ETV Bharat / international

प्लास्टिक प्रदूषणामुळे महासागर तुंबतायत; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता..

author img

By

Published : Sep 26, 2019, 8:38 PM IST

महासागरांतील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार असल्याची घोषणा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन यांनी केली. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये ते बोलत होते.

स्कॉट मॉरिसन

न्यूयॉर्क - आपल्या महासागरांचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे आपल्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी काल व्यक्त केले. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी पर्यावरण संवर्धानासाठी ऑस्ट्रेलियाने काय पावले उचलली आहेत? हे देखील स्पष्ट केले.

प्लास्टिक प्रदूषणामुळे आपले महासागर तुंबतायत; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता..

हवामान बदलासंबंधी चर्चेमध्ये बोलताना, जगातील नेत्यांनी आणि स्टेकहोल्डर्सनी तरुणांच्या समस्या ऐकाव्यात, असे आवाहनही मॉरिसन यांनी केले. यासोबतच त्यांनी महासागरातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ऑस्ट्रेलिया मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली.

आमचे लक्ष्य हे योग्य गुंतवणुकीचे वातावरण तयार करणे आहे. जेणेकरुन, नवीन तंत्रज्ञानाचे अशा प्रकारे व्यावसायिकरण होईल. त्यामुळे आपल्या महासागरामध्ये होणाऱ्या प्रदूषणाला देखील आळा बसेल आणि पर्यावरणाला हानी न पोहोचता नवी मौल्यवान उत्पादने तयार होतील, असेही मॉरिसन यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

हेही वाचा : चांद्रयान-२ : ऑर्बिटर सुस्थितीत, विक्रमशी मात्र संपर्क नाही - इस्रो प्रमुख

न्यूयॉर्क - आपल्या महासागरांचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे आपल्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी काल व्यक्त केले. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी पर्यावरण संवर्धानासाठी ऑस्ट्रेलियाने काय पावले उचलली आहेत? हे देखील स्पष्ट केले.

प्लास्टिक प्रदूषणामुळे आपले महासागर तुंबतायत; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता..

हवामान बदलासंबंधी चर्चेमध्ये बोलताना, जगातील नेत्यांनी आणि स्टेकहोल्डर्सनी तरुणांच्या समस्या ऐकाव्यात, असे आवाहनही मॉरिसन यांनी केले. यासोबतच त्यांनी महासागरातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ऑस्ट्रेलिया मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली.

आमचे लक्ष्य हे योग्य गुंतवणुकीचे वातावरण तयार करणे आहे. जेणेकरुन, नवीन तंत्रज्ञानाचे अशा प्रकारे व्यावसायिकरण होईल. त्यामुळे आपल्या महासागरामध्ये होणाऱ्या प्रदूषणाला देखील आळा बसेल आणि पर्यावरणाला हानी न पोहोचता नवी मौल्यवान उत्पादने तयार होतील, असेही मॉरिसन यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

हेही वाचा : चांद्रयान-२ : ऑर्बिटर सुस्थितीत, विक्रमशी मात्र संपर्क नाही - इस्रो प्रमुख

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.