थेट सरपंचपदासाठी 1092, तर सदस्यपदासाठी 5481 अशा 6573 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यांपैकी 371 जणांचे अर्ज छाननीत बाद ठरले. तर 1900 जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने सध्या सरपंचपदासाठी 611 तर सदस्यासाठी 3626 असे 4237 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत. दरम्यान, यात थेट सरपंचपदी 14 तर सदस्यपदी 308 उमेदवारांच्या विरोधात एकही उमेदवार रिंगणात शिल्लक नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला ग्रामीण भागात सद्या निवडणुकीचा उत्साह पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे( Shiv Sena MLA ) पाच बंडखोर आमदार असल्याने त्यांच्या मतदारसंघातील निवडणूक अधिक चर्चेला आले आहे. एकनाथ शिंदे गट ( Shinde Faction In Aurangabad ), उद्धव ठाकरे गट Thackeray Faction ), भाजपा काँग्रेस आणि राष्ट्रवादी ( Nationalist Congress Party ) अशा राजकीय संघटना एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने या निवडणुकीत जनता कोणाला कौल देईल या दृष्टीने राजकीय पक्ष प्रचार करत आहेत.

निवडणुकीत विजय आपलाच इच्छुकांकडून प्रचार सुरु आहे. तर निवडणुकीत ( Gram panchayat Election ) आपलाच विजय होणार असे दावे केले जात आहे. सद्या गावातील पारावर सद्या फक्त निवडणुकीच्याच चर्चा रंगताना पाहायाला मिळत आहेत. तर अनेक ग्रामपंचायतीसाठी राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद - राज्यात सात हजार पेक्षा अधिक मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीसाठी ( Gram Panchayat Election ) 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील देखील एकूण 216 ठिकाणी निवडणूक ( Gram Panchayat Electगon In Aurangabad District ) पार पडणार आहे. मात्र मतदान होण्यापूर्वी 14 सरपंचांची बिनविरोध निवड झाली असून, 308 सदस्यांचीही लॉटरी लागली आहे. तर उरलेल्या जागांसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीचे साहित्य मतदान केंद्रावर पोहोचले असून प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

निवडणुकीची रणधुमाळी शिगेला जिल्ह्यात मुदत संपलेल्या 216 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत थेट सरपंचपदासाठी 1092, तर सदस्यपदासाठी 5481 अशा 6573 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यांपैकी 371 जणांचे अर्ज छाननीत बाद ठरले. तर 1900 जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने सध्या सरपंचपदासाठी 611 तर सदस्यासाठी 3626 असे 4237 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत. दरम्यान, यात थेट सरपंचपदी 14 तर सदस्यपदी 308 उमेदवारांच्या विरोधात एकही उमेदवार रिंगणात शिल्लक नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला ग्रामीण भागात सद्या निवडणुकीचा उत्साह पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे( Shiv Sena MLA ) पाच बंडखोर आमदार असल्याने त्यांच्या मतदारसंघातील निवडणूक अधिक चर्चेला आले आहे. एकनाथ शिंदे गट ( Shinde Faction In Aurangabad ), उद्धव ठाकरे गट Thackeray Faction ), भाजपा काँग्रेस आणि राष्ट्रवादी ( Nationalist Congress Party ) अशा राजकीय संघटना एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने या निवडणुकीत जनता कोणाला कौल देईल या दृष्टीने राजकीय पक्ष प्रचार करत आहेत.

निवडणुकीत विजय आपलाच इच्छुकांकडून प्रचार सुरु आहे. तर निवडणुकीत ( Gram panchayat Election ) आपलाच विजय होणार असे दावे केले जात आहे. सद्या गावातील पारावर सद्या फक्त निवडणुकीच्याच चर्चा रंगताना पाहायाला मिळत आहेत. तर अनेक ग्रामपंचायतीसाठी राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.