ETV Bharat / state

Merger of ST - तुम्ही एअर इंडियाचे खाजगिकरणावर का बोलले नाही?, अजित पवारांची भाजपवर टीका

एअर इंडियाचे खाजगिकरण करणारे राज्यात एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा भडकावून वातावरण बिघडवत आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केला आहे. एसटीचे विलीनीकरण करण्याची मागणीसाठी आंदोलन करत आहेत. मात्र, एअर इंडियाचे खाजगिकरण का केले याबद्दल बोलायला हे तयार नाहीत असा प्रश्नही पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत इथे विविध विकासकामांचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.

author img

By

Published : Nov 14, 2021, 7:42 AM IST

अजित पवार कार्यक्रमात बोलताना
अजित पवार कार्यक्रमात बोलताना

अहमदनगर - एअर इंडियाचे खाजगिकरण करणारे राज्यात एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा भडकावून वातावरण बिघडवत आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केला आहे. एसटीचे विलीनीकरण करण्याची मागणीसाठी आंदोलन करत आहेत. मात्र, एअर इंडियाचे खाजगिकरण का केले याबद्दल बोलायला हे तयार नाहीत असा प्रश्नही पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत इथे विविध विकासकामांचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जत येथे आयोजित कार्यक्रमात बोलतान

एअर इंडिया टाटांना देत एअर इंडियाचे खाजगिकरण केले (Merger of ST)

एसटी महामंडळाचे कामगार आपलेच शेतकऱ्यांची मुले आहेत. त्यांचा पगार वाढला पाहिजे याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, गेल्या साठ वर्षात आतापर्यंत एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा कधी आला नाही. तो आत्ताच का आला? जे दोन-चार आमदार आंदोलनात उतरून कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावत आहेत त्यांना मला विचारायचे की केंद्रात कुणाचे सरकार आहे? कोण पंतप्रधान आहेत? असे म्हणत अजित पवार यांनी केंद्राने एअर इंडियाच्या केलेल्या खाजगिकरणावर आपला रोख नेत केंद्रात ज्यांचे सरकार आहे, त्यांनी एअर इंडिया टाटांना देत एअर इंडियाचे खाजगिकरण केले. आता त्यांच्याच पक्षाचे लोकं राज्यात एसटीच्या शासनात विलीनीकरणाचा अट्टाहास करत कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावत आहेत. मात्र, ते एअर इंडियाच्या खाजगिकरणावर ते का बोलत नाहीत? असा प्रश्न पवार यांनी भाजपला विचारला आहे.

राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या योग्य मागण्यांवर सकारात्मक (ST workers strike in maharashtra)

कर्जत इथे नव्या एसटी डेपोच्या कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आल्याचे सांगत पवार यांनी आपल्याला एसटी कर्मचाऱ्यांचे एक शिष्टमंडळाने भेट घेतल्याचे सांगितले. त्यांनाही पवार यांनी राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या योग्य मागण्यांवर सकारात्मक असून मार्ग काढला जाईल असे आश्वासन दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः यात लक्ष घातले आहे असही पवार यावेळी म्हणाले आहेत. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, राज्यमंत्री दत्ता भरणे, अब्दुल सत्तार आदी उपस्थित होते.

हेही वाचा - गडचिरोलीतील चकमकीत नक्सलवाद्यांचा मोठा नेता ठार?, कोण आहे मिलिंद तेलतुंबडे?

अहमदनगर - एअर इंडियाचे खाजगिकरण करणारे राज्यात एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा भडकावून वातावरण बिघडवत आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केला आहे. एसटीचे विलीनीकरण करण्याची मागणीसाठी आंदोलन करत आहेत. मात्र, एअर इंडियाचे खाजगिकरण का केले याबद्दल बोलायला हे तयार नाहीत असा प्रश्नही पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत इथे विविध विकासकामांचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जत येथे आयोजित कार्यक्रमात बोलतान

एअर इंडिया टाटांना देत एअर इंडियाचे खाजगिकरण केले (Merger of ST)

एसटी महामंडळाचे कामगार आपलेच शेतकऱ्यांची मुले आहेत. त्यांचा पगार वाढला पाहिजे याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, गेल्या साठ वर्षात आतापर्यंत एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा कधी आला नाही. तो आत्ताच का आला? जे दोन-चार आमदार आंदोलनात उतरून कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावत आहेत त्यांना मला विचारायचे की केंद्रात कुणाचे सरकार आहे? कोण पंतप्रधान आहेत? असे म्हणत अजित पवार यांनी केंद्राने एअर इंडियाच्या केलेल्या खाजगिकरणावर आपला रोख नेत केंद्रात ज्यांचे सरकार आहे, त्यांनी एअर इंडिया टाटांना देत एअर इंडियाचे खाजगिकरण केले. आता त्यांच्याच पक्षाचे लोकं राज्यात एसटीच्या शासनात विलीनीकरणाचा अट्टाहास करत कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावत आहेत. मात्र, ते एअर इंडियाच्या खाजगिकरणावर ते का बोलत नाहीत? असा प्रश्न पवार यांनी भाजपला विचारला आहे.

राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या योग्य मागण्यांवर सकारात्मक (ST workers strike in maharashtra)

कर्जत इथे नव्या एसटी डेपोच्या कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आल्याचे सांगत पवार यांनी आपल्याला एसटी कर्मचाऱ्यांचे एक शिष्टमंडळाने भेट घेतल्याचे सांगितले. त्यांनाही पवार यांनी राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या योग्य मागण्यांवर सकारात्मक असून मार्ग काढला जाईल असे आश्वासन दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः यात लक्ष घातले आहे असही पवार यावेळी म्हणाले आहेत. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, राज्यमंत्री दत्ता भरणे, अब्दुल सत्तार आदी उपस्थित होते.

हेही वाचा - गडचिरोलीतील चकमकीत नक्सलवाद्यांचा मोठा नेता ठार?, कोण आहे मिलिंद तेलतुंबडे?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.