ETV Bharat / state

पाण्यासाठी केला १८ किमीचा पायी प्रवास, कोपरगावच्या काळेंची कावड यात्रा

५ नंबरच्या तलावाचे काम झाले तर, कोपरगावचा पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो. पण, प्रशासनाची इच्छाशक्ती कमी पडते आहे. वारंवार मागणी करुनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संजय काळे यांनी कावड सत्याग्रह केला.

author img

By

Published : Apr 30, 2019, 3:11 PM IST

संजय काळे

अहमदनगर - कोपरगाव शहरात पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. याबाबत त्वरीत तोडगा काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी पायी प्रवास करुन सत्याग्रह केला. खांद्यावर कावड घेऊन कोपरगाव ते शिर्डी असा १८ किमीचा प्रवास त्यांनी केला.

संजय काळेंनी १८ किमीचा प्रवास करुन आंदोलन केले


येसगाव येथील ४ नंबरच्या तलावाचा गाळ काढण्याचे काम अजून झाले नाही. तसेच, ५ नंबरच्या तलावाचे काम सुरू झाले नाही. ही दोन्ही कामे त्वरीत करावी, अशी मागणी संजय काळे यांनी केली. यासाठी त्यांनी कावड यात्रा काढली. सकाळी ८ वाजता कोपरगाव येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यास अभिवादन करुन त्यांनी याची सुरुवात केली. तब्बल १८ किमी चालून ते शिर्डीतील प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात पोहोचले.


कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील पाणी साठवण तलावाने तळ गाठला आहे. त्यामुळे पालिकेला शहराला बारा दिवसाआड पुरवठा करावा लागतो. पालिकेने सर्व तळे भरुन घेतले होते. मात्र, त्या तळ्यांमध्ये गाळ असल्याने त्यांच्या क्षमतेइतके पाणी त्यात बसले नाही. यातील गाळ काढावा यासाठी संजय काळे यांनी वारंवार अर्ज केले होते.


अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण, कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. नगरपालिकेच्या साठवण तलाव क्रमांक ५ चे काम रखडले आहे. यासाठी संजय काळे आणि नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी समृद्धी महामार्गाच्या गायत्री कन्स्ट्रक्शनकडे पाठपुरावा केला होता. तळ्यातील मातीचे नमुने त्यांच्याकडे पाठवण्यात आले होते. गायत्री कन्स्ट्रक्शनने काम करण्याचे आश्वासन दिले होते. पण, काही दिवसातच त्यांनी शब्द फिरवला.


५ नंबरच्या तलावाचे काम झाले तर, कोपरगावचा पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो. पण, प्रशासनाची इच्छाशक्ती कमी पडते आहे. वारंवार मागणी करुनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संजय काळे यांनी कावड सत्याग्रह केला.

अहमदनगर - कोपरगाव शहरात पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. याबाबत त्वरीत तोडगा काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी पायी प्रवास करुन सत्याग्रह केला. खांद्यावर कावड घेऊन कोपरगाव ते शिर्डी असा १८ किमीचा प्रवास त्यांनी केला.

संजय काळेंनी १८ किमीचा प्रवास करुन आंदोलन केले


येसगाव येथील ४ नंबरच्या तलावाचा गाळ काढण्याचे काम अजून झाले नाही. तसेच, ५ नंबरच्या तलावाचे काम सुरू झाले नाही. ही दोन्ही कामे त्वरीत करावी, अशी मागणी संजय काळे यांनी केली. यासाठी त्यांनी कावड यात्रा काढली. सकाळी ८ वाजता कोपरगाव येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यास अभिवादन करुन त्यांनी याची सुरुवात केली. तब्बल १८ किमी चालून ते शिर्डीतील प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात पोहोचले.


कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील पाणी साठवण तलावाने तळ गाठला आहे. त्यामुळे पालिकेला शहराला बारा दिवसाआड पुरवठा करावा लागतो. पालिकेने सर्व तळे भरुन घेतले होते. मात्र, त्या तळ्यांमध्ये गाळ असल्याने त्यांच्या क्षमतेइतके पाणी त्यात बसले नाही. यातील गाळ काढावा यासाठी संजय काळे यांनी वारंवार अर्ज केले होते.


अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण, कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. नगरपालिकेच्या साठवण तलाव क्रमांक ५ चे काम रखडले आहे. यासाठी संजय काळे आणि नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी समृद्धी महामार्गाच्या गायत्री कन्स्ट्रक्शनकडे पाठपुरावा केला होता. तळ्यातील मातीचे नमुने त्यांच्याकडे पाठवण्यात आले होते. गायत्री कन्स्ट्रक्शनने काम करण्याचे आश्वासन दिले होते. पण, काही दिवसातच त्यांनी शब्द फिरवला.


५ नंबरच्या तलावाचे काम झाले तर, कोपरगावचा पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो. पण, प्रशासनाची इच्छाशक्ती कमी पडते आहे. वारंवार मागणी करुनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संजय काळे यांनी कावड सत्याग्रह केला.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याची बिकट परस्थिती निर्माण झाल्याने हा पाणी प्रश्न लवकरात लवकर सुटावा याकरिता सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव ते शिर्डी कावड घेवुन पायी प्रवास करत केला कावड सत्याग्रह आंदोलन केलय....


VO_ कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे..कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा. या साठी येसगाव येथील चार नंबरच्या पाणी साठवण तलावातील गाळ काढला गेला नाही हा गाळ काढण्यात यावा तसेच पाच नंबरचा नवीन पाणी साठवण तलावाच काम लवकरात लवकर सुरु करून मार्गी लावावे यामागणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आज सकाळी ८ वाजता कोपरगावातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून कोपरगाव ते शिर्डी असा १८ किलोमीटरचा उन्हाची पर्वा न करता जिल्हाधिकारी यांचे शिर्डी येथील प्रतिनिधी प्रांताधिकारी यांच्या कार्यालया पर्यंत पाण्याची कावड घेवून पायी प्रवास करत सत्याग्रह केलाय....

BITE_ संजय काळे सामाजीक कार्यकर्ते

VO_ कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील पाणी साठवण तलावाने तळ गाठले नाईलाजाने पालिकेस शहराला बारा दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागत आहे.पाटबंधारे खात्याने मागील पाण्याचे रोटेशन दिले तेव्हा पालिकेचे सर्व तळे भरून घेतले मात्र या तळ्यात गाळ असल्या कारणाने तळे ज्या क्षमतेचे आहे तेवढ्या क्षमतेने भरली गेली नाही.या पाणी साठवन तळ्यातील गाळ काढण्यासाठी साजामिक कार्यकर्ते संजय काळे यांनी वेळोवेळी अर्ज केले मात्र या तळ्यातील गाळ मुक्त धरण योजनेतूनकुठल्याही प्रकारचा गाळ काढला गेला नाही.जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी यांना या चारही तळ्याची पहानी करण्यासाठी पाठविले होते मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही.कोपरगाव नगरपालिकेच्या नवीन पाणी साठवण तलाव क्रमांक ५ चे काम करायचे आहे.यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे आणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी समृद्धी महामार्गाचे गायत्री कंन्सट्रकशन चे ठेकेदार यांच्या कडे पाठपुरावा केला होता.या पाच नंबरच्या तळ्यातील मातीचे नमुने तपासणी साठी गायत्री कंन्सट्रकशन घेवून गेले होते आम्ही काम करण्यास तयार आहोत आम्ही लवकरात लवकर काम सुरु करू असे सांगितले.मात्र अचानक काही दिवसात गायत्री कंन्सट्रकशनने काम करण्यास नकार दिला.हे काम करता येत नाही हि माती खराब आहे असे सांगितले.जर पाच नंबरच्या तळ्याचे काम झाले तर कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.मात्र वारंवार प्रयत्न करूनही कुठलीही कारवाई होत नाही यासाठी आज कावड सत्याग्रह आंदोलन केल गेलय....Body:30 April Shirdi Satyagraha Andolan Conclusion:30 April Shirdi Satyagraha Andolan
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.