ETV Bharat / sports

Vijay Hazare Trophy : मुंबईची अंतिम फेरीत धडक, पृथ्वी शॉची तुफानी खेळी

विजय हजारे करंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात मुंबईने कर्नाटकचा ७२ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली.

author img

By

Published : Mar 11, 2021, 5:17 PM IST

Updated : Mar 11, 2021, 5:33 PM IST

vijay hazare trophy 2021 semifinal mumbai vs karnataka : Mumbai won by 72 runs
Vijay Hazare Trophy : मुंबईची अंतिम फेरीत धडक, पृथ्वी शॉची तुफानी खेळी

दिल्ली - विजय हजारे करंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात मुंबईने कर्नाटकचा ७२ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता अंतिम फेरीत मुंबईची गाठ उत्तर प्रदेश सोबत आहे. उभय संघातील अंतिम सामना १४ मार्चला होईल.

उपांत्य सामन्यात कर्नाटकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मुंबईचा कर्णधार आणि सलामीवीर पृथ्वी शॉ याने तडाखेबंद शतक झळकावले. मुंबईच्या डावाची सुरूवात खराब झाली. तेव्हा शॉ याने आदित्य तरेसोबत दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी नंतर शम्स मुलानीसोबत तिसऱ्या गड्यासाठी १५९ धावांची भागिदारी करत संघाचा डाव सावरला.

मुलानी ४५ धावांवर बाद झाल्यानंतर शिवम दुबे (२७), अमन हकीम खान (२५) ठराविक अंतराने बाद झाले. दुसरी बाजू लावून धरत पृथ्वी शॉने शतक झळकावले. त्याने १२२ चेंडूत १७ चौकार आणि ७ षटकारांसह १६५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने ४९.२ षटकात सर्वबाद ३२२ धावांचा डोंगर उभारला. कर्नाटककडून विजय कुमारने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर प्रसिद्ध कृष्णाने ३ गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली.

मुंबईने दिलेले डोंगराएवढे आव्हान कर्नाटक संघाला पेलावले नाही. त्याचा संपूर्ण संघ ४२.४ षटकात २५० धावा करू शकला. सलामीवीर देवदत्त पडीक्कलने ६४ धावांची खेळी साकारली. तर शरथ बीआरने ६१ धावा केल्या. हे दोघे वगळता अन्य फलंदाजांना मुंबईच्या गोलंदाजीचा सामना करता आला नाही. मुंबईकडून तुषार देशपांडे, प्रशांत सोलंकी आणि तनुष यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर धवन कुलकर्णी आणि यशस्वी जैस्वाल यांनी प्रत्येकी १-१ गडी टिपला.

हेही वाचा - 'भीमकाय' क्रिकेटरला पाहून सचिन म्हणाला, मला अशी शरीरयष्टी तयार करण्यास किती ऑम्लेट खावे लागतील?

हेही वाचा - Vijay Hazare Trophy: पृथ्वी शॉची झंझावात, तोडला मयांकचा विक्रम

दिल्ली - विजय हजारे करंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात मुंबईने कर्नाटकचा ७२ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता अंतिम फेरीत मुंबईची गाठ उत्तर प्रदेश सोबत आहे. उभय संघातील अंतिम सामना १४ मार्चला होईल.

उपांत्य सामन्यात कर्नाटकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मुंबईचा कर्णधार आणि सलामीवीर पृथ्वी शॉ याने तडाखेबंद शतक झळकावले. मुंबईच्या डावाची सुरूवात खराब झाली. तेव्हा शॉ याने आदित्य तरेसोबत दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी नंतर शम्स मुलानीसोबत तिसऱ्या गड्यासाठी १५९ धावांची भागिदारी करत संघाचा डाव सावरला.

मुलानी ४५ धावांवर बाद झाल्यानंतर शिवम दुबे (२७), अमन हकीम खान (२५) ठराविक अंतराने बाद झाले. दुसरी बाजू लावून धरत पृथ्वी शॉने शतक झळकावले. त्याने १२२ चेंडूत १७ चौकार आणि ७ षटकारांसह १६५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने ४९.२ षटकात सर्वबाद ३२२ धावांचा डोंगर उभारला. कर्नाटककडून विजय कुमारने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर प्रसिद्ध कृष्णाने ३ गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली.

मुंबईने दिलेले डोंगराएवढे आव्हान कर्नाटक संघाला पेलावले नाही. त्याचा संपूर्ण संघ ४२.४ षटकात २५० धावा करू शकला. सलामीवीर देवदत्त पडीक्कलने ६४ धावांची खेळी साकारली. तर शरथ बीआरने ६१ धावा केल्या. हे दोघे वगळता अन्य फलंदाजांना मुंबईच्या गोलंदाजीचा सामना करता आला नाही. मुंबईकडून तुषार देशपांडे, प्रशांत सोलंकी आणि तनुष यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर धवन कुलकर्णी आणि यशस्वी जैस्वाल यांनी प्रत्येकी १-१ गडी टिपला.

हेही वाचा - 'भीमकाय' क्रिकेटरला पाहून सचिन म्हणाला, मला अशी शरीरयष्टी तयार करण्यास किती ऑम्लेट खावे लागतील?

हेही वाचा - Vijay Hazare Trophy: पृथ्वी शॉची झंझावात, तोडला मयांकचा विक्रम

Last Updated : Mar 11, 2021, 5:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.