ETV Bharat / city

शहरी नागरिकांना आपल्याच गावात गावबंदी करत केले रस्ते बंद

author img

By

Published : Mar 24, 2020, 10:05 PM IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यात संचारबंदी कायदा लागु करण्यात येऊन घराबाहेर न पडण्याचे आवाहन केल्यानंतर शहरी भागातील नागरिक आपल्या मूळ गावी जात आहेत. मात्र, त्यांना भितीपोटी शिरुर तालुक्यातील जांबुत गावात आपल्याच लोकांनी आता गावबंदी करत गावात येणारे रस्ते जेसीबीच्या सहायाने खोदुन बंद केले आहेत.

urban-citizens-have-been-banned-in-their-hometowns
शहरी नागरिकांना आपल्याच गावात गावबंदी करत केले रस्ते बंद

पुणे - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यात संचारबंदी कायदा लागू करण्यात येऊन घराबाहेर न पडण्याचे आवाहन केल्यानंतर शहरी भागातील नागरिक आपल्या मुळ गावीत जात आहेत. मात्र, सध्या कोरोनाच्या भितीपोटी शिरुर तालुक्यातील जांबुत गावात आपल्याच लोकांनी आता आपल्याच लोकांसाठी गावबंदी करत गावात येणारे रस्ते जेसीबीच्या साहाय्याने खोदून बंद केला आहे.

शहरी नागरिकांना आपल्याच गावात गावबंदी करत केले रस्ते बंद

शहरी भागात कोरोनाचे रुग्न आढळून येत असल्याची भावना मनात ठेवून ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठी धास्ती घेतली आहे. शहरी नागरिकांना गावात येण्यास मनाई करण्यात आली असुन जांबुत गावात गावबंदी करण्यात आली आहे. कोरोनाच्या धास्तीने शहरी नागरिक मुळगावी येत आहेत. त्यांना गावबंदीमुळे पुन्हा शहराकडे परतावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संचारबंदी लागू असल्याने नागरिकांनी आहे, त्याठिकाणी घरात बसून बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुणे - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यात संचारबंदी कायदा लागू करण्यात येऊन घराबाहेर न पडण्याचे आवाहन केल्यानंतर शहरी भागातील नागरिक आपल्या मुळ गावीत जात आहेत. मात्र, सध्या कोरोनाच्या भितीपोटी शिरुर तालुक्यातील जांबुत गावात आपल्याच लोकांनी आता आपल्याच लोकांसाठी गावबंदी करत गावात येणारे रस्ते जेसीबीच्या साहाय्याने खोदून बंद केला आहे.

शहरी नागरिकांना आपल्याच गावात गावबंदी करत केले रस्ते बंद

शहरी भागात कोरोनाचे रुग्न आढळून येत असल्याची भावना मनात ठेवून ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठी धास्ती घेतली आहे. शहरी नागरिकांना गावात येण्यास मनाई करण्यात आली असुन जांबुत गावात गावबंदी करण्यात आली आहे. कोरोनाच्या धास्तीने शहरी नागरिक मुळगावी येत आहेत. त्यांना गावबंदीमुळे पुन्हा शहराकडे परतावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संचारबंदी लागू असल्याने नागरिकांनी आहे, त्याठिकाणी घरात बसून बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.