ETV Bharat / state

बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या पहाटेपासूनच लागल्या रांगा; प्रहारने पाजला चहा

author img

By

Published : May 26, 2021, 7:50 AM IST

कृषी केंद्राच्या दुकानांवर शेतकऱ्यांच्या लांबलचक रांगा लागत आहे. मात्र, बियाणे लवकर मिळावे या हेतून शेतकरी रांग सोडून चहा पाण्याला जाऊ शकत नाहीत, ही अडचण ओळखून प्रहार शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना रांगेतच चहा, पाणी बिस्कीटचे वितरण केले.

प्रहारने पाजला चहा
प्रहारने पाजला चहा

अकोला - कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, सध्या खरीप हंगाम तोंडावर असल्याने या लॉकडाऊनमधून कृषी सेवा केंद्र सुरू ठेवण्यास काही प्रमाणात मुभा दिली आहे. जिल्ह्यात सध्या कृषी केंद्र दुकाने उघडण्याची वेळ सकाळी सात ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. मात्र, खरीपाच्या पेरणीची लगबग सुरू झाल्याने बियाणे घेण्यासाठी शेतकरी पहाटेपासूनच दुकानाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत प्रहार संघटनेच्या वतीने पहाटेपासून बियाणे खरेदीसाठी रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना चहा पाण्याचे वाटप करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या पहाटेपासूनच लागल्या रांगा
चहाचे वाटप करताना प्रहारचे कार्यकर्ते

खरीप हंगामातील पेरणी करण्यासाठी लॉकडाऊन काळातही शेतकरी बियाणे खरेदीसाठी पहाटेच शहरात येत आहेत. कृषी केंद्राच्या दुकानांवर शेतकऱ्यांच्या लांबलचक रांगा लागत आहे. मात्र, बियाणे लवकर मिळावे या हेतून शेतकरी रांग सोडून चहा पाण्याला जाऊ शकत नाहीत, ही अडचण ओळखून प्रहार शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना रांगेतच चहा, पाणी बिस्कीटचे वितरण केले. सध्या शेतकरी महाबीजचे सोयाबीन बियाणे खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर शेतकऱ्यांनी प्रहार संघटनेचे कौतुक करत समाधान व्यक्त केले आहे.

बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या पहाटेपासूनच लागल्या रांगा

कोरोना काळात शेतकऱ्यांची गर्दी, पोलिसांचा बंदोबस्त-


पहाटे पासून शेतकरी शहरातील कृषी केंद्रावर येत आहे. दुकान उघडण्याआधी दुकानासमोर रांगा लावीत आहे. या रांगा लांबलचक लागत आहे. शेकडो शेतकऱ्यांच्या या रांगा आहेत. बियाने घेण्यासाठी शेतकऱ्यांची मोठ्याप्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोना नियमांचे पालन होताना दिसून येत आहे. त्यामुळे रामदास पेठ पोलिसांनी कृषी केंद्राबाहेर बंदोबस्त तैनात करत शेतकऱ्यांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांच्या पहाटेपासूनच लागल्या रांगा
कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी पोलीस बंदोबस्त

अकोला - कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, सध्या खरीप हंगाम तोंडावर असल्याने या लॉकडाऊनमधून कृषी सेवा केंद्र सुरू ठेवण्यास काही प्रमाणात मुभा दिली आहे. जिल्ह्यात सध्या कृषी केंद्र दुकाने उघडण्याची वेळ सकाळी सात ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. मात्र, खरीपाच्या पेरणीची लगबग सुरू झाल्याने बियाणे घेण्यासाठी शेतकरी पहाटेपासूनच दुकानाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत प्रहार संघटनेच्या वतीने पहाटेपासून बियाणे खरेदीसाठी रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना चहा पाण्याचे वाटप करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या पहाटेपासूनच लागल्या रांगा
चहाचे वाटप करताना प्रहारचे कार्यकर्ते

खरीप हंगामातील पेरणी करण्यासाठी लॉकडाऊन काळातही शेतकरी बियाणे खरेदीसाठी पहाटेच शहरात येत आहेत. कृषी केंद्राच्या दुकानांवर शेतकऱ्यांच्या लांबलचक रांगा लागत आहे. मात्र, बियाणे लवकर मिळावे या हेतून शेतकरी रांग सोडून चहा पाण्याला जाऊ शकत नाहीत, ही अडचण ओळखून प्रहार शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना रांगेतच चहा, पाणी बिस्कीटचे वितरण केले. सध्या शेतकरी महाबीजचे सोयाबीन बियाणे खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर शेतकऱ्यांनी प्रहार संघटनेचे कौतुक करत समाधान व्यक्त केले आहे.

बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या पहाटेपासूनच लागल्या रांगा

कोरोना काळात शेतकऱ्यांची गर्दी, पोलिसांचा बंदोबस्त-


पहाटे पासून शेतकरी शहरातील कृषी केंद्रावर येत आहे. दुकान उघडण्याआधी दुकानासमोर रांगा लावीत आहे. या रांगा लांबलचक लागत आहे. शेकडो शेतकऱ्यांच्या या रांगा आहेत. बियाने घेण्यासाठी शेतकऱ्यांची मोठ्याप्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोना नियमांचे पालन होताना दिसून येत आहे. त्यामुळे रामदास पेठ पोलिसांनी कृषी केंद्राबाहेर बंदोबस्त तैनात करत शेतकऱ्यांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांच्या पहाटेपासूनच लागल्या रांगा
कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी पोलीस बंदोबस्त
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.