ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये अर्णब गोस्वामी अटकेविरोधात भाजपचे आंदोलन

author img

By

Published : Nov 5, 2020, 4:13 AM IST

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात आंदोलन केले. पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करत भाजपा कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.

भाजप आंदोलन
भाजप आंदोलन

औरंगाबाद - रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात आंदोलन केले. पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करत भाजपा कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. 2018 मध्ये घडलेल्या घटनेनंतर दोन वर्षांनी अशा पद्धतीने कारवाई म्हणजे राज्य सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप भाजपने केला.

क्रांतीचौकात ठिय्या आंदोलन -

भाजप आंदोलन औरंगाबाद
औरंगाबादच्या क्रांतीचौकात भाजपने राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडला. राज्य सरकार करत असलेली कारवाई चुकीची असून पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप भाजपकडून यावेळी करण्यात आला. भाजपच्या या आंदोलनामुळे जवळपास अर्धा तास वाहतूक खोळंबा निर्माण झाला होता. पोलिसांच्या विनंतीनंतर आंदोलक रस्त्याच्या बाजूला आले. मात्र पोलिसांनी कारवाई करत 20 ते 25 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
पत्रकारांची मुस्कटदाबी होतेय -


अतिशय खेदाची आणि निंदनीय गोष्ट सरकारने केली. सरकारचा पर्दाफाश करण्याचे काम ज्या पत्रकाराने केले. त्या चौथ्या स्तंभाला मुळापासून उघडायचे काम सरकार करत आहे. या हुकूमशाहीच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरला आहे. हुकूमशाहीला आणि दडपशाहीला जाब विचारण्यासाठी जनतेला बरोबर घेऊन रस्त्यावर उतरलो आहोत, आगामी काळात तुमचीही मुस्कटदाबी करू असा इशारा जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी दिला. राज्यात तिघाडी सरकार असून, कायदा स्वतःचा असल्या प्रमाणे त्याचा वापर केला जात असल्याचा आरोप भाजप आमदार अतुल सावे यांनी केला.

औरंगाबाद - रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात आंदोलन केले. पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करत भाजपा कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. 2018 मध्ये घडलेल्या घटनेनंतर दोन वर्षांनी अशा पद्धतीने कारवाई म्हणजे राज्य सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप भाजपने केला.

क्रांतीचौकात ठिय्या आंदोलन -

भाजप आंदोलन औरंगाबाद
औरंगाबादच्या क्रांतीचौकात भाजपने राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडला. राज्य सरकार करत असलेली कारवाई चुकीची असून पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप भाजपकडून यावेळी करण्यात आला. भाजपच्या या आंदोलनामुळे जवळपास अर्धा तास वाहतूक खोळंबा निर्माण झाला होता. पोलिसांच्या विनंतीनंतर आंदोलक रस्त्याच्या बाजूला आले. मात्र पोलिसांनी कारवाई करत 20 ते 25 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
पत्रकारांची मुस्कटदाबी होतेय -


अतिशय खेदाची आणि निंदनीय गोष्ट सरकारने केली. सरकारचा पर्दाफाश करण्याचे काम ज्या पत्रकाराने केले. त्या चौथ्या स्तंभाला मुळापासून उघडायचे काम सरकार करत आहे. या हुकूमशाहीच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरला आहे. हुकूमशाहीला आणि दडपशाहीला जाब विचारण्यासाठी जनतेला बरोबर घेऊन रस्त्यावर उतरलो आहोत, आगामी काळात तुमचीही मुस्कटदाबी करू असा इशारा जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी दिला. राज्यात तिघाडी सरकार असून, कायदा स्वतःचा असल्या प्रमाणे त्याचा वापर केला जात असल्याचा आरोप भाजप आमदार अतुल सावे यांनी केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.