ETV Bharat / state

शेतकऱ्यांची पीकविम्याच्या थकीत रकमेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक

शेतकऱ्यांनी वर्षभरापूर्वी पीक विमा काढला होता. त्यांचा पीक विमा मंजूर देखील झाला होता. त्यासाठी शेतकऱ्यांनी पीकविमा कंपन्यांकडे बँक खात्याचे क्रमांक देखील दिले. मात्र, खाते क्रमांक चुकीचे असल्याने त्यांचे पैसे परत पाठवण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळाले नाही.

author img

By

Published : Dec 10, 2019, 9:54 PM IST

farmers visit to akola collector office
शेतकऱ्यांची पीकविम्याच्या थकीत रकमेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक

अकोला - पीक विम्याचे पैसे बँक खात्याचा क्रमांक चुकीचा असल्यामुळे परत गेले. त्यामुळे ते मिळवण्यासाठी आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. यावेळी विमा कंपनीचे अधिकारी, कृषी अधीक्षक आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या समक्ष शेतकऱ्यांना विम्याचे पैसे परत मिळवून देण्यासाठी तोडगा काढण्यात आला.

शेतकऱ्यांची पीकविम्याच्या थकीत रकमेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक

शेतकऱ्यांनी वर्षभरापूर्वी पीक विमा काढला होता. त्यांचा पीक विमा मंजूर देखील झाला होता. त्यासाठी शेतकऱ्यांनी पीकविमा कंपन्यांकडे बँक खात्याचे क्रमांक देखील दिले. मात्र, खाते क्रमांक चुकीचे असल्याने त्यांचे पैसे परत पाठवण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळाले नाही. थकीत पीकविम्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली. मात्र, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी लोणकर यांची भेट घेतली. यावेळी कृषी अधीक्षक वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी श्याम चिवडकर, व्यवस्थापक मानकर यावेळी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि इतर बँकेचे शेतकरी, असे एकूण 900 शेतकऱ्यांच्या पीकविम्याची रक्कम परत गेली. त्या शेतकऱ्यांची यादी काढण्याच्या सूचना विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ही यादी आल्यानंतर ती कृषी अधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी हे संबधित शेतकऱ्यांना भेटणार आहेत. तसेच बँक खात्याचा क्रमांक व्यवस्थित करून त्यांना पीकविमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.

अकोला - पीक विम्याचे पैसे बँक खात्याचा क्रमांक चुकीचा असल्यामुळे परत गेले. त्यामुळे ते मिळवण्यासाठी आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. यावेळी विमा कंपनीचे अधिकारी, कृषी अधीक्षक आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या समक्ष शेतकऱ्यांना विम्याचे पैसे परत मिळवून देण्यासाठी तोडगा काढण्यात आला.

शेतकऱ्यांची पीकविम्याच्या थकीत रकमेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक

शेतकऱ्यांनी वर्षभरापूर्वी पीक विमा काढला होता. त्यांचा पीक विमा मंजूर देखील झाला होता. त्यासाठी शेतकऱ्यांनी पीकविमा कंपन्यांकडे बँक खात्याचे क्रमांक देखील दिले. मात्र, खाते क्रमांक चुकीचे असल्याने त्यांचे पैसे परत पाठवण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळाले नाही. थकीत पीकविम्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली. मात्र, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी लोणकर यांची भेट घेतली. यावेळी कृषी अधीक्षक वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी श्याम चिवडकर, व्यवस्थापक मानकर यावेळी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि इतर बँकेचे शेतकरी, असे एकूण 900 शेतकऱ्यांच्या पीकविम्याची रक्कम परत गेली. त्या शेतकऱ्यांची यादी काढण्याच्या सूचना विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ही यादी आल्यानंतर ती कृषी अधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी हे संबधित शेतकऱ्यांना भेटणार आहेत. तसेच बँक खात्याचा क्रमांक व्यवस्थित करून त्यांना पीकविमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.

Intro:अकोला - पिक विमा कडून आलेले शेतकऱ्यांसाठी कडून आलेले शेतकऱ्यांसाठी चे पैसे बँक खात्यांच्या क्रमांक चुकीचा असल्याने परत गेल्यामुळे ते पैसे मिळविण्यासाठी आज आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात धडक दिली. यावेळी इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी, कृषी अधीक्षक व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या समक्ष समक्ष यांच्या समक्ष यांच्या समक्ष शेतकऱ्यांना विमा कंपनीचे पैसे मिळवण्यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.Body:वर्षभरापूर्वी शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यांचा पिक विमा मंजूर झाला होता. पीकविमा कम्पनिकडे शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे नंबर ही देण्यात आले होते. परंतु, काही शेतकऱयांच्या बँक खात्याचे नंबर चुकीचे असल्याने त्यांचे पैसे परत पाठविण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना पिकविमा मिळाला नाही. थकीत पीकविमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी इन्शुरन्स कम्पणीच्या कार्यालयात भेटी दिल्या. मात्र, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे शेतकऱयांनी आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी लोणकर यांच्या भेट घेतली. यावेळी, कृषी अधीक्षक श्री. वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, नॅशनल इन्शुरन्स कम्पनीचे अधिकारी श्याम चिवडकर, मॅनेजर श्री. मानकर हे यावेळी उपस्थित होते. बैठकीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व इतर बँकेचे शेतकरी असे एकूण 900 शेतकऱ्यांच्या पीकविम्याची रक्कम परत गेली. त्यामुळे, ज्या शेतकऱ्यांची पीकविमा रक्कम परत गेली, त्या शेतकऱ्यांची यादी काढण्याच्या सूचना इन्शुरन्स कम्पणीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ही यादी आल्यानंतर ती कृषी अधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी हे सम्बधित शेतकऱ्यांना भेटून बँकेचा क्रमांक व्यवस्थित करून त्यांना पीकविमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.

बाईट - आमदार नितीन देशमुखConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.