ETV Bharat / sports

रणजी ट्रॉफी : उपेंद्र यादवच्या द्विशतकामुळे मुंबई संकटात - upendra yadav ranji news

ग्रुप बी सामन्यात उपेंद्र यादवच्या नाबाद २०३ धावांच्या जोरावर उत्तर प्रदेशने मुंबईविरुद्ध आठ गडी राखून पहिला डाव ६२५ धावांवर घोषित केला. उपेंद्रसोबत अक्षदीप नाथनेही ११५ धावा करत त्याला साथ दिली.

uttar pradesh score 600 plus runs in first innings against mumbai in ranji
रणजी ट्रॉफी : उपेंद्र यादवच्या द्विशतकामुळे मुंबई संकटात
author img

By

Published : Jan 20, 2020, 7:12 PM IST

मुंबई - येथील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी करंडकातील मुंबईविरुद्धच्या सामन्यात उत्तर प्रदेशने दमदार फलंदाजी केली. ग्रुप बी सामन्यात उपेंद्र यादवच्या नाबाद २०३ धावांच्या जोरावर उत्तर प्रदेशने मुंबईविरुद्ध आठ गडी राखून पहिला डाव ६२५ धावांवर घोषित केला. उपेंद्रसोबत अक्षदीप नाथनेही ११५ धावा करत त्याला साथ दिली. मात्र, दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच तो बाद झाला. मुंबईकडून रॉयस्टन डायसने सर्वाधिक ३ बळी घेतले.

हेही वाचा - ऑस्ट्रेलियाच्या मदतीसाठी धावले भारतीय हॉकीपटू

या दोघांव्यतिरिक्त रिंकू सिंगने ८४ धावांचे योगदान दिले. अक्षदीपने आपल्या खेळीत १६ चौकार आणि दोन षटकार ठोकले. तर, नाबाद राहिलेल्या उपेंद्रने २७ चौकारांव्यतिरिक्त तीन षटकारही लगावले. त्यानंतर पहिला डाव खेळण्यास उतरलेल्या मुंबईची सुरूवात चांगली झाली नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईने २० धावांवर जय बिश्ता आणि शशांक अतार्डे हे दोन फलंदाज गमावले होते. उत्तर प्रदेशकडून अंकित राजपूतने २ बळी घेतले.

मुंबई - येथील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी करंडकातील मुंबईविरुद्धच्या सामन्यात उत्तर प्रदेशने दमदार फलंदाजी केली. ग्रुप बी सामन्यात उपेंद्र यादवच्या नाबाद २०३ धावांच्या जोरावर उत्तर प्रदेशने मुंबईविरुद्ध आठ गडी राखून पहिला डाव ६२५ धावांवर घोषित केला. उपेंद्रसोबत अक्षदीप नाथनेही ११५ धावा करत त्याला साथ दिली. मात्र, दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच तो बाद झाला. मुंबईकडून रॉयस्टन डायसने सर्वाधिक ३ बळी घेतले.

हेही वाचा - ऑस्ट्रेलियाच्या मदतीसाठी धावले भारतीय हॉकीपटू

या दोघांव्यतिरिक्त रिंकू सिंगने ८४ धावांचे योगदान दिले. अक्षदीपने आपल्या खेळीत १६ चौकार आणि दोन षटकार ठोकले. तर, नाबाद राहिलेल्या उपेंद्रने २७ चौकारांव्यतिरिक्त तीन षटकारही लगावले. त्यानंतर पहिला डाव खेळण्यास उतरलेल्या मुंबईची सुरूवात चांगली झाली नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईने २० धावांवर जय बिश्ता आणि शशांक अतार्डे हे दोन फलंदाज गमावले होते. उत्तर प्रदेशकडून अंकित राजपूतने २ बळी घेतले.

Intro:Body:

uttar pradesh score 600 plus runs in first innings against mumbai in ranji

up vs mum ranji news, up vs mum 1st inning news, upendra yadav double century news, upendra yadav 200 news, upendra yadav ranji news,  उपेंद्र यादव द्विशतक न्यूज

रणजी ट्रॉफी : उपेंद्र यादवच्या द्विशतकामुळे मुंबई संकटात

मुंबई - येथील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी करंडकातील मुंबईविरुद्धच्या सामन्यात उत्तर प्रदेशने दमदार फलंदाजी केली. ग्रुप बी सामन्यात उपेंद्र यादवच्या नाबाद २०३ धावांच्या जोरावर उत्तर प्रदेशने मुंबईविरुद्ध आठ गडी राखून पहिला डाव ६२५ धावांवर घोषित केला. उपेंद्रसोबत अक्षदीप नाथनेही ११५ धावा करत त्याला साथ दिली. मात्र, दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच तो बाद झाला. मुंबईकडून रॉयस्टन डायसने सर्वाधिक ३ बळी घेतले.

हेही वाचा - 

या दोघांव्यतिरिक्त रिंकू सिंगने ८४ धावांचे योगदान दिले. अक्षदीपने आपल्या खेळीत १६ चौकार आणि दोन षटकार ठोकले. तर, नाबाद राहिलेल्या उपेंद्रने २७ चौकारांव्यतिरिक्त तीन षटकारही लगावले. त्यानंतर पहिला डाव खेळण्यास उतरलेल्या मुंबईची सुरूवात चांगली झाली नाही. दुसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईने २० धावांवर जय बिश्ता आणि शशांक अतार्डे हे दोन फलंदाज गमावले होते. उत्तर प्रदेशकडून अंकित राजपूतने २ बळी घेतले.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.