अमरावती : तृतीयपंथीयांचे राष्ट्रीय स्तरावरील संमेलन अमरावतीमध्ये होत ( transegender national level gathering in amravati ) आहे. त्या संमेलनाचा एक भाग म्हणून आज शहरातून कलश यात्रा काढण्यात आली ( transegenders Kalash Yatra ) होती. या संमेलनाला देशातील ५०० च्या जवळपास तृतीयपंथीयांनी हजेरी लावली आहे. ढोल ताशाच्या गजरात ही कलशयात्रा वालकट कंपाऊंड येथे निघाली होती. अंबादेवी आणि एकविरा देवी देवीचे दर्शन घेऊन त्या ठिकाणी अंबादेवी आणि एकविरा देवीचे दर्शन घेऊन दोन्हीं ठिकाणी पितळी घंटा अर्पण करणार असल्याचे नेहा नायक या तृतीयपंचानी सांगितले आहे.
500 च्या जवळपास तृतीयपंथीय शहरात दाखल : आमच्या समाजातील निर्णय होतात ते अशा संमेलनात घेतले जातात. कोरोना काळात ज्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे त्यांचे नुकसान भरून निघो. त्यांना बरकत मिळो. तसेच ज्याही लोकांचे लग्न झाले नाही जुळले नाहीत त्यांना योग्य वर - वधू मिळो असे आशीर्वाद अमरावतीकारांना देत असल्याचे त्यांनी सांगितले. तृतीयपंथीयांचे राष्ट्रीय संमेलन 1 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत अमरावतीमध्ये होत आहे. या संमेलनाकरिता देशभरातील तृतीयपंतांनी उपस्थित लावली आहे. देशभरातून 500चे जवळपास तृतीयपंथीय शहरात दाखल झाले ( 500 transegender Attend gathering ) आहेत.
भारतभरातून तृतीयपंथी शहरात दाखल : अकोला, मुर्तीजापुर, यवतमाळ, नागपूर, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, इंदौर, जम्मू काश्मीर, हरियाणा, पंजाब, आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात या राज्यांबरोबरच इतरही राज्यांतील हजारोंच्या संख्येने तृतीयपंथीय या संमेलनात सहभागी होत आहेत. यासह संपूर्ण भारतातून तृतीयपंथी शहरात दाखल झाले आहेत. पहिल्यांदाच शहरातील धर्मादाय कॉटन मार्केटच्या प्रांगणात हे राष्ट्रीय स्तरावरचे संमेलन होत आहे. या संमेलनामध्ये तृतीयपंथीयांच्या विविध सामाजिक व उदरनिर्वाहाच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे.