ETV Bharat / state

Sandwood Stealing Case : चंदनासह अनेक महत्त्वाच्या झाडांची चोरी, वडाळी उद्यानाची वाईट अवस्था

author img

By

Published : May 8, 2023, 6:51 PM IST

पश्चिम विदर्भात अनेक शाळकरी विद्यार्थ्यांच्या सहलीचे आवडीचे ठिकाण असणारे अमरावती शहरातील सर्वांत जुने आणि समृद्ध अशा वडाळी उद्यानाची गत तीन वर्षांत प्रचंड दुरावस्था झाली आहे. या उद्यानातील लहान मुलांची खेळणी तुटली आहेत. त्याचप्रमाणे उद्यानातील चंदनासह अनेक महत्त्वाची झाडे चोरीला गेली आहेत. हा प्रकार अतिशय गंभीर असून अमरावती महापालिका प्रशासनाला याचे कुठलेही गांभीर्य नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Sandwood Stealing Case Amaravati
वडाळी उद्यानाची झालेली दुरवस्था
वडाळी उद्यानाची झालेली दुरावस्था

अमरावती: स्वर्गीय हरिभाऊ कलोती उद्यान या नावाने ओळखले जाणारे वडाळी येथील उद्यानाचे भूमिपूजन अमरावती नगरपालिका असताना 25 एप्रिल 1976 ला राज्याचे तत्कालीन परिवहन आणि विधान कार्य उपमंत्री बाबुराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले होते. इंग्रजकालीन वडाळी तलावालगत असणार या उद्यानाच्या परिसरात असणाऱ्या टेकड्या जंगल यामुळे हा संपूर्ण परिसर नैसर्गिकदृष्ट्या अतिशय सुंदर होता. 1992 मध्ये महापालिकेची पहिली निवडणूक झाल्यावर या उद्यानाला भली मोठी भिंत बांधण्यात आली. त्यानंतर पुढच्या दशकभरात या उद्यानाचे संपूर्ण चित्र पालटले. अमरावतीकरांसाठी हे एकमेव पर्यटनाचे केंद्र होते. अमरावती शहरासह जिल्ह्यातील आणि अमरावती विभागातील अनेक शाळांच्या सहलीचे हे उद्यान मुख्य केंद्र झाले. लहान मुलांसाठी विविध खेळणे, आकर्षित करणारा कारंजा, रेल्वे गाडी, अनेक पाळणे यासह विविधरंगी गुलाबाच्या झाडांचे खास दालन येथे आहे. असंख्य अशोकाची झाडे आणि अनेक वर्षे जुनी सात ते आठ वृक्षही येथे आहेत.


खासगी संस्थेने गेला विकास: मागील पाच वर्षे वगळता या उद्यानाच्या विकासाचा कंत्राट हा वर्धा येथील राजहंस टुरिझमकडे होता. या खासगी संस्थेने उद्यानातच्या विकासात विविध साहसी खेळ आणून लहान मुलांना याकडे आकर्षित केले. लगतच्या वडाळी तलावात नौका विहारासाठी देखील या उद्यानात पर्यटकांची गर्दी व्हायची. आता राजहंस टुरिझमचा कंत्राट पाच वर्षांपूर्वीच संपला असताना या उद्यानाचे नवे कंत्राट कोणालाही मिळाले नाही. मधात कोरोना काळादरम्यान या उद्यानाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले.


अवैध धंद्यांचे केंद्र: कोरोना काळात सर्वत्र लॉकडाऊन असताना वडाळी उद्यानात मात्र अवैधरित्या दारूविक्री व्हायची. याबाबत पोलीस प्रशासनाला संपूर्ण माहिती असताना देखील या गंभीर प्रकाराकडे कधी पोलीस प्रशासनाकडून लक्ष दिले गेले नाही. या उद्यानाची देखरेख सध्या केली जात नसल्यामुळे या उद्यानात मोठे गवत वाढले आहे. आज देखील दारूसह गांजा ओढणारे टोळके दिवसभर या उद्यानात बसलेले दिसतात.


चंदनाची पाच झाडे चोरीला: गत दीड दोन वर्षांत या उद्यानात शेकडोच्या संख्येत असणाऱ्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कटाई होत आहे. या उद्यानातील चंदनाची पाच झाडे चोरीला गेली आहेत. आज देखील चंदनाचे एक वृक्ष उद्यानात कापून ठेवण्यात आले आहे. हे झाड आधी तोडायचे नंतर रात्रीच्या अंधारात गायब करायचे, असा प्रकार या ठिकाणी होतो. उद्यानात विविध झाडे कापून ठेवण्यात आली असल्याचे आढळते.

पकडलेल्या चोरांना सोडले: दोन दिवसांपूर्वी वडाळी उद्यानातील कारंजालगत लावण्यात आलेली लोखंडी ग्रील चोरून पळणारे दोन भामटे रात्री दोनच्या सुमारास गस्तीवर असणाऱ्या फ्रिजरपुरा पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी त्या दोघांनाही गाडीत बसवले आणि अवघ्या काही अंतरावर सोडून दिले. या प्रकाराविषयी अमरावतीचे माजी महापौर आणि वडाळी परिसराचे माजी नगरसेवक अशोक डोंगरे यांनी 'ईटीव्ही भारत 'शी बोलताना माहिती दिली. शहरातील अतिशय महत्त्वाच्या उद्यानाची वाट लागली असताना महापालिका प्रशासनाचे याकडे अजिबात लक्ष नसल्याबाबतची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. अमरावती महापालिकेच्या आजवरच्या आयुक्तांपैकी विद्यमान आयुक्तांचे शहरातील कुठल्याही महत्त्वाच्या कामांकडे लक्ष नसल्याचा आरोप देखील अशोक डोंगरे यांच्यासह या परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आला.

हेही वाचा: Two laborers Died: चेंबरमधे गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी, नातेवाईकांनी फोडला टाहो

वडाळी उद्यानाची झालेली दुरावस्था

अमरावती: स्वर्गीय हरिभाऊ कलोती उद्यान या नावाने ओळखले जाणारे वडाळी येथील उद्यानाचे भूमिपूजन अमरावती नगरपालिका असताना 25 एप्रिल 1976 ला राज्याचे तत्कालीन परिवहन आणि विधान कार्य उपमंत्री बाबुराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले होते. इंग्रजकालीन वडाळी तलावालगत असणार या उद्यानाच्या परिसरात असणाऱ्या टेकड्या जंगल यामुळे हा संपूर्ण परिसर नैसर्गिकदृष्ट्या अतिशय सुंदर होता. 1992 मध्ये महापालिकेची पहिली निवडणूक झाल्यावर या उद्यानाला भली मोठी भिंत बांधण्यात आली. त्यानंतर पुढच्या दशकभरात या उद्यानाचे संपूर्ण चित्र पालटले. अमरावतीकरांसाठी हे एकमेव पर्यटनाचे केंद्र होते. अमरावती शहरासह जिल्ह्यातील आणि अमरावती विभागातील अनेक शाळांच्या सहलीचे हे उद्यान मुख्य केंद्र झाले. लहान मुलांसाठी विविध खेळणे, आकर्षित करणारा कारंजा, रेल्वे गाडी, अनेक पाळणे यासह विविधरंगी गुलाबाच्या झाडांचे खास दालन येथे आहे. असंख्य अशोकाची झाडे आणि अनेक वर्षे जुनी सात ते आठ वृक्षही येथे आहेत.


खासगी संस्थेने गेला विकास: मागील पाच वर्षे वगळता या उद्यानाच्या विकासाचा कंत्राट हा वर्धा येथील राजहंस टुरिझमकडे होता. या खासगी संस्थेने उद्यानातच्या विकासात विविध साहसी खेळ आणून लहान मुलांना याकडे आकर्षित केले. लगतच्या वडाळी तलावात नौका विहारासाठी देखील या उद्यानात पर्यटकांची गर्दी व्हायची. आता राजहंस टुरिझमचा कंत्राट पाच वर्षांपूर्वीच संपला असताना या उद्यानाचे नवे कंत्राट कोणालाही मिळाले नाही. मधात कोरोना काळादरम्यान या उद्यानाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले.


अवैध धंद्यांचे केंद्र: कोरोना काळात सर्वत्र लॉकडाऊन असताना वडाळी उद्यानात मात्र अवैधरित्या दारूविक्री व्हायची. याबाबत पोलीस प्रशासनाला संपूर्ण माहिती असताना देखील या गंभीर प्रकाराकडे कधी पोलीस प्रशासनाकडून लक्ष दिले गेले नाही. या उद्यानाची देखरेख सध्या केली जात नसल्यामुळे या उद्यानात मोठे गवत वाढले आहे. आज देखील दारूसह गांजा ओढणारे टोळके दिवसभर या उद्यानात बसलेले दिसतात.


चंदनाची पाच झाडे चोरीला: गत दीड दोन वर्षांत या उद्यानात शेकडोच्या संख्येत असणाऱ्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कटाई होत आहे. या उद्यानातील चंदनाची पाच झाडे चोरीला गेली आहेत. आज देखील चंदनाचे एक वृक्ष उद्यानात कापून ठेवण्यात आले आहे. हे झाड आधी तोडायचे नंतर रात्रीच्या अंधारात गायब करायचे, असा प्रकार या ठिकाणी होतो. उद्यानात विविध झाडे कापून ठेवण्यात आली असल्याचे आढळते.

पकडलेल्या चोरांना सोडले: दोन दिवसांपूर्वी वडाळी उद्यानातील कारंजालगत लावण्यात आलेली लोखंडी ग्रील चोरून पळणारे दोन भामटे रात्री दोनच्या सुमारास गस्तीवर असणाऱ्या फ्रिजरपुरा पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी त्या दोघांनाही गाडीत बसवले आणि अवघ्या काही अंतरावर सोडून दिले. या प्रकाराविषयी अमरावतीचे माजी महापौर आणि वडाळी परिसराचे माजी नगरसेवक अशोक डोंगरे यांनी 'ईटीव्ही भारत 'शी बोलताना माहिती दिली. शहरातील अतिशय महत्त्वाच्या उद्यानाची वाट लागली असताना महापालिका प्रशासनाचे याकडे अजिबात लक्ष नसल्याबाबतची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. अमरावती महापालिकेच्या आजवरच्या आयुक्तांपैकी विद्यमान आयुक्तांचे शहरातील कुठल्याही महत्त्वाच्या कामांकडे लक्ष नसल्याचा आरोप देखील अशोक डोंगरे यांच्यासह या परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आला.

हेही वाचा: Two laborers Died: चेंबरमधे गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी, नातेवाईकांनी फोडला टाहो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.