पुणे केंद्रीय अर्थमंत्री हे २२, २३, २४ सप्टेंबर रोजी बारामती मतदार संघाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात बारामती मतदार संघातील विविध ठिकाणी सीतारामन हे गाठीभेटी तसेच विविध कार्यक्रम घेणार आहे. त्यांचा हा जो दौरा आहे, तो केंद्र सरकारच्या विविध ज्या योजना आहे. त्या योजनांचा बारामती लोकसभा मतदार संघात कश्या पद्धतीने उपयोग केला जाऊ शकतो. या संदर्भात हा दौरा आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बारामती दौरा हा राजकीय दौरा नाही, असे स्पष्ट मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
आमचं प्रयत्न असणार केंद्रीय नेतृत्वाने अस ठरवल आहे की देशातील 140 लोकसभा मतदार संघात केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी कशी होते. काय त्रुटी आहे. काय केलं पाहिजे, यासाठी केंद्रीय मंत्री त्या त्या मतदार संघात जाऊन केंद्रीय योजनांचा आढावा घेणार आहे. या दौऱ्यात बारामती मतदार संघात जी विकास कामे रखडलेली आहे. जी विकास कामे होत नाही. अश्यासाठी निधी उपलब्ध करण्याचा आमचं प्रयत्न असणार आहे, असे यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.
आमच्यासाठी अभिमानाची बाब भाजप यंदाच्या लोकसभेत बारामती काबीज करणार का ? याबाबत हर्षवर्धन पाटील यांना विचारल असता, ते म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीला 18 महिन्यांचं कालावधी आहे. शेवटच्या 3 महिन्यात इलेक्शन फिवर तयार होतो. इतक्या लवकर होत नाही. केंद्राने फक्त केंद्रीय मंत्र्यांना देशातील 140 लोकसभा मतदार संघात केंद्रीय योजनांच्या बाबतीत आढावा, घेण्यासाठी पाठवल आहे. आणि हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. केंद्रीय अर्थमंत्री 3 दिवस बारामतीतील गाववस्तीत आढावा घेणार आहे, असे देखील यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.