ETV Bharat / city

'सावध राहा..परत बोलाल तर लोकं तांगडून मारतील'

author img

By

Published : Jan 14, 2020, 3:14 PM IST

'आज के शिवाजी; नरेंद्र मोदी' पुस्तक प्रकाशनावरून सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाद पेटला होता. विविध स्तरांमधून यावर संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या. आता छत्रपतींचे वंशज उदयनराजे भोसले यांनी संबंधित प्रकरणावर मौन सोडले आहे.

udayan raje press conference
'सावध राहा..परत बोलाल तर लोकं तांगडून मारतील'

पुणे - 'आज के शिवाजी; नरेंद्र मोदी' पुस्तक प्रकाशनावरून सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाद पेटला होता. विविध स्तरांमधून यावर संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या. आता छत्रपतींचे वंशज उदयनराजे भोसले यांनी संबंधित प्रकरणावर मौन सोडले आहे.

'सावध राहा..परत बोलाल तर लोकं तांगडून मारतील'

गळ्यात पट्टा नसलेल्या आणि रस्त्यावर फिरणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, नाहीतर परिणाम वाईट होतील, अशी घणाघाती टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. यावर पुढे बोलताना 'सावध राहा...परत जर बोलाल, तर लोक तांगडून मारतील, असा सज्जड दम त्यांनी भरलाय. तसेच शिव-जयंत्या तीन वेळा का साजऱ्या करण्यात येतात, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करणाऱ्या पुस्तकावर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया द्यावी, यासाठी शिवभक्तांकडून मागणी करण्यात येत होती. या विषयावर भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

अशा प्रकारे तुलना करण्याच्या प्रकारचा निषेध करत असून या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी त्यांनी केली. कुठल्याच पक्षाला महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याचे ते म्हणाले.
महाराज हे युग पुरुष होते. त्यामुळे जाणता राजा फक्त एकच; बाकी कोणाला महाराजांची उपमा देता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. महाराजांशी तुलना सोडा पण कोणीही त्यांच्या जवळपास देखील जाऊ शकत नाही, असे उदयनराजे म्हणाले.

शिवसेना भवनावर असलेल्या बाळासाहेब आणि महाराजांच्या फोटोवरून देखील त्यांनी शिवसेनेवर टीका केली. बिनपट्ट्याच्या लोकांना लायकी दाखवून देणार, अशी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली. तसेच स्वार्थाने एकत्र येणारे लोक फार काळ टिकत नाहीत, असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लागावला आहे.

पुणे - 'आज के शिवाजी; नरेंद्र मोदी' पुस्तक प्रकाशनावरून सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाद पेटला होता. विविध स्तरांमधून यावर संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या. आता छत्रपतींचे वंशज उदयनराजे भोसले यांनी संबंधित प्रकरणावर मौन सोडले आहे.

'सावध राहा..परत बोलाल तर लोकं तांगडून मारतील'

गळ्यात पट्टा नसलेल्या आणि रस्त्यावर फिरणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, नाहीतर परिणाम वाईट होतील, अशी घणाघाती टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. यावर पुढे बोलताना 'सावध राहा...परत जर बोलाल, तर लोक तांगडून मारतील, असा सज्जड दम त्यांनी भरलाय. तसेच शिव-जयंत्या तीन वेळा का साजऱ्या करण्यात येतात, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करणाऱ्या पुस्तकावर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया द्यावी, यासाठी शिवभक्तांकडून मागणी करण्यात येत होती. या विषयावर भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

अशा प्रकारे तुलना करण्याच्या प्रकारचा निषेध करत असून या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी त्यांनी केली. कुठल्याच पक्षाला महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याचे ते म्हणाले.
महाराज हे युग पुरुष होते. त्यामुळे जाणता राजा फक्त एकच; बाकी कोणाला महाराजांची उपमा देता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. महाराजांशी तुलना सोडा पण कोणीही त्यांच्या जवळपास देखील जाऊ शकत नाही, असे उदयनराजे म्हणाले.

शिवसेना भवनावर असलेल्या बाळासाहेब आणि महाराजांच्या फोटोवरून देखील त्यांनी शिवसेनेवर टीका केली. बिनपट्ट्याच्या लोकांना लायकी दाखवून देणार, अशी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली. तसेच स्वार्थाने एकत्र येणारे लोक फार काळ टिकत नाहीत, असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लागावला आहे.

Intro:सावध रहा... परत जर बोलाल तर लोकं तांगडून मारतील... पुन्हा माझ्याकडे येऊ नका , उदयन राजे यांचा सज्जड दमBody:mh_pun_01_udayn_raje_on_book_issue_avb_7201348

anchor
गळ्यात पट्टा नसलेल्या रस्त्यावर फिरणाऱ्या प्रमाणे असणाऱ्यानी आम्हाला शिकवू नये नाहीतर परिणाम वाईट होतील अशी घणाघाती टीका उदयन राजे भोसले यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केलीय....आमच्या कडे बोट दाखवतायेत असे विचारता मग शिवसेना नाव देताना महाराजांच्या वंशजांना विचारले होते का असा प्रश्न ही उदयनराजे यांनी उपस्थित केला...शिवसेनेनं शिव हे नाव काढून ठाकरे सेना करावे असा टोला ही त्यांनी लगावला....पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करणाऱ्या विषयावर महाराजांचे वंशज आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी मौन सोडले, अशा प्रकारे तुलना करण्याच्या प्रकारचा निषेधच आहे या पुस्तकावर बंदी आणावी असे सांगत असतानाच, कुठल्याच पक्षाला महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही सर्वांनी महाराजांच्या नावाचा फक्त वापर करून घेतल्याची टीका उदयनराजे भोसले यांनी केली....जसे महाराजांच्या सोबत तुलना करने चुकीचे आहे तसेच कोणाला जाणता राजा म्हणणे ही चुकीचे आहे जाणता राजा एकच ते म्हणजे शिवाजी महाराज असे उदयनराजे म्हणाले....या विषयावर त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली...गोयल नावाच्या लेखकाने लिहलेले पुस्तक पाहून वाईट वाटलं.महाराज हे युग पुरुष होते त्यामुळे जाणता राजा फक्त एकच शिवाजी महाराज... बाकी कुणाला ही उपमा देता येणार नाही.महाराजांशी तुलना सोडा पण कोणीही त्यांच्या जवळपास देखील जाऊ शकत नाही.मी त्या घराण्यात जन्माला आलो याचा मला सार्थ अभिमान आहे. त्या घराण्यात जन्माला आलो हे माझं भाग्य आहे.शिवसेना भवनावर असलेल्या बाळासाहेब आणि महाराजांच्या फोटोवरून देखील शिवसेनेवर टीका केली.कुणी काहीही बोलावं आणि आम्ही आम्ही ऐकूण घेणार नाही... आम्ही बांगड्या भरल्या नाहीत. बिनपट्ट्याच्या लोकांना लायकी दाखवून देणार अशी नाव न घेता संजय राऊतांवर टीका त्यांनी केली. शिवसेना ज्यावेळी काढली त्यावेळी वंशजांना विचारायला आला होता का .? महाशिव आघाडी मधून शिव का काढलं? ही आघाडी काढताना आम्हाला विचारायला आला होता का ? शिव वडा काढून महाराजांचे नाव दिले . शिवसेनेच्या नावावर आम्ही कधीही हरकत घेतली नाही महाराजांचे नाव घ्यायची कोणत्याही पक्षाची लायकी नाही. शेतकरी मरायला लागले आहेत. तुमची फाईव्ह स्टार हॉटेल्स जोरात चालत आहेत. राज्याचा खेळखंडोबा या लोकांनी केला आहे. हे दिवस पाहण्यापेक्षा मेलेलं बरं... शिवसेनेने नावात बदल करून ठाकरे सेना करा... मला पाहायचं आहे की नाव बदलल्यावर तुमच्या मागे किती तरुण राहतात...स्वातंत्र्य प्राप्तीला 60 वर्षाहुन अधिक काळ लोटला... एवढ्या वर्षानंतर जनतेला काय मिळालं? राजेशाही असती तर एकही जण उपाशी राहिला नसता. लोकशाही लोकांनी अस्तत्वात आणली मग लोकांनी निवडून दिलेल्या लोकांनी नीट वागायला पाहिजे की नाही ?
महाराष्ट्रातील जनता मूर्ख नाही. शिवस्मारक अजून का झालं नाही? स्वार्थाने लोकं एकत्र येतात अशी लोकं फार काळ एकत्र राहत नाहीत.विचाराने लोकं एकत्र आलेली लोकं कायमस्वरूपी एकत्र राहतात.शिव जयंत्या 3 वेळा का साजऱ्या केल्या जातात, सावध रहा... परत जर बोलाल तर लोकं तांगडून मारतील... पुन्हा माझ्याकडे येऊ नका असा सज्जड दम उदयन राजे यांनी यावेळी दिला

Byte उदयनराजे भोसले, माजी खासदाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.