ETV Bharat / sports

गंभीर म्हणतो, ''दुसऱ्या कसोटीत बुमराहला घेऊ नका''

author img

By

Published : Feb 8, 2021, 8:47 AM IST

गंभीरने आपल्या विधानाचे स्पष्टीकरणही दिले आहे. तो म्हणाला,''बुमराहला दुसर्‍या कसोटीसाठी संघात स्थान देऊ नये. त्याला गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी राखून ठेवावे. या मालिकेसाठी बुमराह महत्त्वाचा आहे.''

गंभीर आणि बुमराह
गंभीर आणि बुमराह

चेन्नई - चेपॉकवर सुरू असलेली इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी टीम इंडियासाठी अत्यंत निराशाजनक ठरत आहे. पाहुण्या संघाने यजमानांवर वर्चस्व मिळवत तब्बल १९० षटके फलंदाजी केली आणि ५७८ धावांचा डोंगर उभारला. आपल्या तिखट माऱ्यासाठी प्रसिद्ध असलेला भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ३६ षटके गोलंदाजी केली. यात त्याला ८४ धावांच्या बदल्यात ३ बळी घेता आले. आगामी दुसऱ्या कसोटीत बुमराहला संघात घेऊ नये, असे मत भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने व्यक्त केले आहे.

हेही वाचा - रिषभ पंत : एकीकडे निराशा, दुसरीकडे विक्रम

गंभीरने आपल्या विधानाचे स्पष्टीकरणही दिले आहे. तो म्हणाला,''बुमराहला दुसर्‍या कसोटीसाठी संघात स्थान देऊ नये. त्याला गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी राखून ठेवावे. या मालिकेसाठी बुमराह महत्त्वाचा आहे. जसप्रीत बुमराह जास्त वेळ गोलंदाजी करू शकत नाही. बुमराहने मोठे स्पेल न टाकता लवकरात लवकर विकेट घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या मालिकेसाठी तो एक्स-फॅक्टर आहे. त्याला काही झाले तर भारतीय संघ अडचणीत येईल.''

२४ फेब्रुवारीपासून इंग्लंड आणि भारत यांच्यात अहमदाबादच्या मोटेरा ग्राऊंडवर चौथा कसोटी सामना सुरू होईल.

टीम इंडियाची निराशा -

चेन्नई कसोटीत इंग्लंड संघाचा पहिला डाव ५७८ धावांवर आटोपला. इंग्लंड संघाकडून कर्णधार जो रूट याने सर्वाधिक २१८ धावा केल्या. तर बेन स्टोक्स याने ८२ आणि सिब्ले याने ८७ धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून इशांत शर्मा, नदीम यांना प्रत्येकी २ तर जसप्रीत बुमराह आणि आर. अश्विन यांना प्रत्येकी ३ विकेट्स मिळाल्या.

प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा पूर्णपणे अपयशी ठरला. त्याने अवघ्या ६ धावा केल्या. तर शुबमन गिल याने २९ धावांची खेळी केली. चेतश्वर पुजारा (७३) आणि रिषभ पंत (९१) यांनी भागीदारी करत डाव सांभाळला. तर कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हे स्वस्तात माघारी परतले. वॉशिंग्टन सुंदर आणि आर. अश्विन यांची जोडी अजूनही मैदानावर आहे. भारतीय संघाच्या दिवसअखेर एकूण ६ बाद २५७ धावा झाल्या आहेत.

चेन्नई - चेपॉकवर सुरू असलेली इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी टीम इंडियासाठी अत्यंत निराशाजनक ठरत आहे. पाहुण्या संघाने यजमानांवर वर्चस्व मिळवत तब्बल १९० षटके फलंदाजी केली आणि ५७८ धावांचा डोंगर उभारला. आपल्या तिखट माऱ्यासाठी प्रसिद्ध असलेला भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ३६ षटके गोलंदाजी केली. यात त्याला ८४ धावांच्या बदल्यात ३ बळी घेता आले. आगामी दुसऱ्या कसोटीत बुमराहला संघात घेऊ नये, असे मत भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने व्यक्त केले आहे.

हेही वाचा - रिषभ पंत : एकीकडे निराशा, दुसरीकडे विक्रम

गंभीरने आपल्या विधानाचे स्पष्टीकरणही दिले आहे. तो म्हणाला,''बुमराहला दुसर्‍या कसोटीसाठी संघात स्थान देऊ नये. त्याला गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी राखून ठेवावे. या मालिकेसाठी बुमराह महत्त्वाचा आहे. जसप्रीत बुमराह जास्त वेळ गोलंदाजी करू शकत नाही. बुमराहने मोठे स्पेल न टाकता लवकरात लवकर विकेट घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या मालिकेसाठी तो एक्स-फॅक्टर आहे. त्याला काही झाले तर भारतीय संघ अडचणीत येईल.''

२४ फेब्रुवारीपासून इंग्लंड आणि भारत यांच्यात अहमदाबादच्या मोटेरा ग्राऊंडवर चौथा कसोटी सामना सुरू होईल.

टीम इंडियाची निराशा -

चेन्नई कसोटीत इंग्लंड संघाचा पहिला डाव ५७८ धावांवर आटोपला. इंग्लंड संघाकडून कर्णधार जो रूट याने सर्वाधिक २१८ धावा केल्या. तर बेन स्टोक्स याने ८२ आणि सिब्ले याने ८७ धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून इशांत शर्मा, नदीम यांना प्रत्येकी २ तर जसप्रीत बुमराह आणि आर. अश्विन यांना प्रत्येकी ३ विकेट्स मिळाल्या.

प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा पूर्णपणे अपयशी ठरला. त्याने अवघ्या ६ धावा केल्या. तर शुबमन गिल याने २९ धावांची खेळी केली. चेतश्वर पुजारा (७३) आणि रिषभ पंत (९१) यांनी भागीदारी करत डाव सांभाळला. तर कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हे स्वस्तात माघारी परतले. वॉशिंग्टन सुंदर आणि आर. अश्विन यांची जोडी अजूनही मैदानावर आहे. भारतीय संघाच्या दिवसअखेर एकूण ६ बाद २५७ धावा झाल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.