अकोला- शहराला पाणी पुरवठा करणारा काटेपूर्णा प्रकल्प परतीच्या पावसाने तुडुंब भरला आहे. दिवाळीपासून पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे अवघ्या दहा दिवसात हा प्रकल्प ३० टक्के इतका भरला आहे. त्यापूर्वी हा प्रकल्प ७० टक्के भरलेला होता. सध्या हा प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे प्रकल्पाचे चारही दरवाजे एक तासांसाठी दहा सेंटीमीटर उघडून त्यातून २५ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. प्रकल्पातील पाण्यामुळे अकोलेकरांचा पाणी प्रश्न मिटणार आहे. मात्र, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
काटेपूर्णा प्रकल्पाची क्षमता ८६.३५ दलघमी आहे. सध्या हा प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. या प्रकल्पातून अकोला शहर आणि ८,३२५ हेक्टर जमिनीच्या सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. या प्रकल्पाचे चार दरवाजे एक तासापर्यंत दहा सेंटीमीटर उघडून त्यातून २५ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. १०० टक्के भरलेल्या या प्रकल्पातून विसर्ग होत असल्यामुळे त्यातून वर्षभर अकोलेकरांना नियमित पाणीपुरवठा होणार आहे व सिंचनाचा प्रश्न देखील मिटणार आहे. विसर्गामुळे अंदाजे सव्वाआठ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. मात्र, नदीकाठच्या १८ गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
२०१६ मध्ये काटेपूर्णा प्रकल्प शंभर टक्के भरला होता. त्यानंतर हा प्रकल्प २०१६ च्या तुलनेत कमी प्रमाणात भरत होता. २०१८ मध्ये हा प्रकल्प ९४.६० टक्के भरला होता. त्यावेळी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर यातील पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले होते. दरम्यान, त्यानंतर उन्हाळ्यात या प्रकल्पात १५ टक्के पाणीसाठा होता. पावसाळा सुरू होण्याआधी या प्रकल्पात ३ टक्के पाणीसाठा उरला होता.
हेही वाचा- अकोल्यात ऑटो आणि दुचाकीचा अपघात; सहा जण जखमी
दिवाळीआधी या प्रकल्पात ७० टक्के पाणीसाठा होता. दिवाळी पासून पडलेला परतीचा पाऊस हा या प्रकल्पाला जीवदान देणारा ठरला. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात पाऊस पडला की हा प्रकल्प भरतो. दिवाळी नंतर परतीच्या पावसाने एक दिवस लावलेल्या हजेरीने मालेगावात ७९ मिमी पाऊस पडला. त्यामुळे या प्रकल्पाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे हा प्रकल्प शंभर टक्के भरला. प्रकल्पाचे चार दरवाजे एक तासांसाठी दहा सेंटीमीटर उघडून त्यातून २५ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
हेही वाचा- विमा कंपनीकडून मुदतवाढ मिळण्यासाठी आमदाराचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र; मुख्यमंत्र्यांनाही केला फोन