ETV Bharat / state

Ganesh Sahakari Sugar Factory Election: बाळासाहेब थोरात-कोल्हेंचा विखे पाटलांना जबर धक्का; श्री गणेश साखर कारखाना निवडणुकीने राजकीय समीकरणे बदलणार

अहमदनगर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून असलेल्या राहाता तालुक्यातील श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणुक पार पडली. यात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या गणेश परिवर्तन पॅनलने 19 पैकी 18 जागांवर विजय मिळवला. विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा पॅनलचा दारून पराभव केला आहे. जनसेवा पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

author img

By

Published : Jun 21, 2023, 9:22 AM IST

Ganesh Sahakari Sugar Factory Election
श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणुकश्री गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणुक
युवा नेत्यांचे थेट विखेंनाच आवाहन

अहमदनगर : राहाता तालुक्यातील गणेश परिसराची कामधेनू असलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक पार पडली. विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जनसेवा पॅनल तर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व भाजपाचे युवक नेते विवेक कोल्हे यांचे गटाचा गणेश परिवर्तन पॅनलमध्ये निवडणूक अत्यंत चुरशीशी व राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची झाली. कारखान्याची निवडणूक कधी नव्हे एवढी गाजली व चर्चेची ठरली. परिणामी राज्याचे राजकीय वर्तुळासह अनेकांचे या निवडणूक निकालाकडे लक्ष लागून होते. निवडणूकत विखेंचा दारुन पराभव करत कोल्हे थोरांतांचे 18 संचालक निवडुन आले. विखेचा होम ग्राउंड पराभव केल्याने एकवटलेल्या विखे विरोधकांनी जोरदार जल्लोष साजरा केला आहे.



युवा नेत्यांनी थेट विखेंनाच दिले आवाहन : निकाल लागल्यानंतर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे, पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी राहाता तहसील कार्यालय ते वीरभद्र मंदिर प्रांगणापर्यंत नगर मनमाड महामार्गावर विजयी रॅली काढली. बाजार तळ येथे विजयी सभा घेतली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सभासद नागरिक उपस्थित होते. या सभेत विखेंपेक्षा वयाने लहान आणि राजकारणाचा अनुभव कमी असलेल्या दोन युवा नेत्यांनी थेट विखेंनाच आवाहन दिले आहे.


विखेंना शह देणारे कोल्हे कोण आहे ? विवेक बिपिन कोल्हे हे माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे नातू आहेत. कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र आहेत. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आहेत. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आहेत. गणेश सहकारी साखर कारखान्यावर स्व.शंकरराव कोल्हे यांची 37 वर्ष सत्ता होती. मात्र नंतर कोपरगावचे विभाजन होऊन शिर्डी मतदारसंघात वेगळा झाल्यानंतर कोल्हेंनी कारखान्याकडे दुर्लक्ष केले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांच्या पराभवाला विखे पाटील जबाबदार असल्याची तक्रार कोल्हेंनी पक्षश्रेष्टींकडे केली होती. तेव्हापासून पक्षांतर्गत असलेला विखे आणि कोल्हेंचा विरोध गणेशनगर कारखान्याच्या निमित्ताने समोर आला. मागील विधानसभेत झालेल्या आई स्नेहलता कोल्हे यांच्या पराभवाचा वचपा विवेक कोल्हे यांनी गणेश सहकारी साखर कारखान्यात काढल्याचं बोललं जात आहे.




थेट विखेंनाच आव्हान : विजयी सभेच्या भाषणातुन विवेक कोल्हे यांनी कोपरगावात आम्हाला तुमची गरज नाही, अस ठनकावुन सांगीतले आहे. माझ्या आजोबांनी योगदान दिलेल्या गणेशची निवडणूक लागल्यानंतर मी भाजपाचा असुनही विखे दोन शब्द प्रेमाचे बोलले नाही. उलट येत्या विधानसभा निवडणुकीत तुमच्याकडे पाहुन घेतो, असा दम दिला. मात्र आम्हाला तुमची गरज नाही आम्हीच तुम्हाला निवडणूकीत बघुन घेवु, असे आव्हान कोपरगावचे युवा भाजपनेते विवेक कोल्हे यांनी दिले आहे.



लंकेही विखे विरोधात आक्रमक : दुसरीकडे दक्षिणेत सुजय विखे यांच्या विरोधात पारनेरचे राष्ट्रवादीचे युवा आमदार निलेश लंके हे लोकसभा निवडणूक लढवनार, अशी शक्यता असल्याने लंके विरोधात विखेनी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे आता लंकेही विखे विरोधात आक्रमक झालेत. गणेश कारखान्याचा आणि पारनेरच्या आमदारकीसोबत तसा काही संबंध नाही. मात्र विखेंच्या दहशतीच्या राजकारणा विरोधात मावळे लढत आहेत. त्यांना धुळ चारत आहेत म्हणून मी त्यांचे अभिनंदन करायला आलो, असे सांगत लंकेंनी तुम्ही परिवर्तनाच्या सुरवातीता श्रीगणेशा केला आहे. त्याचा शेवट आम्ही दक्षिणेत खासदारकीच्या निवडणुकीत करु, असा ईशारा लंकेनी विखेेना दिला आहे.




लंकेंची विखेंवर टीका : विखेंच्या दहशतीचे झाकन उडाले आता ते सापडणारच नाही. निलेश लंके बालीश असुन त्यांना पुन्हा आमदार व्हायचे नाही का ? महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी ईशारा दिला होता. पाटलांच्या या ईशाऱ्याचा लंके यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मी आमदार होणार की नाही हे पारनेरची जनता ठरवेल. मात्र तुमचा लाडका पुत्र खासदार होणार की नाही हे आम्हीच ठरवनार, अशी बोचरी टिका लंके यांनी यावेळी केली आहे.



विखेंचा त्यांच्याच मतदारसंघात पराभव : अहमदनगर जिल्ह्यात अनेक मात्तबर राजकारणी घराणे आहेत. वेगवेगळ्या पक्षात ते असतांना एकमेकांविरोधात राजकीय कुरघोड्या नेहमीच करत असतात. मात्र सहकारी संस्थानमध्ये एकमेकांच्या मतदार संघात हस्तक्षेप करु नये, असा अलिखीत नियम या नेत्यांमध्ये झालेला आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणूकात स्थानिक युती आघाडी करुनच निवडणुक लढवली जाते. मात्र राज्यात मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असलेल्या महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सत्ता असलेल्या शिर्डी मतदारसंघातील गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूकीत विखे पाटलांनी विश्वासात न घेतल्याने मान न दिल्याने कोपरगावच्या भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे यांना थेट विखेंचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात यांच्याशी हातमिळवणी केली. भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात गणेश कारखान्याचा निवडणूकीत पँनल उभे करत थोरात-कोल्हे युतीने विखे पाटलांना जोरदार धक्का दिला आहे. 19 पैकी 18 जागेवर दणदणीत विजय मिळवत थोरात-कोल्हे युतीच्या परिवर्तन पॅनलने विखे पाटलांच्या जनसेवा पॅनलचा धुव्वा उडवला. विखेंना त्यांच्याच मतदारसंघात भाजपच्याच युवा नेत्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला आहे, ह्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात होते आहे.

विखे पाटलांची डोकेदुखी वाढणार : शिर्डी मतदारसंघात असलेल्या गणेश सहकारी साखर कारखान्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांची गेल्या आठ वर्षापासून सत्ता होती. मात्र विखेंच्या गणेशच्या कारभाराविरोधातील नाराजी आणि राहाता तालुक्यातील विखे विरोधकांनी एकमुठ बांधली. त्यामुळे विखेच्या मतदारसंघातच विखेंच्या संत्तेला सुरंग लागला आहे. विखे पाटलांच्या मतदारसंघातील शिर्डी, राहाता, अस्तगाव आणि गणेशनगर परीसरील मतदारांनी विरोधात मतदान करत विखे पाटलांना मोठा धक्का दिला आहे. विखे पाटलांचा थोरातांच्या संगमनेर मतदारसंघात वाढलेला हस्तक्षेप आणि विधानसभा निवडणुकीत विखेंनी कोपरगावमध्ये साथ न दिल्याचे शल्य भाजपच्या कोल्हे यांच्या मनात होते. परिणामी या दोन्ही नेत्यांनी गणेशच्या निवडणुकीत एकत्र येत विखेंचा पराभव केला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत विखे पाटलांची डोकेदुखी वाढणार असल्याचे राजकीय विश्लेषक सतिश वैजापूरकर यांनी सांगितले आहे.



विजयी झालेले उमेदवार : श्री गणेश परिवर्तन पॅनलकडून ऊस उत्पादक संघातून शिर्डी गटामधून -डांगे बाबासाहेब दादा, दंडवते विजय भानुदास, राहता गटातून- मा. चेअरमन ॲड. नारायणराव ज्ञानेश्वर कारले, गंगाधर पांडुरंग डांगे व संपत कचरू हिंगे, अस्तगाव गटातून-गोरडे महेंद्र चांगदेव, चोळके बाळासाहेब पुंडलिक, नळे नानासाहेब काशिनाथ, वाकडी गटातून- फोपसे अरुंधती अरविंद, लहारे सुधीर वसंतराव, शेळके विष्णुपंत शंकर ,पुणतांबा गटातून -गाढवे अनिल सोपान, चौधरी संपत नाथाजी इतर मागासवर्गीय मतदार संघातून- टिळेकर अनिल राजाराम अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून- कापसे अलेश शांतवन, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून- सातव मधुकर यशवंतराव, महिला प्रतिनिधी मतदार संघातून- गोंदकर शोभाताई एकनाथ, धनवटे कमलबाई पुंडलिक हे 700 मतांच्या आसपासच्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे. तर सहकारी संस्थांमधून विखे गटाला एक जागा मिळाली आहे.


हेही वाचा :

  1. Minister Vikhe Patil : राज्यातील दंगली हे सरकारला बदनाम करण्याचे कारस्थान - राधाकृष्ण विखे पाटील
  2. Balasaheb Thorat Criticized BJP Ministers: देशात जातीय भांडणे लावून पुढच्या वेळेस सत्तेत येण्याचा प्रयत्न-बाळासाहेब थोरात
  3. Karnataka Election Result: कर्नाटक निकालाने देशभरात परिवर्तनाची सुरुवात - काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात

युवा नेत्यांचे थेट विखेंनाच आवाहन

अहमदनगर : राहाता तालुक्यातील गणेश परिसराची कामधेनू असलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक पार पडली. विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जनसेवा पॅनल तर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व भाजपाचे युवक नेते विवेक कोल्हे यांचे गटाचा गणेश परिवर्तन पॅनलमध्ये निवडणूक अत्यंत चुरशीशी व राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची झाली. कारखान्याची निवडणूक कधी नव्हे एवढी गाजली व चर्चेची ठरली. परिणामी राज्याचे राजकीय वर्तुळासह अनेकांचे या निवडणूक निकालाकडे लक्ष लागून होते. निवडणूकत विखेंचा दारुन पराभव करत कोल्हे थोरांतांचे 18 संचालक निवडुन आले. विखेचा होम ग्राउंड पराभव केल्याने एकवटलेल्या विखे विरोधकांनी जोरदार जल्लोष साजरा केला आहे.



युवा नेत्यांनी थेट विखेंनाच दिले आवाहन : निकाल लागल्यानंतर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे, पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी राहाता तहसील कार्यालय ते वीरभद्र मंदिर प्रांगणापर्यंत नगर मनमाड महामार्गावर विजयी रॅली काढली. बाजार तळ येथे विजयी सभा घेतली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सभासद नागरिक उपस्थित होते. या सभेत विखेंपेक्षा वयाने लहान आणि राजकारणाचा अनुभव कमी असलेल्या दोन युवा नेत्यांनी थेट विखेंनाच आवाहन दिले आहे.


विखेंना शह देणारे कोल्हे कोण आहे ? विवेक बिपिन कोल्हे हे माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे नातू आहेत. कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र आहेत. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आहेत. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आहेत. गणेश सहकारी साखर कारखान्यावर स्व.शंकरराव कोल्हे यांची 37 वर्ष सत्ता होती. मात्र नंतर कोपरगावचे विभाजन होऊन शिर्डी मतदारसंघात वेगळा झाल्यानंतर कोल्हेंनी कारखान्याकडे दुर्लक्ष केले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांच्या पराभवाला विखे पाटील जबाबदार असल्याची तक्रार कोल्हेंनी पक्षश्रेष्टींकडे केली होती. तेव्हापासून पक्षांतर्गत असलेला विखे आणि कोल्हेंचा विरोध गणेशनगर कारखान्याच्या निमित्ताने समोर आला. मागील विधानसभेत झालेल्या आई स्नेहलता कोल्हे यांच्या पराभवाचा वचपा विवेक कोल्हे यांनी गणेश सहकारी साखर कारखान्यात काढल्याचं बोललं जात आहे.




थेट विखेंनाच आव्हान : विजयी सभेच्या भाषणातुन विवेक कोल्हे यांनी कोपरगावात आम्हाला तुमची गरज नाही, अस ठनकावुन सांगीतले आहे. माझ्या आजोबांनी योगदान दिलेल्या गणेशची निवडणूक लागल्यानंतर मी भाजपाचा असुनही विखे दोन शब्द प्रेमाचे बोलले नाही. उलट येत्या विधानसभा निवडणुकीत तुमच्याकडे पाहुन घेतो, असा दम दिला. मात्र आम्हाला तुमची गरज नाही आम्हीच तुम्हाला निवडणूकीत बघुन घेवु, असे आव्हान कोपरगावचे युवा भाजपनेते विवेक कोल्हे यांनी दिले आहे.



लंकेही विखे विरोधात आक्रमक : दुसरीकडे दक्षिणेत सुजय विखे यांच्या विरोधात पारनेरचे राष्ट्रवादीचे युवा आमदार निलेश लंके हे लोकसभा निवडणूक लढवनार, अशी शक्यता असल्याने लंके विरोधात विखेनी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे आता लंकेही विखे विरोधात आक्रमक झालेत. गणेश कारखान्याचा आणि पारनेरच्या आमदारकीसोबत तसा काही संबंध नाही. मात्र विखेंच्या दहशतीच्या राजकारणा विरोधात मावळे लढत आहेत. त्यांना धुळ चारत आहेत म्हणून मी त्यांचे अभिनंदन करायला आलो, असे सांगत लंकेंनी तुम्ही परिवर्तनाच्या सुरवातीता श्रीगणेशा केला आहे. त्याचा शेवट आम्ही दक्षिणेत खासदारकीच्या निवडणुकीत करु, असा ईशारा लंकेनी विखेेना दिला आहे.




लंकेंची विखेंवर टीका : विखेंच्या दहशतीचे झाकन उडाले आता ते सापडणारच नाही. निलेश लंके बालीश असुन त्यांना पुन्हा आमदार व्हायचे नाही का ? महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी ईशारा दिला होता. पाटलांच्या या ईशाऱ्याचा लंके यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मी आमदार होणार की नाही हे पारनेरची जनता ठरवेल. मात्र तुमचा लाडका पुत्र खासदार होणार की नाही हे आम्हीच ठरवनार, अशी बोचरी टिका लंके यांनी यावेळी केली आहे.



विखेंचा त्यांच्याच मतदारसंघात पराभव : अहमदनगर जिल्ह्यात अनेक मात्तबर राजकारणी घराणे आहेत. वेगवेगळ्या पक्षात ते असतांना एकमेकांविरोधात राजकीय कुरघोड्या नेहमीच करत असतात. मात्र सहकारी संस्थानमध्ये एकमेकांच्या मतदार संघात हस्तक्षेप करु नये, असा अलिखीत नियम या नेत्यांमध्ये झालेला आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणूकात स्थानिक युती आघाडी करुनच निवडणुक लढवली जाते. मात्र राज्यात मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असलेल्या महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सत्ता असलेल्या शिर्डी मतदारसंघातील गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूकीत विखे पाटलांनी विश्वासात न घेतल्याने मान न दिल्याने कोपरगावच्या भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे यांना थेट विखेंचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात यांच्याशी हातमिळवणी केली. भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात गणेश कारखान्याचा निवडणूकीत पँनल उभे करत थोरात-कोल्हे युतीने विखे पाटलांना जोरदार धक्का दिला आहे. 19 पैकी 18 जागेवर दणदणीत विजय मिळवत थोरात-कोल्हे युतीच्या परिवर्तन पॅनलने विखे पाटलांच्या जनसेवा पॅनलचा धुव्वा उडवला. विखेंना त्यांच्याच मतदारसंघात भाजपच्याच युवा नेत्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला आहे, ह्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात होते आहे.

विखे पाटलांची डोकेदुखी वाढणार : शिर्डी मतदारसंघात असलेल्या गणेश सहकारी साखर कारखान्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांची गेल्या आठ वर्षापासून सत्ता होती. मात्र विखेंच्या गणेशच्या कारभाराविरोधातील नाराजी आणि राहाता तालुक्यातील विखे विरोधकांनी एकमुठ बांधली. त्यामुळे विखेच्या मतदारसंघातच विखेंच्या संत्तेला सुरंग लागला आहे. विखे पाटलांच्या मतदारसंघातील शिर्डी, राहाता, अस्तगाव आणि गणेशनगर परीसरील मतदारांनी विरोधात मतदान करत विखे पाटलांना मोठा धक्का दिला आहे. विखे पाटलांचा थोरातांच्या संगमनेर मतदारसंघात वाढलेला हस्तक्षेप आणि विधानसभा निवडणुकीत विखेंनी कोपरगावमध्ये साथ न दिल्याचे शल्य भाजपच्या कोल्हे यांच्या मनात होते. परिणामी या दोन्ही नेत्यांनी गणेशच्या निवडणुकीत एकत्र येत विखेंचा पराभव केला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत विखे पाटलांची डोकेदुखी वाढणार असल्याचे राजकीय विश्लेषक सतिश वैजापूरकर यांनी सांगितले आहे.



विजयी झालेले उमेदवार : श्री गणेश परिवर्तन पॅनलकडून ऊस उत्पादक संघातून शिर्डी गटामधून -डांगे बाबासाहेब दादा, दंडवते विजय भानुदास, राहता गटातून- मा. चेअरमन ॲड. नारायणराव ज्ञानेश्वर कारले, गंगाधर पांडुरंग डांगे व संपत कचरू हिंगे, अस्तगाव गटातून-गोरडे महेंद्र चांगदेव, चोळके बाळासाहेब पुंडलिक, नळे नानासाहेब काशिनाथ, वाकडी गटातून- फोपसे अरुंधती अरविंद, लहारे सुधीर वसंतराव, शेळके विष्णुपंत शंकर ,पुणतांबा गटातून -गाढवे अनिल सोपान, चौधरी संपत नाथाजी इतर मागासवर्गीय मतदार संघातून- टिळेकर अनिल राजाराम अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून- कापसे अलेश शांतवन, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून- सातव मधुकर यशवंतराव, महिला प्रतिनिधी मतदार संघातून- गोंदकर शोभाताई एकनाथ, धनवटे कमलबाई पुंडलिक हे 700 मतांच्या आसपासच्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे. तर सहकारी संस्थांमधून विखे गटाला एक जागा मिळाली आहे.


हेही वाचा :

  1. Minister Vikhe Patil : राज्यातील दंगली हे सरकारला बदनाम करण्याचे कारस्थान - राधाकृष्ण विखे पाटील
  2. Balasaheb Thorat Criticized BJP Ministers: देशात जातीय भांडणे लावून पुढच्या वेळेस सत्तेत येण्याचा प्रयत्न-बाळासाहेब थोरात
  3. Karnataka Election Result: कर्नाटक निकालाने देशभरात परिवर्तनाची सुरुवात - काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.