ETV Bharat / city

ठाण्यातील सापर्डे गावात भातशेतातील खळ्यावर ३ विषारी घोणस साप; सर्पमित्रांकडून जीवदान - war organisation thane

कल्याण पश्चिमेकडील सापर्डे गावात एक शेतकरी कुटुंब खळ्यावर काम करत असताना, एक नव्हे तर तब्बल ३ साप त्यांना पेंढ्यांमध्ये आढळून आले. घाबरलेल्या या कुटुंबीयांनी सर्पमित्रांसोबत संपर्क साधला.

Russell's viper snake was found on field at village Saparde in Thane
ठाण्यातील सापर्डे गावातील भातशेतातील खळ्यावर घोणस साप आढळले
author img

By

Published : Dec 24, 2019, 11:40 AM IST

ठाणे - जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांकडून शेतातील खळ्यावर भाताच्या पेंढ्या बांधण्याचे काम सुरू आहे. ठाण्यातील कल्याण पश्चिमेकडील सापर्डे गावात एक शेतकरी कुटुंब खळ्यावर काम करत असतानाच, एक नव्हे तर तब्बल ३ विषारी घोणस प्रजातीचे साप त्यांना पेंढ्यांमध्ये आढळून आले. घाबरलेल्या या कुटंबीयांनी सर्पमित्रांसोबत संपर्क साधला. यानंतर सर्पमित्रांनी तिथे येऊन त्या सापांना पकडले आणि जीवदान दिले.

ठाण्यातील सापर्डे गावातील भातशेतातील खळ्यावर 3 घोणस साप आढळले...

हेही वाचा... समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न झारखंडच्या जनतेने नाकारला - शरद पवार

भक्ष्याच्या शोधात आणि बदलत्या वातारणामुळे विषारी-बिन विषारी सापांनी मानवी वस्तीत शिरकाव करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या ३ महिन्यात सर्पमित्रांनी कल्याण पश्चिमेकडील मानवी वस्तीतून शेकडो सापांना पकडून जंगलात सोडले. सोमवारी सापर्डे गावात दादाजी पाटील यांच्या भात शेतातील खळ्यावर भाताचे भारे रचून ठेवण्यात आले होते. या भाऱ्यातील काही पेंड्या भात झोडणीसाठी काढण्याचे काम सुरु होते. ते करत असतानाच त्यांना पेंढ्यात एक नव्हे तर तब्बल ३ विषारी साप असल्याचे दिसून आले. साप पाहून घाबरलेल्या पाटील यांच्या कुटंबाने तेथून पळ काढला.

हेही वाचा... जळगाव : ट्रक व काळी-पिवळीचा भीषण अपघात ; 9 ठार तर 11 जण जखमी

त्यांनतर पाटील यांनी भाताच्या खळ्यातील भाऱ्यात साप घुसल्याची माहिती 'वार' संस्थेचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांना दिली. माहिती मिळताच सर्पमित्र बोंबे आणि हितेश यांनी घटनास्थळी येऊन त्या अंत्यत विषारी अशा घोणस प्रजातीच्या तीनही सापांना पकडले. हे साप सोबत आणलेल्या प्लास्टिक ड्रमध्ये बंद केले. साप पकडल्याचे पाहून शेतकरी कुटूंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान हे तीनही साप अत्यंत विषारी घोणस प्रजातीचे असून ४ ते ५ फुट लांबीचे आहेत. सर्पमित्रांनी या सापांना कल्याण वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने सायंकाळी जंगलात सोडण्यात आल्याची माहिती सर्पमित्र बोंबे यांनी दिली.

हेही वाचा... मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणांचे शिवसैनिकांकडून मुंडन

ठाणे - जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांकडून शेतातील खळ्यावर भाताच्या पेंढ्या बांधण्याचे काम सुरू आहे. ठाण्यातील कल्याण पश्चिमेकडील सापर्डे गावात एक शेतकरी कुटुंब खळ्यावर काम करत असतानाच, एक नव्हे तर तब्बल ३ विषारी घोणस प्रजातीचे साप त्यांना पेंढ्यांमध्ये आढळून आले. घाबरलेल्या या कुटंबीयांनी सर्पमित्रांसोबत संपर्क साधला. यानंतर सर्पमित्रांनी तिथे येऊन त्या सापांना पकडले आणि जीवदान दिले.

ठाण्यातील सापर्डे गावातील भातशेतातील खळ्यावर 3 घोणस साप आढळले...

हेही वाचा... समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न झारखंडच्या जनतेने नाकारला - शरद पवार

भक्ष्याच्या शोधात आणि बदलत्या वातारणामुळे विषारी-बिन विषारी सापांनी मानवी वस्तीत शिरकाव करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या ३ महिन्यात सर्पमित्रांनी कल्याण पश्चिमेकडील मानवी वस्तीतून शेकडो सापांना पकडून जंगलात सोडले. सोमवारी सापर्डे गावात दादाजी पाटील यांच्या भात शेतातील खळ्यावर भाताचे भारे रचून ठेवण्यात आले होते. या भाऱ्यातील काही पेंड्या भात झोडणीसाठी काढण्याचे काम सुरु होते. ते करत असतानाच त्यांना पेंढ्यात एक नव्हे तर तब्बल ३ विषारी साप असल्याचे दिसून आले. साप पाहून घाबरलेल्या पाटील यांच्या कुटंबाने तेथून पळ काढला.

हेही वाचा... जळगाव : ट्रक व काळी-पिवळीचा भीषण अपघात ; 9 ठार तर 11 जण जखमी

त्यांनतर पाटील यांनी भाताच्या खळ्यातील भाऱ्यात साप घुसल्याची माहिती 'वार' संस्थेचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांना दिली. माहिती मिळताच सर्पमित्र बोंबे आणि हितेश यांनी घटनास्थळी येऊन त्या अंत्यत विषारी अशा घोणस प्रजातीच्या तीनही सापांना पकडले. हे साप सोबत आणलेल्या प्लास्टिक ड्रमध्ये बंद केले. साप पकडल्याचे पाहून शेतकरी कुटूंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान हे तीनही साप अत्यंत विषारी घोणस प्रजातीचे असून ४ ते ५ फुट लांबीचे आहेत. सर्पमित्रांनी या सापांना कल्याण वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने सायंकाळी जंगलात सोडण्यात आल्याची माहिती सर्पमित्र बोंबे यांनी दिली.

हेही वाचा... मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणांचे शिवसैनिकांकडून मुंडन

Intro:kit 319Body:खळ्यावरील भाताच्या भाऱ्यात ३ विषारी घोणस साप; शेतकरी कुटंबाचा थरकाप

ठाणे : शेतकऱ्यांच्या कुटुंबाकडून शेतातील खळ्यावर भाताचे भारे काढण्याचे काम सुरु असतानाच, एक नव्हे तर ३ विषारी साप त्या भाऱ्यात दळून बसल्याचे दिसताच शेतकरी कुटंबाचा थरकाप उडाल्याची घटना घडली आहे. हि घटना कल्याण पश्चिमेकडील सापर्डे गावातील एका शेतीच्या खळ्यावर घडली आहे.
भक्ष्याच्या शोधात विषारी - बिन विषारी सापांनी बदलत्या वातारणामुळे मानवी वस्तीत शिरकाव केला असून गेल्या ३ महिन्यात संर्पमित्रांनी कल्याण पश्चिमेकडील मानवी वस्तीतून शेकडो साप पकडून जंगलात सोडले. तर दोन दिवसापूर्वीच एका बिस्लरीच्या गोदामात ७ फुटाचा साप भक्ष्य शोधण्यासाठी शिरल्याची घटना घडली, तर भगीरथी नगर परिसरातील मॅरेज हॉलमध्ये विषारी घोणस सापाला सर्पमित्रांनी पकडले होते. आज पुन्हा सापर्डे गावात राहणारे दादाजी पाटील यांच्या भात शेतातील खळ्यावर भाताचे भारे रचून ठेवण्यात आले होते. या भाऱ्यातील काही पेंड्यातून भात झाडणीसाठी भाताचे भारे काढण्याचे काम सुरु असतानाच एक नव्हे तर ३ विषारी साप पाहून भातेचे भारे टाकून शेतकरी पाटील यांच्या कुटंबाने पळ काढला.
त्यांनतर पाटील यांनी भाताच्या खळ्यातील भाऱ्यात २ ते ३ अजगर घुसल्याची माहिती वार संस्थेचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संर्पक करून दिली. माहिती मिळताच सर्पमित्र बोंबे आणि हितेश यांनी घटनास्थळी येवून या दोघांनी भाताचे भाऱ्यातून एक नव्हे तर ३ अंत्यत विषारी घोणस साप शिताफीने पकडून सोबत आणलेल्या प्लास्टिक ड्रमध्ये बंद केले. विषारी साप पकडल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या कुटूंबाने सुटकेचा निश्वास घेतला.
दरम्यान तिन्ही घोणस जातीचे अंत्यत विषारी साप असून ४ ते ५ फुट लांबीचे आहेत. या विषारी घोणस सापाला कल्याण वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने सायंकाळी जंगलात सोडल्याची माहिती सर्पमित्र बोंबे यांनी दिली.

Conclusion:kalyan
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.