ETV Bharat / state

राष्ट्रीय बालिका दिनी औरंगाबाद पोलिसांनी रोखला बाल विवाह - National Girls' Day

जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर ठाण्याच्या हद्दीतील गावातील राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त शिऊर पोलिसांनी एक बालविवाह रोखला आहे. या निमित्ताने शिऊर पोलिस व त्यांच्या टीमने समाजात आदर्श निर्माण केला आहे. ज्या मुलीचा विवाह झाला तिचे वय 17 वर्ष 4 महिने इतके आहे.

औरंगाबाद पोलिसांनी रोखला बाल विवाह
औरंगाबाद पोलिसांनी रोखला बाल विवाह
author img

By

Published : Jan 25, 2021, 5:34 PM IST

औरंगाबाद (वैजापूर) - जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर ठाण्याच्या हद्दीतील गावातील राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त शिऊर पोलिसांनी एक बालविवाह रोखला आहे. या निमित्ताने शिऊर पोलिस व त्यांच्या टीमने समाजात आदर्श निर्माण केला आहे. ज्या मुलीचा विवाह झाला तिचे वय 17 वर्ष 4 महिने इतके आहे. राष्ट्रीय बालिका दिनी बालविवाह रोखून दोन्ही परिवारांना समजावले आहे. या उल्लेखनीय कार्यबद्दल शिऊर (औरंगाबाद) पोलिसांचे कौतुक होत आहे.

बालविवाह कायदा -

बाल विवाह हा कायद्याने गुन्हा ठरतो. 1929 मध्ये हा कायदा करण्यात आला. त्यात सुधारणा होऊन देशात बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006 करण्यात आला. 1 नोव्हेंबर 2007 पासून तो अमलात आला. यानुसार मुलीचे वय 18 आणि मुलाचे वय 21 असले तर विवाह ग्राह्य मानला जातो. या गुन्ह्याला तुरुंगावास तसेच दंडाची शिक्षा देण्याची तरतुद आहे.

मुलगी किंवा मुलगा वयात येण्यापूर्वीचा विवाह म्हणजे बालविवाह. काही समाजात मूल जन्माला यायच्या आधीच त्याचे आपल्या नात्यात लग्न ठरवून टाकले जाते, तशा शपथा जातीच्या पंचांसमोर घेतल्या जातात. बालविवाहासंबंधी कायदे करण्यात आले, तरी समाजावर कायद्याचा तसा फारसा प्रभाव पडला नाही. ग्रामीण भागात तुरळक प्रमाणावर आजही बालविवाह होतच आहेत. स्त्रीशिक्षणाचा प्रसार जसजसा होत आहे, तसतसे हे प्रमाण कमी कमी होत आहे.

कायद्यातील शिक्षेची तरतूद -

१८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास त्या पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि रु. १ लाखपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणार्‍यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडणार्‍यास किंवा प्रोत्साहन देणार्‍यास दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि रु. १ लाख पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

बालविवाह झाल्यास, संबंधित वर वा वधू यांचे आईवडील किंवा पालक, अन्य नातेवाईक मित्र परिवार असे सर्व, ज्यांनी हा विवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, वा जे अशा विवाहात सामील झाले होते अशा सर्वांना दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद व एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. मात्र संबंधित स्त्री गुन्हेगारांना कैदेची शिक्षा होणार नाही.

औरंगाबाद (वैजापूर) - जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर ठाण्याच्या हद्दीतील गावातील राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त शिऊर पोलिसांनी एक बालविवाह रोखला आहे. या निमित्ताने शिऊर पोलिस व त्यांच्या टीमने समाजात आदर्श निर्माण केला आहे. ज्या मुलीचा विवाह झाला तिचे वय 17 वर्ष 4 महिने इतके आहे. राष्ट्रीय बालिका दिनी बालविवाह रोखून दोन्ही परिवारांना समजावले आहे. या उल्लेखनीय कार्यबद्दल शिऊर (औरंगाबाद) पोलिसांचे कौतुक होत आहे.

बालविवाह कायदा -

बाल विवाह हा कायद्याने गुन्हा ठरतो. 1929 मध्ये हा कायदा करण्यात आला. त्यात सुधारणा होऊन देशात बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006 करण्यात आला. 1 नोव्हेंबर 2007 पासून तो अमलात आला. यानुसार मुलीचे वय 18 आणि मुलाचे वय 21 असले तर विवाह ग्राह्य मानला जातो. या गुन्ह्याला तुरुंगावास तसेच दंडाची शिक्षा देण्याची तरतुद आहे.

मुलगी किंवा मुलगा वयात येण्यापूर्वीचा विवाह म्हणजे बालविवाह. काही समाजात मूल जन्माला यायच्या आधीच त्याचे आपल्या नात्यात लग्न ठरवून टाकले जाते, तशा शपथा जातीच्या पंचांसमोर घेतल्या जातात. बालविवाहासंबंधी कायदे करण्यात आले, तरी समाजावर कायद्याचा तसा फारसा प्रभाव पडला नाही. ग्रामीण भागात तुरळक प्रमाणावर आजही बालविवाह होतच आहेत. स्त्रीशिक्षणाचा प्रसार जसजसा होत आहे, तसतसे हे प्रमाण कमी कमी होत आहे.

कायद्यातील शिक्षेची तरतूद -

१८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास त्या पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि रु. १ लाखपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणार्‍यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडणार्‍यास किंवा प्रोत्साहन देणार्‍यास दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि रु. १ लाख पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

बालविवाह झाल्यास, संबंधित वर वा वधू यांचे आईवडील किंवा पालक, अन्य नातेवाईक मित्र परिवार असे सर्व, ज्यांनी हा विवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, वा जे अशा विवाहात सामील झाले होते अशा सर्वांना दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद व एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. मात्र संबंधित स्त्री गुन्हेगारांना कैदेची शिक्षा होणार नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.