ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : मुंबई इंडियन्सच्या बुडत्या जहाजाच्या कर्णधाराला अजूनही पुनरागमनाची आशा - आयपीएलच्या बातम्या

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या 26 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला. आयपीएलच्या इतिहासात मुंबईचे पहिले 6 सामने पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी 2014 साली संघाने पहिले पाच सामने गमावले होते. या पराभवानंतर रोहित शर्मा खूपच निराश दिसत होता. रोहितने कबूल केले की, आतापर्यंत तो योग्य विजयी संयोजन शोधू शकलेला नाही.

Rohit Sharma
Rohit Sharma
author img

By

Published : Apr 17, 2022, 4:49 PM IST

मुंबई: पाच वेळचे चॅम्पियन मुंबई इंडियन्स ( Five-time champions Mumbai Indians ) संघाला शनिवारी सलग सहावा सामना गमावला लागला. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएल 2022 मध्ये पुनरागमन करण्याची आशा व्यक्त केली आहे. तो म्हणाला, लखनौ सुपरजायंट्सच्या ( Lucknow Super Giants ) 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, मुंबईला आवश्यक ती सुरुवात करण्यात अपयशी ठरल्याची संपूर्ण जबाबदारीही शर्माने घेतली.

सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा ( Rohit Sharma ) म्हणाला की, संघाला चांगली सुरुवात न करण्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. ते माझ्याकडून काय अपेक्षा करतात. मी तिथे जाऊन खेळाचा आनंद घेण्यासाठी परत येईन आणि मी वर्षानुवर्षे हेच करत आहे. हे जगाचा अंत नाही, आम्ही याआधीही पुनरागमन केले आहे आणि आता पुन्हा पुनरागमन करण्याचा प्रयत्न करू. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई संघाला भागीदारी करता आली नाही, याबद्दल शर्माने नाराजी व्यक्त केली. लखनौच्या एका इनिंगमध्ये राहुलने जे केले होते, त्या तुलनेत आयपीएल 2022 च्या सहा डावांमध्ये शर्माने 19 च्या सरासरीने केवळ 114 धावा केल्या आहेत.

तो पुढे म्हणाला, मला वाटते केएल राहुलने शानदार फलंदाजी केली, जे आमच्या खेळाडूंनी केले नाही. आम्हला आतापर्यंत विजय मिळवता आला नाही, पण आम्हाला आमची मान उंच ठेवली पाहिजे. प्रत्येक सामन्यासाठी मी ज्या पद्धतीने तयारी करतो त्याप्रमाणे मी स्वत:ला तयार करण्याचा प्रयत्न करतो, हे वेगळे नाही.

तत्पूर्वी, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईचे गोलंदाज राहुलला बाद करू शकले नाहीत. तसेच त्याच्या धावांचा ओघ रोखू शकलो नाहीत. जसप्रीत बुमराह ( Jaspreet Bumrah ) विरुद्ध लखनौ संघ सावध पवित्रा घेत होता, त्याने त्याच्या चार षटकात फक्त 24 धावा दिल्या, तर जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, फॅबियन ऍलन आणि टायमल मिल्स सारख्या इतर गोलंदाजांविरुद्ध मोठ्या प्रमाणात धावा कुटल्या. मुंबई इंडियन्स संघ अद्याप विजयाची नोंद करु शकलेला नाही, ते अक्षरशः स्पर्धेबाहेर आहेत आणि त्यांच्या उर्वरित सामन्यांसाठी ते विजयाच्या बाजूने असले पाहिजेत, जे त्यांच्यासाठी सोपे वाटत नाही. शर्मा म्हणाला की, मुंबई अजूनही स्पर्धेत सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

आयपीएल 2022 मध्ये रोहित शर्मा च्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी:

  • 41 धावांनी पराभव विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 27 मार्च
  • 10 धावांनी पराभव विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 2 एप्रिल
  • 3 धावांनी पराभव विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स, 6 एप्रिल
  • 26 धावांनी पराभव विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 9 एप्रिल
  • 28 धावांनी पराभव विरुद्ध पंजाब किंग्ज, 13 एप्रिल
  • 6 धावांनी पराभव विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 16 एप्रिल

हेही वाचा - IPL 2022 GT vs CSK : रवींद्र जडेजाच्या सीएसके समोर आज हार्दिक पांड्याच्या गुजरातचे आव्हान

मुंबई: पाच वेळचे चॅम्पियन मुंबई इंडियन्स ( Five-time champions Mumbai Indians ) संघाला शनिवारी सलग सहावा सामना गमावला लागला. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएल 2022 मध्ये पुनरागमन करण्याची आशा व्यक्त केली आहे. तो म्हणाला, लखनौ सुपरजायंट्सच्या ( Lucknow Super Giants ) 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, मुंबईला आवश्यक ती सुरुवात करण्यात अपयशी ठरल्याची संपूर्ण जबाबदारीही शर्माने घेतली.

सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा ( Rohit Sharma ) म्हणाला की, संघाला चांगली सुरुवात न करण्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. ते माझ्याकडून काय अपेक्षा करतात. मी तिथे जाऊन खेळाचा आनंद घेण्यासाठी परत येईन आणि मी वर्षानुवर्षे हेच करत आहे. हे जगाचा अंत नाही, आम्ही याआधीही पुनरागमन केले आहे आणि आता पुन्हा पुनरागमन करण्याचा प्रयत्न करू. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई संघाला भागीदारी करता आली नाही, याबद्दल शर्माने नाराजी व्यक्त केली. लखनौच्या एका इनिंगमध्ये राहुलने जे केले होते, त्या तुलनेत आयपीएल 2022 च्या सहा डावांमध्ये शर्माने 19 च्या सरासरीने केवळ 114 धावा केल्या आहेत.

तो पुढे म्हणाला, मला वाटते केएल राहुलने शानदार फलंदाजी केली, जे आमच्या खेळाडूंनी केले नाही. आम्हला आतापर्यंत विजय मिळवता आला नाही, पण आम्हाला आमची मान उंच ठेवली पाहिजे. प्रत्येक सामन्यासाठी मी ज्या पद्धतीने तयारी करतो त्याप्रमाणे मी स्वत:ला तयार करण्याचा प्रयत्न करतो, हे वेगळे नाही.

तत्पूर्वी, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईचे गोलंदाज राहुलला बाद करू शकले नाहीत. तसेच त्याच्या धावांचा ओघ रोखू शकलो नाहीत. जसप्रीत बुमराह ( Jaspreet Bumrah ) विरुद्ध लखनौ संघ सावध पवित्रा घेत होता, त्याने त्याच्या चार षटकात फक्त 24 धावा दिल्या, तर जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, फॅबियन ऍलन आणि टायमल मिल्स सारख्या इतर गोलंदाजांविरुद्ध मोठ्या प्रमाणात धावा कुटल्या. मुंबई इंडियन्स संघ अद्याप विजयाची नोंद करु शकलेला नाही, ते अक्षरशः स्पर्धेबाहेर आहेत आणि त्यांच्या उर्वरित सामन्यांसाठी ते विजयाच्या बाजूने असले पाहिजेत, जे त्यांच्यासाठी सोपे वाटत नाही. शर्मा म्हणाला की, मुंबई अजूनही स्पर्धेत सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

आयपीएल 2022 मध्ये रोहित शर्मा च्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी:

  • 41 धावांनी पराभव विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 27 मार्च
  • 10 धावांनी पराभव विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 2 एप्रिल
  • 3 धावांनी पराभव विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स, 6 एप्रिल
  • 26 धावांनी पराभव विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 9 एप्रिल
  • 28 धावांनी पराभव विरुद्ध पंजाब किंग्ज, 13 एप्रिल
  • 6 धावांनी पराभव विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 16 एप्रिल

हेही वाचा - IPL 2022 GT vs CSK : रवींद्र जडेजाच्या सीएसके समोर आज हार्दिक पांड्याच्या गुजरातचे आव्हान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.