ETV Bharat / sports

सचिन म्हणतो, कोहलीला बुमराहची उणीव भासेल पण...

author img

By

Published : Oct 1, 2019, 10:14 PM IST

याविषयी सचिन म्हणतो की, 'दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत, कर्णधार विराट कोहलीला बुमराहची उणिव निश्‍चित भासेल यात शंका नाही. पण, तो दुखापतीमुळे संघा बाहेर आहे. त्याची उणिव भासू देणार नाहीत, असे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. वेगवान गोलंदाजांसोबत फिरकी गोलंदाजही त्यांची भूमिका चांगल्या पध्दतीने बजावत आहेत.'

सचिन म्हणतो, कोहलीला बुमराहची उणीव भासेल पण...

नवी दिल्ली - भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका संघामध्ये उद्यापासून (बुधवार) कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेतून भारतीय प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने दुखापतीमुळे माघार घेतली. बुमराहच्या गैरहजेरीत इतर गोलंदाजांची जबाबदारी वाढली असून याप्रकरणी भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

याविषयी सचिन म्हणतो की, 'दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत, कर्णधार विराट कोहलीला बुमराहची उणिव निश्‍चित भासेल यात शंका नाही. पण, तो दुखापतीमुळे संघा बाहेर आहे. त्याची उणिव भासू देणार नाहीत, असे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. वेगवान गोलंदाजांसोबत फिरकी गोलंदाजही त्यांची भूमिका चांगल्या पध्दतीने बजावत आहेत.'

हेही वाचा - टीम इंडियाला धक्का, हार्दिक पांड्या 'या'मुळं अनिश्चित कालावधीपर्यंत क्रिकेटपासून लांब राहणार

सध्याच्या दक्षिण आफ्रिका संघात भारतामध्ये कसोटी क्रिकेट खेळलेले खेळाडू जास्त नाहीत. यामुळे त्यांना येथील परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागणार आहे. त्यांना नियोजनबध्द खेळ करावा लागणार आहे. तसेच त्यांच्यापुढे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून खेळण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, त्यांचे गोलंदाज नक्कीच चांगले आहेत. त्यामुळे भारतीय फलंदाजांनी फलंदाजी करताना भागीदारी वाढविण्यावर भर द्यावा, असा सल्ला सचिनने भारतीय खेळाडूंना दिला आहे.

हेही वाचा - निवृत्तीच्या निर्णयावर 'यू टर्न' घेतलेल्या अंबातीची नाबाद खेळी; संघाला मिळवून दिला विजय

नवी दिल्ली - भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका संघामध्ये उद्यापासून (बुधवार) कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेतून भारतीय प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने दुखापतीमुळे माघार घेतली. बुमराहच्या गैरहजेरीत इतर गोलंदाजांची जबाबदारी वाढली असून याप्रकरणी भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

याविषयी सचिन म्हणतो की, 'दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत, कर्णधार विराट कोहलीला बुमराहची उणिव निश्‍चित भासेल यात शंका नाही. पण, तो दुखापतीमुळे संघा बाहेर आहे. त्याची उणिव भासू देणार नाहीत, असे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. वेगवान गोलंदाजांसोबत फिरकी गोलंदाजही त्यांची भूमिका चांगल्या पध्दतीने बजावत आहेत.'

हेही वाचा - टीम इंडियाला धक्का, हार्दिक पांड्या 'या'मुळं अनिश्चित कालावधीपर्यंत क्रिकेटपासून लांब राहणार

सध्याच्या दक्षिण आफ्रिका संघात भारतामध्ये कसोटी क्रिकेट खेळलेले खेळाडू जास्त नाहीत. यामुळे त्यांना येथील परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागणार आहे. त्यांना नियोजनबध्द खेळ करावा लागणार आहे. तसेच त्यांच्यापुढे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून खेळण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, त्यांचे गोलंदाज नक्कीच चांगले आहेत. त्यामुळे भारतीय फलंदाजांनी फलंदाजी करताना भागीदारी वाढविण्यावर भर द्यावा, असा सल्ला सचिनने भारतीय खेळाडूंना दिला आहे.

हेही वाचा - निवृत्तीच्या निर्णयावर 'यू टर्न' घेतलेल्या अंबातीची नाबाद खेळी; संघाला मिळवून दिला विजय

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.