ETV Bharat / state

पावसाची दांडी : पश्चिम विदर्भात मागील वर्षी 90 टक्के पेरण्या, यंदा मात्र 75 टक्केच

author img

By

Published : Jul 6, 2021, 8:29 PM IST

Updated : Jul 6, 2021, 10:13 PM IST

मागील वर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम विदर्भात 90 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या, तर यंदा मात्र 75 टक्केच पेरण्या झाल्या आहेत.

sowing
पेरणी करताना शेतकरी

अमरावती - पश्चिम विदर्भात मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. यंदा जून महिन्यात चांगला पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज होता. त्यामुळे 11 जूनपासूनच मान्सून जाहीर झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे पश्चिम विदर्भातील 75 टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या, पण आता पावसाने दडी मारल्याने पश्चिम विदर्भातील शेकडो हेक्टरवरील शेतावर दुबार पेरणीचे संकट आले आहे.

प्रतिक्रिया देताना शेतकरी

जुलैचा पहिला आठवडा सुरू आहे तरी 25 टक्के पेरण्या अद्यापही बाकी आहेत. मागील वर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम विदर्भात 90 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या, तर यंदा मात्र 75 टक्केच पेरण्या झाल्या आहेत. मागील वर्षी ज्या अकोला जिल्ह्यात 69 टक्के पेरण्या झाल्या होत्या त्या अकोल्या जिल्ह्यात यंदा मात्र 50 टक्केही पेरण्या झाल्या नाहीत.

  • शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट -

हवामान खात्याने 11 जूनला मान्सून राज्यात दाखल झाल्याची घोषणा केली होती. तसेच जून महिन्यातसुद्धा यंदा चांगला पाऊस पडेल असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान खात्याच्या या अंदाजावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी जोमात पेरणी केली. परंतू, पेरणीनंतर मात्र पावसाने जोरदार दडी मारल्याने आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आले आहे. पश्चिम विदर्भातील जवळपास 70, 75 टक्‍क्‍यांपर्यत पेरण्या झाल्यानंतर पेरणीला ब्रेक लागला आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी केली आहे परंतु मागील पंधरा दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पेरलेले बी-बियाणंही अनेक ठिकाण उगवले नाही. तर जिथे पेरणी झाली त्यानंतर पाऊसच आला नसल्याने बियाणे उगवलेले नाही. त्यामुळे आता दुबार पेरणी कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

पश्चिम विदर्भात सोयाबीन, कापूस, तूर ही पिके घेतली जातात. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानंतर शेतकऱ्यांनी लगबगीने आपल्या शेतात पेरणी केली. सुरुवातीला पाऊस चांगला झाला होता. परंतु, पेरणीनंतर मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. पश्चिम विदर्भातील अनेक भागात मात्र अद्यापही पेरण्या मात्र रखडल्या आहेत.

  • अकोला जिल्ह्यातील परिस्थिती -

मागील वर्षी जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने अकोला जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात खरिपाची 69 टक्के पेरणी पूर्ण झाली होती. यंदा मात्र पेरणी पावसाअभावी केवळ 44 टक्केच झाली आहे. पाऊस जर असाच लांबला तर अनेक ठिकाणी उगवलेले बियाणेदेखील खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • शेतकरी करतायेत तुषार सिंचनाचा वापर-

ज्या शेतकऱ्यांनी पावसानंतर पेरणी केली त्या शेतकऱ्यांचे बियाणे निघाले. परंतु, आता पावसाने दडी मारल्याने ते पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्न करावे लागत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे असे शेतकरी तुषार सिंचनाच्या माध्यमातून आपल्या शेतातील पिकाला पाणी देऊन जगवत आहेत.

  • पश्चिम विदर्भात जिल्हानिहाय झालेली पेरणी -
  • बुलडाणा-70%
  • अकोला-44%
  • वाशीम -90%
  • अमरावती-75%
  • यवतमाळ-88%

अमरावती - पश्चिम विदर्भात मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. यंदा जून महिन्यात चांगला पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज होता. त्यामुळे 11 जूनपासूनच मान्सून जाहीर झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे पश्चिम विदर्भातील 75 टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या, पण आता पावसाने दडी मारल्याने पश्चिम विदर्भातील शेकडो हेक्टरवरील शेतावर दुबार पेरणीचे संकट आले आहे.

प्रतिक्रिया देताना शेतकरी

जुलैचा पहिला आठवडा सुरू आहे तरी 25 टक्के पेरण्या अद्यापही बाकी आहेत. मागील वर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम विदर्भात 90 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या, तर यंदा मात्र 75 टक्केच पेरण्या झाल्या आहेत. मागील वर्षी ज्या अकोला जिल्ह्यात 69 टक्के पेरण्या झाल्या होत्या त्या अकोल्या जिल्ह्यात यंदा मात्र 50 टक्केही पेरण्या झाल्या नाहीत.

  • शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट -

हवामान खात्याने 11 जूनला मान्सून राज्यात दाखल झाल्याची घोषणा केली होती. तसेच जून महिन्यातसुद्धा यंदा चांगला पाऊस पडेल असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान खात्याच्या या अंदाजावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी जोमात पेरणी केली. परंतू, पेरणीनंतर मात्र पावसाने जोरदार दडी मारल्याने आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आले आहे. पश्चिम विदर्भातील जवळपास 70, 75 टक्‍क्‍यांपर्यत पेरण्या झाल्यानंतर पेरणीला ब्रेक लागला आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी केली आहे परंतु मागील पंधरा दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पेरलेले बी-बियाणंही अनेक ठिकाण उगवले नाही. तर जिथे पेरणी झाली त्यानंतर पाऊसच आला नसल्याने बियाणे उगवलेले नाही. त्यामुळे आता दुबार पेरणी कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

पश्चिम विदर्भात सोयाबीन, कापूस, तूर ही पिके घेतली जातात. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानंतर शेतकऱ्यांनी लगबगीने आपल्या शेतात पेरणी केली. सुरुवातीला पाऊस चांगला झाला होता. परंतु, पेरणीनंतर मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. पश्चिम विदर्भातील अनेक भागात मात्र अद्यापही पेरण्या मात्र रखडल्या आहेत.

  • अकोला जिल्ह्यातील परिस्थिती -

मागील वर्षी जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने अकोला जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात खरिपाची 69 टक्के पेरणी पूर्ण झाली होती. यंदा मात्र पेरणी पावसाअभावी केवळ 44 टक्केच झाली आहे. पाऊस जर असाच लांबला तर अनेक ठिकाणी उगवलेले बियाणेदेखील खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • शेतकरी करतायेत तुषार सिंचनाचा वापर-

ज्या शेतकऱ्यांनी पावसानंतर पेरणी केली त्या शेतकऱ्यांचे बियाणे निघाले. परंतु, आता पावसाने दडी मारल्याने ते पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्न करावे लागत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे असे शेतकरी तुषार सिंचनाच्या माध्यमातून आपल्या शेतातील पिकाला पाणी देऊन जगवत आहेत.

  • पश्चिम विदर्भात जिल्हानिहाय झालेली पेरणी -
  • बुलडाणा-70%
  • अकोला-44%
  • वाशीम -90%
  • अमरावती-75%
  • यवतमाळ-88%
Last Updated : Jul 6, 2021, 10:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.