मुंबई - अमॅझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या 'पाताल लोक' या वेब-मालिकेवर प्रेक्षक खूश झाले आहेत. यातील कथेने प्रेक्षकांना चकित केले आहे. त्यामुळे मालिकेची भरपूर प्रशंसा होतोना दिसत आहे. एकंदरीत मिळत असलेल्या प्रतिक्रियावरून ही मालिका हिट मानली जात आहे.
सामान्य प्रेक्षकांपासून अनेक सेलेब्रिटीही पाताल लोकवर खूश आहेत. अभिनेता मनोज वाजपेयीने सोशल मीडियावरून भरपूर कौतुक केले आहे. त्याने लिहिले आहे, ''एक चांगल्या प्रकारे लिहिली गेलेली, योग्य चित्रीत केलेली, दिग्दर्शित आणि एडिट केलेली जबरदस्त परफॉर्म केलेली मालिका आहे ही 'पाताल लोक'. सर्व कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांना माझ्या शुभेच्छा. यातून बरेच काही शिकलो.!! वाह!!''
-
A finely scripted ,crafted,photograph ed,directed,edited and performed so immaculately series PATAL LOK!!! My congratulations to all the actors makers and directors #prosit and #avinasharun.jaideep Abhishek Neeraj Gul Vipin Loveleen.bahut seekha!!waah!!
— manoj bajpayee (@BajpayeeManoj) May 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A finely scripted ,crafted,photograph ed,directed,edited and performed so immaculately series PATAL LOK!!! My congratulations to all the actors makers and directors #prosit and #avinasharun.jaideep Abhishek Neeraj Gul Vipin Loveleen.bahut seekha!!waah!!
— manoj bajpayee (@BajpayeeManoj) May 17, 2020A finely scripted ,crafted,photograph ed,directed,edited and performed so immaculately series PATAL LOK!!! My congratulations to all the actors makers and directors #prosit and #avinasharun.jaideep Abhishek Neeraj Gul Vipin Loveleen.bahut seekha!!waah!!
— manoj bajpayee (@BajpayeeManoj) May 17, 2020
मनोज वाजपेयी आणि या मालिकेतील मुख्य कलाकार जयदीप अहलावत यांनी 'गँग्स ऑफ वासेपुर' या चित्रपटात एकत्र काम केले आहे.
'राजी' चित्रपटात जयदीप याने विकी कौशलसोबतही भूमिका साकारली होती. जयदीपने 'पाताल लोक' या वेब सिरीजमध्ये हाथीराम चौधरी ही मुख्य पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. जयदीपवर विकी कौशल खूश झाला असून त्याने लिहिले आहे, ''या वर्षीची सर्वोत्कृष्ट प्रस्तुती. अनुष्का शर्मा आणि तिच्या टीमला भरपूर शुभेच्छा.!!!"
ही मालिका खूपच सुंदर बनवण्यात आली आहे. अनेक सामाजिक प्रश्नांना यात लेखक-दिग्दर्शकाने हात घातला आहे. अत्यंत वास्तववादी चित्रण यात पाहायला मिळते. यामुळे 'पाताल लोक' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.