ठाणे : निरुत्साही, नैराश्य, तणाव, अपयश आदींमुळे तरुणांमध्ये नाकर्तेपणाचे भाव वाढतात. काही परिस्थिती ही सांगताही येत नाही, सहनही होत नाही. अशा परिस्थितीत तरुणांना धीर आणि आधार देण्याची गरज असते; मात्र त्याचा अभाव हल्लीच्या तरुणांमध्ये प्रकर्षाने जाणवतो. याच घुसमटीत हृदयविकार सारख्या जीवघेण्या आजाराचे तरुण बळी पडतात. ज्या तरुणांमध्ये घुसमट वाढतच जाते असे तरुण आत्महत्यासारख्या (reasons behind youth suicide) परिणामावर पोहचतात. त्यासाठी ऐन उमेदीतील तरुणांशी संवाद साधल्यास, आपले कुणीतरी आहे, आपली काळजी करणारे कुणीतरी आहे. आपले वाईट होत असताना कुणीतरी आपल्याला सावरणारे आहे (Parental communication breaks youth suicidal). ही मानसिकता तयार होते. मनावरचा ताण कमी होतो. एकटेपणा (Loneliness as a cause of suicide) आणि एकाधिकार हेच तणावाची हृदयविकार आणि आत्महत्येची कारणे आहेत. त्यामुळे पालकांचा संवाद हा याला संजीवनी ठरतो. (youth suicide and parent communication)
हताश पाल्य आत्महत्येच्या दिशेने- सध्या आधुनिकतेच्या स्पर्धेत तरुणांचे मोठे नुकसान होत आहे. तरुणांमध्ये आळस बळावला आहे. लहानपणी मैदानी हालचाली नाही तर मोठेपणी तरुणाईचा उत्साह, त्यात मैदानी खेळाचा लवलेश नाही, व्यायाम नाही. काम, घर, हातात मोबाईल, जेवण वेळी, निर्धारीत आहार नाही. सिगारेट, मद्य, अंमली पदार्थाचे सेवन यामुळे तरुण पिढी खोकळी झाली आहे. अनेक आजारांनी घर केलेले आहे. त्यामुळे 30 च्या उंबरठ्यावर तरुण ग्रासलेले आहेत. त्यातच स्पर्धेच्या युगामध्ये पालक-पाल्यांवरती तणाव निर्माण करून त्यांना या स्पर्धेमध्ये पुढे जाण्यासाठी दबाव टाकतात आणि याचमुळे हे पाल्य नाराज होऊन आत्महत्येच्या दिशेने वळतात.
संवादामुळे 100 टक्के आत्महत्या थांबतील- या आत्महत्या 100 टक्के थांबवणं शक्य आहे ते फक्त संवादामुळे हे होऊ शकते असा विश्वास डॉक्टर वक्त करतात.तरुणांच्या आत्महत्या जर थांबवायच्या असतील तर पालकांनी पाल्याची संवाद साधला पाहिजे मोबाईलवर ग्रासून न राहता पाल्यांची संवाद साधला त्यांच्याशी अवांतर चर्चा केली तर पाल्य अशा चुका करणार नाहीत किंवा पाल्यांची मनमोकळेपणाने गप्पा मारल्या तर त्यांचे जे काही प्रश्न आहेत जो काही तणाव आहे तो देखील पालकांना कळू शकेल आणि जर पाल्य आत्महत्या सारखा पाऊल उचलणार असेल तर वेळीच त्यांना चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जावे, असे देखील डॉ. उमाटे यांनी सांगितले.