ETV Bharat / state

अहमदनगर जिल्ह्यातील धरणे भरली; गोदावरी, प्रवरा आणि भीमा नदीत विसर्ग सुरू

author img

By

Published : Aug 5, 2019, 12:33 PM IST

मागील काही दिवसांपासुन सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्हातील तीनही प्रमुख धरणे भरली आहेत. यामुळे गोदावरी, प्रवरा आणि भीमा या तीनही मोठ्या नद्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

निळवंडे धरण

अहमदनगर - उत्तर अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असलेले भंडारदरा धरण भरल्यानंतर निळवंडे धरण देखील 84 टक्के भरले आहे. यामुळे निळवंडे धरणातून 5,600 क्यूसेक प्रवाहाने प्रवरा नदीत विसर्ग करण्यात येत आहे. तर 26 टीएमसी क्षमता असलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा सद्य स्थितीत 70 टक्‍क्‍यांवर गेला आहे. यामुळे गोदावरी, प्रवरा आणि भीमा या तीनही मोठ्या नद्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.


मागील काही दिवसांपासून अकोले तालुक्यातील पाणलोट क्षेत्रांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख तीन धरणांपैकी भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले आहे. पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे पाण्याची आवक समाधानकारकरित्या होत असल्याने मुळा धरण येत्या काही दिवसात पूर्ण क्षमतेने भरेल अशी माहीती आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील धरणे भरली


जिल्ह्यामधील गोदावरी, प्रवरा आणि भीमा या तीनही मोठ्या नद्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. तर प्रशासनाने नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा आणि सावधानतेचा इशारा दिला आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीमध्ये सोमवारी सकाळी सहा वाजता 2 लाख 91 हजार 525 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तर पुणे जिल्ह्यात होणाऱ्या पावसामुळे भीमा नदीमधून 1 लाख 91 हजार 788 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे या ठिकाणी देखील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला. सोबतच भीमा नदीवरील पूल वाहतुकीसाठी रविवार रात्रीपासून बंद करण्यात आला आहे.


जिल्ह्यामध्ये सर्वदूर समाधानकारक पाऊस पडत असल्याने एकीकडे धरणे भरली असुन शेतीतील पिकांना जीवदान मिळाले. यामुळे शेतकरी वर्गामध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे.

अहमदनगर - उत्तर अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असलेले भंडारदरा धरण भरल्यानंतर निळवंडे धरण देखील 84 टक्के भरले आहे. यामुळे निळवंडे धरणातून 5,600 क्यूसेक प्रवाहाने प्रवरा नदीत विसर्ग करण्यात येत आहे. तर 26 टीएमसी क्षमता असलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा सद्य स्थितीत 70 टक्‍क्‍यांवर गेला आहे. यामुळे गोदावरी, प्रवरा आणि भीमा या तीनही मोठ्या नद्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.


मागील काही दिवसांपासून अकोले तालुक्यातील पाणलोट क्षेत्रांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख तीन धरणांपैकी भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले आहे. पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे पाण्याची आवक समाधानकारकरित्या होत असल्याने मुळा धरण येत्या काही दिवसात पूर्ण क्षमतेने भरेल अशी माहीती आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील धरणे भरली


जिल्ह्यामधील गोदावरी, प्रवरा आणि भीमा या तीनही मोठ्या नद्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. तर प्रशासनाने नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा आणि सावधानतेचा इशारा दिला आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीमध्ये सोमवारी सकाळी सहा वाजता 2 लाख 91 हजार 525 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तर पुणे जिल्ह्यात होणाऱ्या पावसामुळे भीमा नदीमधून 1 लाख 91 हजार 788 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे या ठिकाणी देखील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला. सोबतच भीमा नदीवरील पूल वाहतुकीसाठी रविवार रात्रीपासून बंद करण्यात आला आहे.


जिल्ह्यामध्ये सर्वदूर समाधानकारक पाऊस पडत असल्याने एकीकडे धरणे भरली असुन शेतीतील पिकांना जीवदान मिळाले. यामुळे शेतकरी वर्गामध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे.

Intro:अहमदनगर- मुळा धरण सत्तर टाक्यावर.. निळवंडे मधून विसर्ग सुरू, समाधानकारक पावसाने बळीराजाही सुखावला..
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_rain_dam_update_pkg_7204297

अहमदनगर- मुळा धरण सत्तर टाक्यावर.. निळवंडे मधून विसर्ग सुरू, समाधानकारक पावसाने बळीराजाही सुखावला..

अहमदनगर- जिल्ह्यातील उत्तर नगर जिल्ह्याला वरदान असलेल्या भंडारदरा धरण भरल्या नंतर निळवंडे धरणही 84 टक्के भरले असून धरणातून 5,600 क्यूसेसने प्रवरा नदीत विसर्ग सोडण्यात आला आहे. तर 26 टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणातील पाणी साठा सद्य स्थितीला 70 टक्‍क्‍यांवर गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पाणलोट क्षेत्रांमध्ये होत असलेल्या असलेल्या जोरदार वृष्टीमुळे जिल्ह्यातील प्रमुख तीन पैकी भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले आहे. पाणलोट क्षेत्रात होणारे पावसामुळे पाण्याची आवक समाधानकारकरित्या होत असल्यामुळे मुळाधरन येत्या काही दिवसात पूर्ण क्षमतेने भरेल अशी एकंदरीत परिस्थिती आहे. जिल्ह्यामधील गोदावरी,प्रवरा आणि भीमा या तीनही मोठ्या नद्यांमध्ये सध्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात असून प्रशासनाने या सर्व ठिकाणी लगतच्या गावांना सतर्कतेचा आणि सावधानतेचा इशारा दिलेला आहे. नांदूर मधमेश्वर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी मध्ये आज सकाळी सहा वाजेल 2 लाख 91 हजार 525 क्यूसेसने पाणी सध्या वाहत आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात होणाऱ्या पावसामुळे भीमा नदी मधूनही 1 लाख 91 हजार 788 क्यूसेसने पाणी वाहत असल्याने या ठिकाणीही प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. भीमा नदीवरील पूल वाहतुकीसाठी काल रात्रीपासूनच बंद करण्यात आलेला आहे. जिल्ह्यामध्ये सर्वदूर समाधानकारक पाऊस पडत असल्याने एकीकडे धरणे भरत असतानाच शेतीतील पेरण्यांना जीवदान मिळालेले असल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- मुळा धरण सत्तर टाक्यावर.. निळवंडे मधून विसर्ग सुरू, समाधानकारक पावसाने बळीराजाही सुखावला..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.