ETV Bharat / state

अहमदनगर : प्रेमी युगुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या

author img

By

Published : Nov 9, 2020, 5:59 PM IST

अकोले तालुक्यातील आंबड गावात घडली एका प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

couple-committed-suicide-by-strangulation-in-ahmednagar
अहमदनगर: प्रेमी युगलाने गळफास घेऊन केली आत्महत्या

अहमदनगर - प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अकोले तालुक्यातील आंबड गावात घडली आहे. ही घटना सुमारे आठवडाभरापूर्वीची असून रानात सीताफळ तोडायला गेलेल्या एका तरुणामुळे आज ती उघडकीस आली. यातील मृत तरुण हा आंबड गावचाच रहिवासी असून तरुणी ही तालुक्यातील कुमशेतमधील असल्याचे समजते. अकोले पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आंबड गावातील उल्हास कातोरे हा मुलगा काल (रविवारी) दुपारी आंबड शिवारातील सुतारदरा नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनक्षेत्रात सीताफळ तोडायला गेला होता. एका शिसवाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक तरुण व तरुणी त्याला दिसल्याने त्याने लागलीच पोलीस पाटील भाऊसाहेब कानवडे व सरपंच दत्तू कानवडे यांना कळविले. या दोघांनीही घटनास्थळी जाऊन मृतदेहांची पाहणी केली. नंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलेले दोन्ही मृतदेह काढण्यात आले. तेथेच पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतले. यावेळी तरुणाच्या अंगात चॅाकलेटी रंगाचे जर्कींग, काळ्या रंगाची जिन्सपॅन्ट तर तरुणीच्या अंगात निळ्या रंगाचे कमीज व गुलाबी रंगाची सलवार आहे. दोन्ही मृतदेह शेजारीच झाडाला लटकत होते. हे मृतदेह कुजलेले असल्याने त्यांची ओळख पटत नव्हती. रात्री उशिरा या घटनेतील तरुण हा अंबड गावातीलच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मृत तरुणाचे नाव अमोल भोरु कातोरे (25) असे आहे, तर तरुणी ही कुमशेत येथील असल्याची माहिती समजली. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

अहमदनगर - प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अकोले तालुक्यातील आंबड गावात घडली आहे. ही घटना सुमारे आठवडाभरापूर्वीची असून रानात सीताफळ तोडायला गेलेल्या एका तरुणामुळे आज ती उघडकीस आली. यातील मृत तरुण हा आंबड गावचाच रहिवासी असून तरुणी ही तालुक्यातील कुमशेतमधील असल्याचे समजते. अकोले पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आंबड गावातील उल्हास कातोरे हा मुलगा काल (रविवारी) दुपारी आंबड शिवारातील सुतारदरा नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनक्षेत्रात सीताफळ तोडायला गेला होता. एका शिसवाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक तरुण व तरुणी त्याला दिसल्याने त्याने लागलीच पोलीस पाटील भाऊसाहेब कानवडे व सरपंच दत्तू कानवडे यांना कळविले. या दोघांनीही घटनास्थळी जाऊन मृतदेहांची पाहणी केली. नंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलेले दोन्ही मृतदेह काढण्यात आले. तेथेच पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतले. यावेळी तरुणाच्या अंगात चॅाकलेटी रंगाचे जर्कींग, काळ्या रंगाची जिन्सपॅन्ट तर तरुणीच्या अंगात निळ्या रंगाचे कमीज व गुलाबी रंगाची सलवार आहे. दोन्ही मृतदेह शेजारीच झाडाला लटकत होते. हे मृतदेह कुजलेले असल्याने त्यांची ओळख पटत नव्हती. रात्री उशिरा या घटनेतील तरुण हा अंबड गावातीलच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मृत तरुणाचे नाव अमोल भोरु कातोरे (25) असे आहे, तर तरुणी ही कुमशेत येथील असल्याची माहिती समजली. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा- बीडच्या एलआयसी इमारतीला लागलेल्या आगीत सर्व कागदपत्रे जळून खाक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.