ETV Bharat / city

Nana Patekar About Shivaji Maharaj Statue : 'नुसते पुतळे उभे करून चालणार नाही महाराजांचे विचार आत्मसात करा'

छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे केल्यानंतर आपली जबाबदारी वाढते. त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे नुसते पुतळे उभे करून चालणार नाही तर आपल्याला महाराजांचे विचार आत्मसात करावे लागतील असे मत अभिनेते नाना पाटेकर यांनी पुण्यात ( Nana Patekar About Shivaji Maharaj Statue ) बोलताना मांडले आहे.

author img

By

Published : Feb 19, 2022, 5:10 AM IST

Nana Patekar About Shivaji Maharaj Statue
नाना पाटेकर

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे केल्यानंतर आपली जबाबदारी वाढते. त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे नुसते पुतळे उभे करून चालणार नाही तर आपल्याला महाराजांचे विचार आत्मसात करावे लागतील असे मत अभिनेते नाना पाटेकर यांनी पुण्यात ( Nana Patekar On Chatrapati Shivaji Maharaj in pune ) बोलताना मांडले आहे.

'तर आताचे सर्व प्रश्न सुटतील'

पुण्यातील बाणेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या अनावरण सोहळ्यात पत्रकारांशी बोलताना नाना पाटेकर यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. महाराजांची विचारसरणी ही सर्वधर्म समभाव आहे आणि आपण जर तीच विचारसरणी अंमलात आणली तर आताचे सर्व प्रश्न सुटतील. अशी भूमिका देखील नाना पाटेकर यांनी मांडली आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या विचारांचा उपयोग काही राजकीय आणि विद्वान मंडळी स्वतःच्या फायद्यासाठी करतात. त्याकडे लक्ष देऊ नका असे आव्हान देखील त्यांनी केले आहे.

हिजाबवर बोलण्यासाठी ही जागा योग्य नाही -

तसेच सध्या देशभर जो हिजाबचा मुद्दा गाजतोय त्यावत विचारले असता नाना पाटेकर यांनी ही जागा त्यावर बोलायची नाही, असे सांगतच या मुद्द्यावर आपले मत आपण वेगळ्या ठिकाणी मांडू अस स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - Chhatrapati Shivaji Maharaj Statue Inauguration : औरंगाबादेत सर्वाधिक उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे केल्यानंतर आपली जबाबदारी वाढते. त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे नुसते पुतळे उभे करून चालणार नाही तर आपल्याला महाराजांचे विचार आत्मसात करावे लागतील असे मत अभिनेते नाना पाटेकर यांनी पुण्यात ( Nana Patekar On Chatrapati Shivaji Maharaj in pune ) बोलताना मांडले आहे.

'तर आताचे सर्व प्रश्न सुटतील'

पुण्यातील बाणेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या अनावरण सोहळ्यात पत्रकारांशी बोलताना नाना पाटेकर यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. महाराजांची विचारसरणी ही सर्वधर्म समभाव आहे आणि आपण जर तीच विचारसरणी अंमलात आणली तर आताचे सर्व प्रश्न सुटतील. अशी भूमिका देखील नाना पाटेकर यांनी मांडली आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या विचारांचा उपयोग काही राजकीय आणि विद्वान मंडळी स्वतःच्या फायद्यासाठी करतात. त्याकडे लक्ष देऊ नका असे आव्हान देखील त्यांनी केले आहे.

हिजाबवर बोलण्यासाठी ही जागा योग्य नाही -

तसेच सध्या देशभर जो हिजाबचा मुद्दा गाजतोय त्यावत विचारले असता नाना पाटेकर यांनी ही जागा त्यावर बोलायची नाही, असे सांगतच या मुद्द्यावर आपले मत आपण वेगळ्या ठिकाणी मांडू अस स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - Chhatrapati Shivaji Maharaj Statue Inauguration : औरंगाबादेत सर्वाधिक उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.