ETV Bharat / city

शिष्यवृत्ती आणि सुरक्षिततेसारख्या प्रश्नांमुळे काश्मिरी विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये घट

देशामध्ये विविध ठिकाणी काश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देखील प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे काश्मिरी विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी होणारे स्थलांतर तुलनेने कमी झाले आहे.

author img

By

Published : Jul 18, 2019, 4:04 AM IST

सरहद संस्थेचे समन्वयक जाहिद भट

पुणे- गेल्या काही वर्षांमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती आणि सुरक्षेच्या कारणांमुळे राज्यामध्ये येणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये घट झाली आहे. पुणे शहरात देखील या स्थित्यंतराचा प्रभाव दिसून येत आहे. गेले अनेक वर्ष काश्मीरमधून विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये सुमारे 1000 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिकण्यासाठी दरवर्षी येत होते. मात्र, अलीकडच्या काळात ही संख्या निम्म्याने कमी झाल्याचे सांगितले जात आहे.

सरहद संस्थेचे समन्वयक जाहिद भट

यासंदर्भात काश्मिरी विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या पुण्यातील सरहद या संस्थेचे समन्वयक आणि काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील रहिवासी जाहिद भट यांच्याशी ईटीव्ही भारतने संवाद साधला. यावेळी जाहिद भट म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून जम्मू-कश्मीरच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीमुळे अन्य राज्यांमधील मोठ्या शहरांमध्ये शिक्षणासाठी जाता येत होते. त्यामध्ये अनेक बदल झाल्यामुळे विद्यार्थ्यांना विविध आव्हानांचा सामना करावा लागतो.

त्याप्रमाणेच देशामध्ये विविध ठिकाणी काश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देखील प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे काश्मिरी विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी होणारे स्थलांतर तुलनेने कमी झाले आहे. दरम्यान, सरकार आणि सरहद सारख्या संस्था हे प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना बरोबर नेहमी संवाद साधत असतात. त्यामुळे पुणे आणि दिल्ली सारखा शहरांमध्ये आज देखील शेकडो काश्मिरी विद्यार्थी सुरक्षित वातावरणामध्ये राहत आहेत.

पुणे- गेल्या काही वर्षांमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती आणि सुरक्षेच्या कारणांमुळे राज्यामध्ये येणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये घट झाली आहे. पुणे शहरात देखील या स्थित्यंतराचा प्रभाव दिसून येत आहे. गेले अनेक वर्ष काश्मीरमधून विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये सुमारे 1000 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिकण्यासाठी दरवर्षी येत होते. मात्र, अलीकडच्या काळात ही संख्या निम्म्याने कमी झाल्याचे सांगितले जात आहे.

सरहद संस्थेचे समन्वयक जाहिद भट

यासंदर्भात काश्मिरी विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या पुण्यातील सरहद या संस्थेचे समन्वयक आणि काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील रहिवासी जाहिद भट यांच्याशी ईटीव्ही भारतने संवाद साधला. यावेळी जाहिद भट म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून जम्मू-कश्मीरच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीमुळे अन्य राज्यांमधील मोठ्या शहरांमध्ये शिक्षणासाठी जाता येत होते. त्यामध्ये अनेक बदल झाल्यामुळे विद्यार्थ्यांना विविध आव्हानांचा सामना करावा लागतो.

त्याप्रमाणेच देशामध्ये विविध ठिकाणी काश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देखील प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे काश्मिरी विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी होणारे स्थलांतर तुलनेने कमी झाले आहे. दरम्यान, सरकार आणि सरहद सारख्या संस्था हे प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना बरोबर नेहमी संवाद साधत असतात. त्यामुळे पुणे आणि दिल्ली सारखा शहरांमध्ये आज देखील शेकडो काश्मिरी विद्यार्थी सुरक्षित वातावरणामध्ये राहत आहेत.

Intro:पुणे - गेल्या काही वर्षांमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती आणि सुरक्षेच्या कारणांमुळे राज्यामध्ये येणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये घट झाली आहे.


Body:पुणे शहरात देखील या स्थित्यंतराचा प्रभाव दिसून येत आहे. गेले अनेक वर्ष काश्मीरमधून विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये सुमारे 1000 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिकण्यासाठी दरवर्षी येत होते. मात्र, अलीकडच्या काळात ही संख्या निम्म्याने कमी झाल्याचे सांगितले जात आहे.

यासंदर्भात काश्मिरी विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या पुण्यातील सरहद या संस्थेचे समन्वयक आणि काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील रहिवासी जाहिद भट यांच्याशी ईटीव्ही भारतने संवाद साधला. यावेळी जाहिद भट म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून जम्मू-कश्मीरच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीमुळे अन्य राज्यांमधील मोठ्या शहरांमध्ये शिक्षणासाठी जाता येत होते. त्यामध्ये अनेक बदल झाल्यामुळे विद्यार्थ्यांना विविध आव्हानांचा सामना करावा लागतो.

त्याप्रमाणेच देशामध्ये विविध ठिकाणी काश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देखील प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे काश्मिरी विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी होणारे स्थलांतर तुलनेने कमी झाले आहे. दरम्यान, सरकार आणि सरहद सारख्या संस्था हे प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना बरोबर नेहमी संवाद साधत असतात. त्यामुळे पुणे आणि दिल्ली सारखा शहरांमध्ये आज देखील शेकडो काश्मिरी विद्यार्थी सुरक्षित वातावरणामध्ये राहत आहेत.

Byte Sent on Mojo
Byte Jahid Bhat, Coordinator, Sarhad, Pune.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.