ETV Bharat / city

गड किल्ल्यांना नखही लागू  देणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

author img

By

Published : Sep 6, 2019, 8:56 PM IST

गडकिल्ल्यांसंदर्भातील निर्णयाने आजचा दिवस गाजला. मात्र त्यावर स्वत: मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहेत. त्यामुळे या वादाला आता तरी ब्रेक लागला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे - गड-किल्ल्यांसंदर्भातील बातमी अतिशय चुकीची आहे. हिंदवी स्वराज्यातील गड किल्ल्यांना नखही लावू देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासासंबंधीत कोणत्याही चुकीच्या गोष्टींना कधीही परवानगी मिळणार नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

गड किल्ल्यांना नखही लावू देणार नाही

हेही वाचा - किल्ले लग्न, समारंभांसाठी भाड्याने देण्याच्या बातमीवर पर्यटन विभागाचा खुलासा

संरक्षित किल्ल्यांचा आमच्या सरकारने विकास केला आहे. यापूर्वी कोणत्याही सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी लक्ष घालून काम केलेले आहे. आम्हाला इतिहास जतन करायचा आहे. जो काही निर्णय झाला, तो ऐतिहासिक किल्ल्यांव्यतिरिक्त जे किल्ले आहेत, ज्यांचा इतिहास अस्तित्वात नाही, ज्यांच्या केवळ चार भिंती आहेत, अशा ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने काही करता येईल का? असा निर्णय होता. त्यामुळे तिथे लग्न करायचे आहेत किंवा समारंभ करायचे, त्याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे हिंदवी स्वराजाच्या किल्ल्यांना नखभरही हात लावू देणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

पुणे - गड-किल्ल्यांसंदर्भातील बातमी अतिशय चुकीची आहे. हिंदवी स्वराज्यातील गड किल्ल्यांना नखही लावू देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासासंबंधीत कोणत्याही चुकीच्या गोष्टींना कधीही परवानगी मिळणार नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

गड किल्ल्यांना नखही लावू देणार नाही

हेही वाचा - किल्ले लग्न, समारंभांसाठी भाड्याने देण्याच्या बातमीवर पर्यटन विभागाचा खुलासा

संरक्षित किल्ल्यांचा आमच्या सरकारने विकास केला आहे. यापूर्वी कोणत्याही सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी लक्ष घालून काम केलेले आहे. आम्हाला इतिहास जतन करायचा आहे. जो काही निर्णय झाला, तो ऐतिहासिक किल्ल्यांव्यतिरिक्त जे किल्ले आहेत, ज्यांचा इतिहास अस्तित्वात नाही, ज्यांच्या केवळ चार भिंती आहेत, अशा ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने काही करता येईल का? असा निर्णय होता. त्यामुळे तिथे लग्न करायचे आहेत किंवा समारंभ करायचे, त्याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे हिंदवी स्वराजाच्या किल्ल्यांना नखभरही हात लावू देणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

Intro:हिंदवी स्वराज्यातील गड किल्य्यांना नख ही हात लावू देणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसBody:mh_pun_05_cm_on_gad_kille_avb_7201348

anchor
गडकिल्ल्यांसंदर्भातील बातमी अतिशय चुकीची बातमी आहे हिंदवी स्वराज्यातील गड किल्य्यांना नख ही हात लावू देणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासासंबंधीत कोणत्याही गोष्टीला कधीच परवानगी मिळणार नाही, हे सगळे संरक्षित किल्ले स्वराज्याची राजधानी रायगडावर आमच्या सरकारने ज्या पद्धतीने विकास केला, यापूर्वी कोणत्याही सरकारने त्याकडे कधीही लक्ष दिलं नाही...छत्रपती संभाजी महाराजांनी लक्ष घालून काम केलेलं आहे. आम्हाला इतिहासच जतन करायचा आहे जो काही निर्णय झाला, तो ऐतिहासिक किल्ल्यांव्यतिरिक्त जे काही किल्ले आहे, ज्यांचा इतिहास अस्तित्वात नाही, ज्याच्या केवळ चार भिंती आहे. त्या ठिकाणी काही पर्यटनाच्या दृष्टीने करता येईल का? असा निर्णय होता. तिथं काय लग्न करायचे आहेत, समारंभ करायचे त्याला काही अर्थ नाही हिंदवी स्वराजाच्या किल्ल्यांना नखभरही हात लावू देणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले
मूख्यमंत्र्यांनी शुक्रवारी पुण्यातील मानाच्या आणि प्रसिद्ध गणपती मंडळांना भेटी दिल्या त्यांनतर ते बोलत होते

Byte देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.