ठाणे - जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ठाणे शहरात रहाणाऱ्या एका ६० वर्षाच्या इसमाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मुंबईच्या केईएम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला - ठाण्याच्या बी कॅबिन परिसरात रहाणारे ६० वर्षाचे नागरिक शनिवारी सकाळी स्वाईन फ्लूची लक्षणे असल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने संध्याकाळी त्यांना मुंबईच्या केईएम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान, त्यांना मुंबईला घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्य झाला.
दरम्यान, त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे ठाण्यात स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला असल्याचे उघड झाले आहे. पावसाळा असल्याने संसर्ग रोगाची निर्मिती होत असते. दरम्यान, स्वाईन फ्लूने रुग्ण दगावल्याने शहारत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालिका प्रशासन कामाला लागले आहे.
हेही वाचा - पंडित नेहरूंवर टीका करू शकत नाही.. १९६२ मध्ये त्यांना त्रास सहन करावा लागला.. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग