ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांना शेतकरी म्हणजे काय हेच माहीत नाही, शरद पवारांचा टोला

author img

By

Published : Oct 9, 2019, 5:33 PM IST

जप सरकारने अफलातून निर्णय घेत नोटबंदी केली. नोटबंदी करून पंतप्रधानांनी काय तीर मारला अशी घनाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली.

शरद पवार

अकोला - भाजप सरकारने अफलातून निर्णय घेत नोटबंदी केली. नोटबंदी करून पंतप्रधानांनी काय तीर मारला, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. या नोटबंदीने देशाची आर्थिक स्थिती बिघडवली. रोजगार गेले, बेरोजगारी वाढल्याचे पवार म्हणाले. शेतकरी म्हणजे काय हे मुख्यमंत्र्यांना माहीतच नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.


वाडेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम गावंडे व काँग्रेसचे उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. राज्याच्या लोकांना परिवर्तन हवे आहे. बदल एकदम कोणी मागत नसतो. सैनिकांच्या हवाई दलाच्या हल्ल्याचा उपयोग मते मागण्यांसाठी कोणी केला नव्हता. सैन्याने दाखविलेल्या शौर्याचा उपयोग इंदिरा गांधी यांनी कधी केला नसल्याचे पवार म्हणाले. आज या देशाच्या यातना अधिक वाढल्या आहेत.

शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

हेही वाचा - सरकारची दिवाळी भेट : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ

हेही वाचा - येत्या 5 वर्षात सर्व शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू - उद्धव ठाकरे


अभी तो मै जवान हूँ
‌मी अजूनही जवान आहे. भाजपच्या सरकारला घरी पाठवल्यानंतर मी जाणार आहे असे म्हणत 'मै सभी को घर भेजूंगा तब मै घर जावूंगा', असेही पवार म्हणाले. आम्ही एक नवी पिढीची फौज तयार करू, संघटना करून जातीयवादी ताकदीला हटवू, असेही पवार म्हणाले.

‌आमच्या सरकारने कर्जमाफी केली. त्यावर थांबलो नाही तर नवीन कर्ज देण्याचा निर्णय घेतला. रक्कम कसे द्यायचे याचे नियोजन केले. हा निर्णय आम्ही घेतल्याचे पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांबद्दल काही आस्था नाही. त्यांना शेतकरी काय हे माहीतच नसल्याचा आरोप त्यांनी केला.



‌हे सरकार शेतकऱ्यांना मदत करीत नाही. शेती मालाच्या किंमती वाढत नाहीत. सोयाबीन पीक चांगले आहे, पण शेंगामध्ये दाणा कमी असल्याने उत्पादन कमी होणार असल्याचे पवार म्हणाले. कापसाची सुद्धा हीच परिस्थिती असल्याचे पवार म्हणाले. सत्तेत आल्यावर कापसाला ७ हजार रुपयांचा दर देऊ असे म्हणाले होते. परंतू, त्यांनी या ५ वर्षात दिलेला शब्द पाळला नाही. आशांना घरचा रस्ता दाखविला पाहिजे. कर्जमाफी सरसकट करू, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. परंतू, 31 टक्के लोकांची कर्जमाफी झाली. ही घोषणा खरी ठरली नसल्याचे पवार म्हणाले.

कापडगिरण्या बंद झाल्या. कारखानदारी बंद झाली. कारखाने बंद केल्यामुळे रोजगार जात आहेत. नवीन कारखाने निघत नाहीत. जेट कंपनी बंद झाली. 20 हजार लोकांची नोकरी गेली. यामध्ये भाजप सरकारने लक्ष घातले नसल्याचा आरोपही पवार यांनी केला.

अकोला - भाजप सरकारने अफलातून निर्णय घेत नोटबंदी केली. नोटबंदी करून पंतप्रधानांनी काय तीर मारला, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. या नोटबंदीने देशाची आर्थिक स्थिती बिघडवली. रोजगार गेले, बेरोजगारी वाढल्याचे पवार म्हणाले. शेतकरी म्हणजे काय हे मुख्यमंत्र्यांना माहीतच नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.


वाडेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम गावंडे व काँग्रेसचे उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. राज्याच्या लोकांना परिवर्तन हवे आहे. बदल एकदम कोणी मागत नसतो. सैनिकांच्या हवाई दलाच्या हल्ल्याचा उपयोग मते मागण्यांसाठी कोणी केला नव्हता. सैन्याने दाखविलेल्या शौर्याचा उपयोग इंदिरा गांधी यांनी कधी केला नसल्याचे पवार म्हणाले. आज या देशाच्या यातना अधिक वाढल्या आहेत.

शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

हेही वाचा - सरकारची दिवाळी भेट : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ

हेही वाचा - येत्या 5 वर्षात सर्व शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू - उद्धव ठाकरे


अभी तो मै जवान हूँ
‌मी अजूनही जवान आहे. भाजपच्या सरकारला घरी पाठवल्यानंतर मी जाणार आहे असे म्हणत 'मै सभी को घर भेजूंगा तब मै घर जावूंगा', असेही पवार म्हणाले. आम्ही एक नवी पिढीची फौज तयार करू, संघटना करून जातीयवादी ताकदीला हटवू, असेही पवार म्हणाले.

‌आमच्या सरकारने कर्जमाफी केली. त्यावर थांबलो नाही तर नवीन कर्ज देण्याचा निर्णय घेतला. रक्कम कसे द्यायचे याचे नियोजन केले. हा निर्णय आम्ही घेतल्याचे पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांबद्दल काही आस्था नाही. त्यांना शेतकरी काय हे माहीतच नसल्याचा आरोप त्यांनी केला.



‌हे सरकार शेतकऱ्यांना मदत करीत नाही. शेती मालाच्या किंमती वाढत नाहीत. सोयाबीन पीक चांगले आहे, पण शेंगामध्ये दाणा कमी असल्याने उत्पादन कमी होणार असल्याचे पवार म्हणाले. कापसाची सुद्धा हीच परिस्थिती असल्याचे पवार म्हणाले. सत्तेत आल्यावर कापसाला ७ हजार रुपयांचा दर देऊ असे म्हणाले होते. परंतू, त्यांनी या ५ वर्षात दिलेला शब्द पाळला नाही. आशांना घरचा रस्ता दाखविला पाहिजे. कर्जमाफी सरसकट करू, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. परंतू, 31 टक्के लोकांची कर्जमाफी झाली. ही घोषणा खरी ठरली नसल्याचे पवार म्हणाले.

कापडगिरण्या बंद झाल्या. कारखानदारी बंद झाली. कारखाने बंद केल्यामुळे रोजगार जात आहेत. नवीन कारखाने निघत नाहीत. जेट कंपनी बंद झाली. 20 हजार लोकांची नोकरी गेली. यामध्ये भाजप सरकारने लक्ष घातले नसल्याचा आरोपही पवार यांनी केला.

Intro:अकोला - भाजप सरकारने अफलातून निर्णय घेत नोटबंदी केली. नोटबंदी करून पंतप्रधानांनी काय भारे बांधले, अशी घनाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वाडेगाव येथील जाहीर सभेत केली. Body:राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम गावंडे व काँग्रेसच्या उमेदवारांसाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार नातिकोद्दीन खतीब हे होते. पुढे ते म्हणाले, नोटबंदीनंतर सामान्य माणूस हा बँकेच्या रांगेत पैसे काढण्यासाठी उभे होते. या नोटबंदीने देशाची आर्थिक स्थिती बिघडविली. रोजगार गेले, बेरोजगारी वाढली, असे ही ते म्हणाले.
राज्याच्या लोकांना परिवर्तन पाहिजे. बदल एकदम कोणी मागत नसतो. सैनिकांच्या हवाईदलाच्या हल्ल्याचा उपयोग मते मागण्यांसाठी कोणी केला नव्हता. सैन्याने दाखविलेल्या शौर्याचा उपयोग इंदिरा गांधी यांनी कधी केला नाही. आज काय सांगणार आहे. या देशाच्या यातना अधिक वाढले आहे. मुख्यमंत्री यांनी केलेल्या कामाच्या उद्धराच्या बाबतीत आढावा घेण्याची ही निवडणूक आहे.

‌आमच्या सरकारने कर्ज माफ केली. त्यावर थांबले नाही तर नवीन कर्ज देण्याचा निर्णय घेतला. रक्कम कसे द्यायचे याचे नियोजन केले. हा निर्णय आम्ही घेतला. बँकेवर आम्ही ओझे टाकले नाही. कास्तकाराना आम्ही मदत केली. फडणवीस यांना शेतकऱ्यांबद्दल काही आस्था नाही. त्यांना शेतकरी काय हे माहीत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

‌सरकार मदत करीत नाही. शेती मालाच्या किंमती वाढत नाही. सोयाबीन पीक चांगले आहे, पण शेंगे मध्ये दाणा कमी असल्याने उत्पादन कमी होणार. हीच परिस्थिती कापसाची आहे. सत्तेत आल्यावर कापसावर भाव 7 हजार देऊ असे ते म्हणाले. परंतु, त्यांनी या पाच वर्षात दिलेला शब्द पाळला नाही. आशाना घरचा रस्ता दाखविला पाहिजे. मुख्यमंत्री यांनी कर्जमाफी सरसकट करू, असे म्हटले. परंतु, 31 टक्के लोकांना कर्जमाफी झाली. ही घोषणा खरी ठरली नाही. आत्महत्या या उगीच होत नाही. कास्तकार संकटात आहे.

‌मी जोपर्यंत आहे, तोपर्यंत कास्तकाराना त्यांचे भाव देण्यासाठी कटिबद्ध आहे. कापडगिरणी बंद झाली. कारखानदारी बंद झाली. कारखाने बंद केले जातात, रोजगार जातात. नविन कारखाने निघत नाही. बेकारी उत्पन्न झाली.
‌जेट कंपनी बंद झाली. 20 हजार लोकांची नोकरी गेली. भाजप सरकार ने लक्ष घातले नसल्याचा आरोप ही त्यांनी केला.

‌मी अजूनही जवान आहे. यांना घरी पाठविल्या नंतर मी जाणार आहे असे म्हणत 'मै सभी को घर भेजूनगा तब मै घर जावूनगा'. आम्ही एक नवी पिढीची फौज तयार करू, संघटना करून जातीयवादी ताकदीला हटवून, असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शेवटी म्हणाले.

‌सूचना - या बतमीतील व्हिडीओ मोजोवर पाठवीत आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.