ETV Bharat / state

इज्तेमाला जाणाऱ्या भाविकांचा त्रास पाहून मुस्लीम बांधवांनीच बुजविले रस्त्यावरील खड्डे - इज्तेमाला जाणाऱ्या भाविकांचा त्रास पाहून मुस्लीम बांधवांनीच बुजविले रस्त्यावरील खड्डे

मुस्लीम बांधवांनी कुठल्याही शासकीय निधीची अपेक्षा न करता स्वत:च्या खर्चाने रस्त्याची दुरूस्ती केली. यामुळे मुस्लीम बांधवासह या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांची सोय झाली. अवघ्या दोन दिवसांत दिवसभर काम करून या रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली आहे. या कामाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

maharashtra state tablighi ijtema in amravati
इज्तेमाला जाणाऱ्या भाविकांचा त्रास पाहून मुस्लीम बांधवांनीच बुजविले रस्त्यावरील खड्डे
author img

By

Published : Dec 8, 2019, 7:22 PM IST

अमरावती - शनिवारपासून अमरावती शहरालगत नांदगाव पेठ येथे 'दिनी इज्तेमा'ला सुरूवात झाली असून यासाठी राज्यभरातून मुस्लीम बांधव चांदूर रेल्वे मार्गे इज्तेमास्थळी पोहोचत आहे. सावंगी मग्रापूर ते मार्डीपर्यंत खराब झालेल्या रस्त्यामुळे या भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब लक्षात घेता चांदूर रेल्वे परिसरातील मुस्लीम बांधवांनी रस्त्यावर पडलेले खड्डे मुरुम आणि मातीने बुजवले.

मुस्लीम बांधवांनी कुठल्याही शासकीय निधीची अपेक्षा न करता स्वत:च्या खर्चाने रस्त्याची दुरूस्ती केली. यामुळे मुस्लीम बांधवासह या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांची सोय झाली. अवघ्या दोन दिवसांत दिवसभर काम करून या रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली आहे. या कामाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

इज्तेमाला जाणाऱ्या भाविकांचा त्रास पाहून मुस्लीम बांधवांनीच बुजविले रस्त्यावरील खड्डे

अमरावती शहरालगत नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरात १ हजार २०१ एकर परिसरात दिनी इज्तेमाचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यासाठी ४८ लाख चौरस फुटांचा भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. या सभामंडपात एकाच वेळी ४ लाख मुस्लिम बांधवांना बसता येईल, अशी व्यवस्था आहे. या सभा मंडपाच्या दोन्ही भागात तीनशे फुटांची मोकळी जागा सोडण्यात आली आहे. या सोहळ्यात १० लाखाच्यावर मुस्लिम बांधव सहभागी होतील असा अंदाज आहे.

इज्तेमा सोहळ्याच्या आयोजनासाठी अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ वाशिम सोबतच नागपूर जिल्हा आणि छत्तीसगड राज्यातील महत्त्वाच्या मशिदींनी जबाबदारी घेतली आहे. या ठिकाणी येणाऱ्या मुस्लिम बांधवांना ३० रुपयांमध्ये भोजनाची सोय करण्यात आली असून राहण्यासाठी एकूण ६० मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. एका मंडपात एकाच वेळी ४ हजार लोक राहू शकतात, अशी व्यवस्था आहे. या शिवाय या परिसरात एकूण १३०० खासगी हॉटेलही लागले आहेत.

अमरावती - शनिवारपासून अमरावती शहरालगत नांदगाव पेठ येथे 'दिनी इज्तेमा'ला सुरूवात झाली असून यासाठी राज्यभरातून मुस्लीम बांधव चांदूर रेल्वे मार्गे इज्तेमास्थळी पोहोचत आहे. सावंगी मग्रापूर ते मार्डीपर्यंत खराब झालेल्या रस्त्यामुळे या भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब लक्षात घेता चांदूर रेल्वे परिसरातील मुस्लीम बांधवांनी रस्त्यावर पडलेले खड्डे मुरुम आणि मातीने बुजवले.

मुस्लीम बांधवांनी कुठल्याही शासकीय निधीची अपेक्षा न करता स्वत:च्या खर्चाने रस्त्याची दुरूस्ती केली. यामुळे मुस्लीम बांधवासह या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांची सोय झाली. अवघ्या दोन दिवसांत दिवसभर काम करून या रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली आहे. या कामाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

इज्तेमाला जाणाऱ्या भाविकांचा त्रास पाहून मुस्लीम बांधवांनीच बुजविले रस्त्यावरील खड्डे

अमरावती शहरालगत नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरात १ हजार २०१ एकर परिसरात दिनी इज्तेमाचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यासाठी ४८ लाख चौरस फुटांचा भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. या सभामंडपात एकाच वेळी ४ लाख मुस्लिम बांधवांना बसता येईल, अशी व्यवस्था आहे. या सभा मंडपाच्या दोन्ही भागात तीनशे फुटांची मोकळी जागा सोडण्यात आली आहे. या सोहळ्यात १० लाखाच्यावर मुस्लिम बांधव सहभागी होतील असा अंदाज आहे.

इज्तेमा सोहळ्याच्या आयोजनासाठी अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ वाशिम सोबतच नागपूर जिल्हा आणि छत्तीसगड राज्यातील महत्त्वाच्या मशिदींनी जबाबदारी घेतली आहे. या ठिकाणी येणाऱ्या मुस्लिम बांधवांना ३० रुपयांमध्ये भोजनाची सोय करण्यात आली असून राहण्यासाठी एकूण ६० मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. एका मंडपात एकाच वेळी ४ हजार लोक राहू शकतात, अशी व्यवस्था आहे. या शिवाय या परिसरात एकूण १३०० खासगी हॉटेलही लागले आहेत.

Intro:अखेर मुस्लीम बांधवांनीच बुजविले रस्त्यावरील खड्डे

चांदूर रेल्वेमार्गे इज्तेमाला जाणाऱ्या बांधवांसाठी केली सोय

अमरावती अँकर

अमरावती येथे राज्यस्तरीय इज्तेमामध्ये विविध राज्य व देश - विदेशातील मुस्लीम बांधव पोहचत असतांना त्यांच्या सेवेसाठी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील मुस्लीम समुदाय तत्पर असल्याचे दिसत आहे. शनिवारी चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापुर ते मार्डी रस्त्यावरील खड्डे मुस्लीम बांधवांनी मुरूम व मातीने बुजविले असुन इज्तेमाला चांदूर रेल्वेमार्गे जाणाऱ्या बांधवांसाठी सोय केली आहे.

चांदूर रेल्वे तालुक्यातील रस्त्यांची दयनिय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठ - मोठे खड्डे पडले असतांना काही रस्त्यांची तर अक्षरक्ष: चाळणी झाली आहे. असे असतांनाही संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अशातच शनिवार पासुन अमरावती येथे आलिमी इज्तेमाला सुरूवात झाली व अनेक जिल्ह्यातील तसेच इतर काही राज्यातील मुस्लीम बांधव चांदूर रेल्वे मार्गे इज्तेमास्थळी पोहचत आहे. सावंगी मग्रापुर ते मार्डी पर्यंत खराब असलेल्या रस्त्यामुळे या भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागला असता. ही बाब लक्षात घेता कुठल्याही शासकीय कार्यालयाच्या चकरा न टाकता स्वत:च व काही मजुर स्व:खर्चाने लावुन रस्त्याची दुरूस्ती करवुन घेतली. यामुळे मुस्लीम बांधवांची सोय झाली आहे. दोन दिवसांत दिवसभर काम करून या रस्त्याची दुरूस्ती मुस्लीम बांधवांनी स्व:तच केली. त्यामुळे त्यांचे हे कार्य कौतुकास्पद ठरल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.